शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

गावच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:05 IST

प्रजासत्ताक दिनानिम्मित ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर यांच्याशी संवाद

लातूर : आपली लोकशाही जगाला आदर्श असून प्रजासत्ताकदिनी युवकांनी आपापल्या गावच्या विकासासाठी योगदान देण्याचा निश्चय केला पाहिजे़ प्रामाणिकपणे गावासाठी परिश्रम घेतले तरच परिवर्तनाची गती वाढेल, असे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर गुरुजी म्हणाले़

प्रजासत्ताकदिनानिमित्ताने ‘लोकमत’शी संवाद साधताना जीवनधर शहरकर गुरुजी म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष झाला़ परंतु, आज संघर्षाचा काळ राहिला नाही, हे युवकांनी जाणून घेतले पाहिजे़ ग्रामीण भागाचा विकास हा सर्वात मोठा प्रश्न आहे़ ग्रामीण भागाच्या दळणवळणासाठी चांगले रस्ते, घरोघरी शौचालय, साक्षरता वाढविणे गरजेचे आहे़  कर्तव्यापासून दूर होत राहिलो तर विकास होणे अशक्य आहे़ त्यामुळे आम्ही गाव, देशासाठी काय करतो, याचा विचार केला पाहिजे़ अनेकजण कुठलेही काम न करता केवळ शासनाकडे मागण्या करीत असल्याचे दिसते़ परंतु, या मागण्या पूर्ण कशा होतील? हे पाहिले जात नाही़ प्रत्येकाला गरजा असतात़ परंतु, ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे़ शहरकर गुरुजी म्हणाले, युवा पिढी ही वाचन संस्कृतीपासून दूर चालली आहे़ त्याचबरोबर आज शाळेतही शालेय अभ्यासक्रमाशिवाय अन्य ज्ञान दिले जात नाही, हे चिंतनीय आहे़

पत्नीसोबत केले रस्त्याचे काम़सन १९५५ मध्ये माझा विवाह झाला़ तेव्हा एस़एम़ जोशी यांनी उन्हाळ्यात राष्ट्रसेवा दलामार्फत उस्मानाबाद जिल्ह्यातील चिखुर्डा ते उस्मानाबादला जाणाऱ्या रस्त्यापर्यंतचा मार्ग तयार करण्यासाठी आपण दोघांनी यावे, असे सांगितले़ तेव्हा आम्ही दोघांनी तिथे २१ दिवस श्रमदान करीत रस्ता तयार केला़ याशिवाय, १९५७ मध्ये महाळंग्रा ते अहमदपूरकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंतच्या मार्गासाठीही श्रमदान केल्याचे जीवनधर शहरकर गुरुजी यांनी सांगितले़

टॅग्स :Educationशिक्षणSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानlaturलातूर