शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृहाअभावी नागरिकांची कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

अहमदपूर : अहमदपूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने लोकसंख्येत वाढ होत आहे. तसेच तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्ताने दररोज ...

अहमदपूर : अहमदपूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने लोकसंख्येत वाढ होत आहे. तसेच तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्ताने दररोज ये-जा करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात स्वच्छतागृह नसल्याने बाहेरगावहून आलेल्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

अहमदपूर पालिकेच्या वतीने शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याने शहरात आलेल्या नागरिकांना लघुशंकेसाठी उघड्यावर जावे लागत आहे. शहरातील भाजी मार्केट परिसर, कराडनगर, चंद्रभागानगर, हाजी सत्तारखाँ कॉलनी, नागोबानगर, हनुमान टेकडी परिसर, मिरकलेनगर, भाग्यनगरातील काही भाग, श्रीनगर, अराफत कॉलनी, पाशाखाँ कॉलनी, उमरनगर, खाटिक गल्ली, इंदिरानगर, शंकरनगर, मौलालीनगर, चौंडानगर, भारत कॉलनी, गिरिजा गार्डन आदी ठिकाणी रस्ते, नाल्यांसह स्वच्छतागृह नसल्याने येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

शहरातील बसस्थानक परिसर, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, आझाद चौक, सराफलाइन, शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसरातही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे विविध कामानिमित्ताने शहरात आलेल्या नागरिकांना लघुशंकेसाठी उघड्यावर जावे लागत आहे. पालिका शहरातील व्यापाऱ्यांकडून कर वसूल करते. मात्र, मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.

एकाच ठिकाणी स्वच्छतागृह...

अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने दररोज १२४ गावांसह वाडी-तांड्यांतील नागरिक येथे येत असतात. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे लघुशंका अथवा शौचास जावे लागल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात एकाच ठिकाणी स्वच्छतागृह असून ते कधी बंद तर कधी चालू असते. पालिकेने याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करावी, अशी मागणी सातत्याने नागरिकांतून होत आहे.

जागा हस्तांतरणाची प्रतीक्षा...

शहरातील बसस्थानकासमोर सुलभ शौचालय उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्यास मंजुरी मिळाली असून जागा हस्तांतरित होताच शौचालयाची उभारणी करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यात येईल, असे पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.