शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
3
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
4
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
5
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
6
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
7
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासरखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
8
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
9
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
10
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
11
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
12
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
13
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
14
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
15
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
16
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
17
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
18
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
19
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
20
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती

स्वच्छतागृहाअभावी नागरिकांची कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

अहमदपूर : अहमदपूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने लोकसंख्येत वाढ होत आहे. तसेच तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्ताने दररोज ...

अहमदपूर : अहमदपूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने लोकसंख्येत वाढ होत आहे. तसेच तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध कामानिमित्ताने दररोज ये-जा करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात स्वच्छतागृह नसल्याने बाहेरगावहून आलेल्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

अहमदपूर पालिकेच्या वतीने शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याने शहरात आलेल्या नागरिकांना लघुशंकेसाठी उघड्यावर जावे लागत आहे. शहरातील भाजी मार्केट परिसर, कराडनगर, चंद्रभागानगर, हाजी सत्तारखाँ कॉलनी, नागोबानगर, हनुमान टेकडी परिसर, मिरकलेनगर, भाग्यनगरातील काही भाग, श्रीनगर, अराफत कॉलनी, पाशाखाँ कॉलनी, उमरनगर, खाटिक गल्ली, इंदिरानगर, शंकरनगर, मौलालीनगर, चौंडानगर, भारत कॉलनी, गिरिजा गार्डन आदी ठिकाणी रस्ते, नाल्यांसह स्वच्छतागृह नसल्याने येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

शहरातील बसस्थानक परिसर, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, आझाद चौक, सराफलाइन, शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसरातही सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे विविध कामानिमित्ताने शहरात आलेल्या नागरिकांना लघुशंकेसाठी उघड्यावर जावे लागत आहे. पालिका शहरातील व्यापाऱ्यांकडून कर वसूल करते. मात्र, मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.

एकाच ठिकाणी स्वच्छतागृह...

अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने दररोज १२४ गावांसह वाडी-तांड्यांतील नागरिक येथे येत असतात. शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे लघुशंका अथवा शौचास जावे लागल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात एकाच ठिकाणी स्वच्छतागृह असून ते कधी बंद तर कधी चालू असते. पालिकेने याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करावी, अशी मागणी सातत्याने नागरिकांतून होत आहे.

जागा हस्तांतरणाची प्रतीक्षा...

शहरातील बसस्थानकासमोर सुलभ शौचालय उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्यास मंजुरी मिळाली असून जागा हस्तांतरित होताच शौचालयाची उभारणी करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यात येईल, असे पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.