शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

उदगीर शहरात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST

कोरोनाच्या विषाणूची साखळी तुटावी म्हणून राज्य सरकार सोबत जिल्हाधिकारी यांनीसुद्धा मागील काही दिवसांपासून अनेक निर्बंध लागू केली आहेत; मात्र ...

कोरोनाच्या विषाणूची साखळी तुटावी म्हणून राज्य सरकार सोबत जिल्हाधिकारी यांनीसुद्धा मागील काही दिवसांपासून अनेक निर्बंध लागू केली आहेत; मात्र सहा दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने शुक्रवारी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली होती.

मागील काही दिवसांपासून सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा देण्यात आली होती. त्याचाच गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी यांनी ८ मे पासून १३ पर्यंत केवळ वैद्यकीय सेवा वगळता बाकी सर्व आस्थापना बंद करण्यात येत असल्याचे असे आदेश काढले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांनीसुद्धा खरेदी करण्यासाठी शहरात एकच गर्दी केली होती. पत्तेवार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुक्कावार चौक,चौबारा परिसर, किराणा मार्केट, मार्केट यार्ड, भाजी मार्केट आदींसह अनेक भागात नागरिकांनी किराणा, तेल, भाजीपाला, खाद्य पदार्थ, धान्य खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. या गर्दीत कोरोनाचा कुठलाही नियम नागरिक पाळत नसल्याचे दिसून येत होते. वास्तविक अशा गर्दीच्या ठिकाणाहूनच कोरोनासारख्या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणात होतो, नेमके हेच नागरिक विसरून गेल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत होते. केवळ वैद्यकीय सेवा वगळता बाकी सर्व व्यापारी अस्थापना पुढील सहा दिवस बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या या आदेशात नमूद केल्यामुळे व १४ तारखेला अक्षय तृतीयाचा सण आणि ११ तारखेची अमावास्या झाल्यानंतर येणारा मुस्लीम समाजाच्या पवित्र महिन्यातील रमजान सण यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड उडवली होती. अनेक दिवसांनंतर छत्रपती शिवाजी चौक, मुक्कावार चौक, मेनरोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या दिसून येत होत्या.