शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
3
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
4
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
5
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
6
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
7
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
8
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
9
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
10
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
11
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
12
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
13
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
14
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
15
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
16
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
17
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
18
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
19
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST

एमपीएससीची परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात यावी, रद्द करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दहावी, बारावी, विद्यापीठ व अन्य परीक्षा ...

एमपीएससीची परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात यावी, रद्द करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दहावी, बारावी, विद्यापीठ व अन्य परीक्षा घेतल्या जात आहेत. लोकसेवा आयोगाची परीक्षा का रद्द केली जात आहे. यापुर्वी पाच ते सहा वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातून सुमारे १० हजार विद्यार्थी तयारी करीत आहेत. अनेकांची तयारी पुर्ण झाली आहे. मात्र, अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. रेल्वे, एनटीपीसी, युपीएससी, बँकीग, आरोग्य सेवा तसेच मागील वर्षातील नीट, जेईई या सर्व परीक्षा झाल्या आहेत. परंतू, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मागील परीक्षा झालेली नाही. तसेच २०२१ मधील वेळापत्रक देण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. सत्तेत येण्यापुर्वी देण्यात आलेले आश्वासन सरकार का पाळत नाही, असा सवालही विद्यार्थ्यांनी केला. आंदोलनात भागवत फड, परशुराम जोगदंड, सोमनाथ वाघमाेडे, अमोल कदम, माधव पवार, विकास ढाकणे, शिवराज जोगदंड, प्रशांत डोंगरे, शंकर जाधव, विठ्ठल चव्हाण, तुकाराम वाघ, विजय गायकवाड, तुळशीदास पौळ, सतिश सकनुरे, आबासाहेब पौळ, सुमित पाटील, गजानन सरकाळे, ज्ञानेश्वर करदाळे, आदींसह हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

अडीच हजार जागा रिक्त...

वेगवेगळ्या पदाच्या अडीच हजार जागा रिक्त आहेत. त्याची जाहीरात काढली जात नाही. कोणतेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. आता तर राज्यसेवेची पुर्व परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय चुकीचा आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. परीक्षा तात्काळ घेणे आवश्यक आहे. - शंकर जाधव

सहावेळा पुढे ढकलली परीक्षा...

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि शासनाने सहावेळा ही परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. विद्यापीठांच्या तसेच अन्य संस्थाच्या परीक्षा होत असताना एमपीएससीच्या परीक्षेलाच का निर्बंध घातले जात आहेत. शासनाने तात्काळ परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा - भागवत फड

जिल्ह्यातून कमीत कमी १० हजार विद्यार्थी तयारी करीत आहे. कोरोना संसर्गाच्या नावाखाली त्यांचे भविष्य शासन का अंधारात ठेवत आहे. मी परीक्षेची पुर्ण तयारी केली आहे. परंतू आता सध्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अडचण झाली आहे. - विजय गायकवाड

परीक्षेची तयारी पुर्ण झाली होती. १४ मार्चला परीक्षा होती. हॉलतिकीट आले आहे. मी दोन वर्षांपासून तयारी करतोय. दोनशे जागांसाठी २ लाख ७८ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. आणि सरकार परीक्षा पुढे ढकलत आहे. सरकारचा हा निर्णय चुकीचा आणि विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे. - शिवराज जाेगदंड

ग्रामीण भागातील मुले आता स्पर्धा परीक्षेत येत आहेत. त्यात त्यांना यशही येत आहे. आमचे आई-वडील व्याजाने पैसे काढून मुलांना शिकवितात. मात्र, सरकार स्पर्धा परीक्षांबाबत गंभीर नाही. कोरोनाचे कारण सांगुन ग्रामीण मुलांवर अन्याय करीत आहे. - सोमनाथ वाघमोडे