शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

गावच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:05 IST

प्रजासत्ताक दिनानिम्मित ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर यांच्याशी संवाद

लातूर : आपली लोकशाही जगाला आदर्श असून प्रजासत्ताकदिनी युवकांनी आपापल्या गावच्या विकासासाठी योगदान देण्याचा निश्चय केला पाहिजे़ प्रामाणिकपणे गावासाठी परिश्रम घेतले तरच परिवर्तनाची गती वाढेल, असे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जीवनधर शहरकर गुरुजी म्हणाले़

प्रजासत्ताकदिनानिमित्ताने ‘लोकमत’शी संवाद साधताना जीवनधर शहरकर गुरुजी म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष झाला़ परंतु, आज संघर्षाचा काळ राहिला नाही, हे युवकांनी जाणून घेतले पाहिजे़ ग्रामीण भागाचा विकास हा सर्वात मोठा प्रश्न आहे़ ग्रामीण भागाच्या दळणवळणासाठी चांगले रस्ते, घरोघरी शौचालय, साक्षरता वाढविणे गरजेचे आहे़  कर्तव्यापासून दूर होत राहिलो तर विकास होणे अशक्य आहे़ त्यामुळे आम्ही गाव, देशासाठी काय करतो, याचा विचार केला पाहिजे़ अनेकजण कुठलेही काम न करता केवळ शासनाकडे मागण्या करीत असल्याचे दिसते़ परंतु, या मागण्या पूर्ण कशा होतील? हे पाहिले जात नाही़ प्रत्येकाला गरजा असतात़ परंतु, ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे़ शहरकर गुरुजी म्हणाले, युवा पिढी ही वाचन संस्कृतीपासून दूर चालली आहे़ त्याचबरोबर आज शाळेतही शालेय अभ्यासक्रमाशिवाय अन्य ज्ञान दिले जात नाही, हे चिंतनीय आहे़

पत्नीसोबत केले रस्त्याचे काम़सन १९५५ मध्ये माझा विवाह झाला़ तेव्हा एस़एम़ जोशी यांनी उन्हाळ्यात राष्ट्रसेवा दलामार्फत उस्मानाबाद जिल्ह्यातील चिखुर्डा ते उस्मानाबादला जाणाऱ्या रस्त्यापर्यंतचा मार्ग तयार करण्यासाठी आपण दोघांनी यावे, असे सांगितले़ तेव्हा आम्ही दोघांनी तिथे २१ दिवस श्रमदान करीत रस्ता तयार केला़ याशिवाय, १९५७ मध्ये महाळंग्रा ते अहमदपूरकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंतच्या मार्गासाठीही श्रमदान केल्याचे जीवनधर शहरकर गुरुजी यांनी सांगितले़

टॅग्स :Educationशिक्षणSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानlaturलातूर