शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

चार दिवसांपासून प्रभागातील बोअर बंद असल्याने नागरिकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST

निलंगा : निलंगा पालिकेने नवीन जलवाहिनीचे नळ कनेक्शन घेण्यासाठी शहरातील गांधीनगर प्रभागातील बोअर बंद केल्याने चार दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी ...

निलंगा : निलंगा पालिकेने नवीन जलवाहिनीचे नळ कनेक्शन घेण्यासाठी शहरातील गांधीनगर प्रभागातील बोअर बंद केल्याने चार दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, पालिकेने सोमवारपासून नवीन जलवाहिनीच्या कामास सुरुवात केली आहे.

निलंगा पालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या जलवाहिनीचे नळ कनेक्शन घेण्यासाठी पालिकेकडून नागरिकांना सक्ती करण्यात येत आहे. शहरातील बहुतांश नागरिकांनी नवीन नळ कनेक्शन घेतले आहे. मात्र, अद्यापही काही जण शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक घराने नवीन नळ कनेक्शन घ्यावे म्हणून पालिकेने चार दिवसांपूर्वी शहरातील सर्वच बोअरचे स्टार्टर काढून पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

दरम्यान, विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या जवळील नागरिकांच्या घराजवळचे पालिकेने कनेक्शन सुरू ठेवले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वेठीस धरून पालिका दुजाभाव करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सोमवारी दुपारपासून गांधीनगर प्रभागात उर्वरित जलवाहिनीच्या कामास पालिकेने सुरुवात केली. आता जलवाहिनीचे काम सुरू करायचे होते, तर पाणी अगोदर का बंद केले, असा सवाल व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सदरील प्रभागातील विद्यमान नगरसेविका सविता अनिल उजळे यांच्या घरासमोरही आता जलवाहिनीच्या कामास सुरुवात करण्यात येत आहे.

पालिकेच्या या कारभाराबाबत वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका दक्ष झाली, तर काही नागरिकांनी नाइलाजास्तव नवीन नळ कनेक्शनसाठी अगोदरचे बोअर व नळ कनेक्शन असतानाही अनामत भरली आहे. सध्या कोरोनामुळे आर्थिक अडचण आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे नळ कनेक्शनसाठी पैसे कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

नागरिकांच्या दुर्लक्षामुळे काम अर्धवट...

डिसेंबरपासून आम्ही दवंडी देऊन नवीन नळ कनेक्शन घेण्याबाबत आवाहन करीत आहोत. त्यासाठी २२ पथकांची नियुक्ती करून घरोघरी जाऊन विनंती केली. मात्र, या भागातील नागरिकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे येथील जलवाहिनीचे काम अर्धवट राहिले होते. येथील बोअरचे कनेक्शन बंद केल्यानंतर नळ कनेक्शनची मागणी वाढली आहे. मागणी केल्यानंतर २४ तासांच्या आत कनेक्शन देण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील म्हणाले.