शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांपासून प्रभागातील बोअर बंद असल्याने नागरिकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST

निलंगा : निलंगा पालिकेने नवीन जलवाहिनीचे नळ कनेक्शन घेण्यासाठी शहरातील गांधीनगर प्रभागातील बोअर बंद केल्याने चार दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी ...

निलंगा : निलंगा पालिकेने नवीन जलवाहिनीचे नळ कनेक्शन घेण्यासाठी शहरातील गांधीनगर प्रभागातील बोअर बंद केल्याने चार दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, पालिकेने सोमवारपासून नवीन जलवाहिनीच्या कामास सुरुवात केली आहे.

निलंगा पालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या जलवाहिनीचे नळ कनेक्शन घेण्यासाठी पालिकेकडून नागरिकांना सक्ती करण्यात येत आहे. शहरातील बहुतांश नागरिकांनी नवीन नळ कनेक्शन घेतले आहे. मात्र, अद्यापही काही जण शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक घराने नवीन नळ कनेक्शन घ्यावे म्हणून पालिकेने चार दिवसांपूर्वी शहरातील सर्वच बोअरचे स्टार्टर काढून पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

दरम्यान, विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या जवळील नागरिकांच्या घराजवळचे पालिकेने कनेक्शन सुरू ठेवले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वेठीस धरून पालिका दुजाभाव करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सोमवारी दुपारपासून गांधीनगर प्रभागात उर्वरित जलवाहिनीच्या कामास पालिकेने सुरुवात केली. आता जलवाहिनीचे काम सुरू करायचे होते, तर पाणी अगोदर का बंद केले, असा सवाल व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सदरील प्रभागातील विद्यमान नगरसेविका सविता अनिल उजळे यांच्या घरासमोरही आता जलवाहिनीच्या कामास सुरुवात करण्यात येत आहे.

पालिकेच्या या कारभाराबाबत वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका दक्ष झाली, तर काही नागरिकांनी नाइलाजास्तव नवीन नळ कनेक्शनसाठी अगोदरचे बोअर व नळ कनेक्शन असतानाही अनामत भरली आहे. सध्या कोरोनामुळे आर्थिक अडचण आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे नळ कनेक्शनसाठी पैसे कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

नागरिकांच्या दुर्लक्षामुळे काम अर्धवट...

डिसेंबरपासून आम्ही दवंडी देऊन नवीन नळ कनेक्शन घेण्याबाबत आवाहन करीत आहोत. त्यासाठी २२ पथकांची नियुक्ती करून घरोघरी जाऊन विनंती केली. मात्र, या भागातील नागरिकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे येथील जलवाहिनीचे काम अर्धवट राहिले होते. येथील बोअरचे कनेक्शन बंद केल्यानंतर नळ कनेक्शनची मागणी वाढली आहे. मागणी केल्यानंतर २४ तासांच्या आत कनेक्शन देण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील म्हणाले.