शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

चाकुरातील शवदाहिनीस गळती, नातेवाइकांचे सातत्याने हाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST

चाकूर : शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीतील शेडचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. परिणामी, पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी मृताच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. ...

चाकूर : शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीतील शेडचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. परिणामी, पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी मृताच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. पावसाचे पाणी शेडच्या मध्यभागातून पेटलेल्या चितेवर पाणी पडत असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. याशिवाय, अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाइकांना थांबण्यासाठी आसराही उपलब्ध नाही.

शहरातील एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक, मित्र परिवार सोमवारी रात्री ९ वा. च्या सुमारास येथील सार्वजनिक स्मशानभूमीत गेले. स्मशानभूमीत प्रेतावर सरण रचण्यात आले. त्यानंतर भडाग्नी देण्यात आला. तेव्हा, मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या धारा या शेडच्या मध्यभागातून शवदाहिनीत पडत होत्या. त्यामुळे पेटलेली चिता विझणार की काय, अशी भीती निर्माण झाल्याने एकाने चितेवर पाणी पडू नये, म्हणून त्यावर टोपले धरण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पावसाचा जोर आणखी वाढला आणि पेटलेल्या चितेवर पाणी पडू लागले. स्मशानभूमीत थांबण्यासाठी आसराही नसल्याने नातेवाइकांची कसरत होऊ लागली. त्यामुळे नातेवाईक पावसात थांबून मृतदेह पूर्णपणे जाळण्याचा प्रयत्न करीत होते. पावसाचे पाणी चितेवर पडू नये म्हणून प्रयत्न करणाऱ्याच्या हाताला आगीची झळ बसली.

सन २००७ मध्ये स्मशानभूमीत पत्र्याची शवदाहिनी करण्यात आली. त्यानंतर २००९ मध्ये ग्रामपंचायतीच्या काळात सिमेंट काँक्रिटची शवदाहिनी तयार करण्यात आली. या शववाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे मुश्कील ठरत आहे. सन २०१५ मध्ये ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. परंतु, शवदाहिनीकडे अद्यापपर्यंत लक्ष देण्यात आले नाही.

पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी जमा झालेल्या नागरिकांना थांबण्यासाठी शेडही उपलब्ध नाही. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नातेवाइकांतून संताप व्यक्त होत आहे. किमान मूलभूत सुविधा तरी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

तत्काळ दुरुस्ती करून घेण्यात येईल...

सध्या नगरपंचायतीवर प्रशासक आहे. शवदाहिनीच्या वरच्या भागातून पाणी गळते. त्याची तत्काळ दुरुस्ती करून घेण्यात येणार आहे. नवीन शवदाहिनीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

- अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी, नगरपंचायत.