शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST

एमपीएससीची परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात यावी, रद्द करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दहावी, बारावी, विद्यापीठ व अन्य परीक्षा ...

एमपीएससीची परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात यावी, रद्द करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दहावी, बारावी, विद्यापीठ व अन्य परीक्षा घेतल्या जात आहेत. लोकसेवा आयोगाची परीक्षा का रद्द केली जात आहे. यापुर्वी पाच ते सहा वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातून सुमारे १० हजार विद्यार्थी तयारी करीत आहेत. अनेकांची तयारी पुर्ण झाली आहे. मात्र, अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. रेल्वे, एनटीपीसी, युपीएससी, बँकीग, आरोग्य सेवा तसेच मागील वर्षातील नीट, जेईई या सर्व परीक्षा झाल्या आहेत. परंतू, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मागील परीक्षा झालेली नाही. तसेच २०२१ मधील वेळापत्रक देण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. सत्तेत येण्यापुर्वी देण्यात आलेले आश्वासन सरकार का पाळत नाही, असा सवालही विद्यार्थ्यांनी केला. आंदोलनात भागवत फड, परशुराम जोगदंड, सोमनाथ वाघमाेडे, अमोल कदम, माधव पवार, विकास ढाकणे, शिवराज जोगदंड, प्रशांत डोंगरे, शंकर जाधव, विठ्ठल चव्हाण, तुकाराम वाघ, विजय गायकवाड, तुळशीदास पौळ, सतिश सकनुरे, आबासाहेब पौळ, सुमित पाटील, गजानन सरकाळे, ज्ञानेश्वर करदाळे, आदींसह हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

अडीच हजार जागा रिक्त...

वेगवेगळ्या पदाच्या अडीच हजार जागा रिक्त आहेत. त्याची जाहीरात काढली जात नाही. कोणतेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. आता तर राज्यसेवेची पुर्व परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय चुकीचा आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. परीक्षा तात्काळ घेणे आवश्यक आहे. - शंकर जाधव

सहावेळा पुढे ढकलली परीक्षा...

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि शासनाने सहावेळा ही परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. विद्यापीठांच्या तसेच अन्य संस्थाच्या परीक्षा होत असताना एमपीएससीच्या परीक्षेलाच का निर्बंध घातले जात आहेत. शासनाने तात्काळ परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा - भागवत फड

जिल्ह्यातून कमीत कमी १० हजार विद्यार्थी तयारी करीत आहे. कोरोना संसर्गाच्या नावाखाली त्यांचे भविष्य शासन का अंधारात ठेवत आहे. मी परीक्षेची पुर्ण तयारी केली आहे. परंतू आता सध्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अडचण झाली आहे. - विजय गायकवाड

परीक्षेची तयारी पुर्ण झाली होती. १४ मार्चला परीक्षा होती. हॉलतिकीट आले आहे. मी दोन वर्षांपासून तयारी करतोय. दोनशे जागांसाठी २ लाख ७८ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. आणि सरकार परीक्षा पुढे ढकलत आहे. सरकारचा हा निर्णय चुकीचा आणि विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे. - शिवराज जाेगदंड

ग्रामीण भागातील मुले आता स्पर्धा परीक्षेत येत आहेत. त्यात त्यांना यशही येत आहे. आमचे आई-वडील व्याजाने पैसे काढून मुलांना शिकवितात. मात्र, सरकार स्पर्धा परीक्षांबाबत गंभीर नाही. कोरोनाचे कारण सांगुन ग्रामीण मुलांवर अन्याय करीत आहे. - सोमनाथ वाघमोडे