शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST

एमपीएससीची परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात यावी, रद्द करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दहावी, बारावी, विद्यापीठ व अन्य परीक्षा ...

एमपीएससीची परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात यावी, रद्द करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दहावी, बारावी, विद्यापीठ व अन्य परीक्षा घेतल्या जात आहेत. लोकसेवा आयोगाची परीक्षा का रद्द केली जात आहे. यापुर्वी पाच ते सहा वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातून सुमारे १० हजार विद्यार्थी तयारी करीत आहेत. अनेकांची तयारी पुर्ण झाली आहे. मात्र, अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. रेल्वे, एनटीपीसी, युपीएससी, बँकीग, आरोग्य सेवा तसेच मागील वर्षातील नीट, जेईई या सर्व परीक्षा झाल्या आहेत. परंतू, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मागील परीक्षा झालेली नाही. तसेच २०२१ मधील वेळापत्रक देण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. सत्तेत येण्यापुर्वी देण्यात आलेले आश्वासन सरकार का पाळत नाही, असा सवालही विद्यार्थ्यांनी केला. आंदोलनात भागवत फड, परशुराम जोगदंड, सोमनाथ वाघमाेडे, अमोल कदम, माधव पवार, विकास ढाकणे, शिवराज जोगदंड, प्रशांत डोंगरे, शंकर जाधव, विठ्ठल चव्हाण, तुकाराम वाघ, विजय गायकवाड, तुळशीदास पौळ, सतिश सकनुरे, आबासाहेब पौळ, सुमित पाटील, गजानन सरकाळे, ज्ञानेश्वर करदाळे, आदींसह हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

अडीच हजार जागा रिक्त...

वेगवेगळ्या पदाच्या अडीच हजार जागा रिक्त आहेत. त्याची जाहीरात काढली जात नाही. कोणतेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. आता तर राज्यसेवेची पुर्व परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय चुकीचा आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. परीक्षा तात्काळ घेणे आवश्यक आहे. - शंकर जाधव

सहावेळा पुढे ढकलली परीक्षा...

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि शासनाने सहावेळा ही परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. विद्यापीठांच्या तसेच अन्य संस्थाच्या परीक्षा होत असताना एमपीएससीच्या परीक्षेलाच का निर्बंध घातले जात आहेत. शासनाने तात्काळ परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा - भागवत फड

जिल्ह्यातून कमीत कमी १० हजार विद्यार्थी तयारी करीत आहे. कोरोना संसर्गाच्या नावाखाली त्यांचे भविष्य शासन का अंधारात ठेवत आहे. मी परीक्षेची पुर्ण तयारी केली आहे. परंतू आता सध्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अडचण झाली आहे. - विजय गायकवाड

परीक्षेची तयारी पुर्ण झाली होती. १४ मार्चला परीक्षा होती. हॉलतिकीट आले आहे. मी दोन वर्षांपासून तयारी करतोय. दोनशे जागांसाठी २ लाख ७८ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. आणि सरकार परीक्षा पुढे ढकलत आहे. सरकारचा हा निर्णय चुकीचा आणि विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे. - शिवराज जाेगदंड

ग्रामीण भागातील मुले आता स्पर्धा परीक्षेत येत आहेत. त्यात त्यांना यशही येत आहे. आमचे आई-वडील व्याजाने पैसे काढून मुलांना शिकवितात. मात्र, सरकार स्पर्धा परीक्षांबाबत गंभीर नाही. कोरोनाचे कारण सांगुन ग्रामीण मुलांवर अन्याय करीत आहे. - सोमनाथ वाघमोडे