शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST

एमपीएससीची परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात यावी, रद्द करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दहावी, बारावी, विद्यापीठ व अन्य परीक्षा ...

एमपीएससीची परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात यावी, रद्द करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दहावी, बारावी, विद्यापीठ व अन्य परीक्षा घेतल्या जात आहेत. लोकसेवा आयोगाची परीक्षा का रद्द केली जात आहे. यापुर्वी पाच ते सहा वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातून सुमारे १० हजार विद्यार्थी तयारी करीत आहेत. अनेकांची तयारी पुर्ण झाली आहे. मात्र, अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. रेल्वे, एनटीपीसी, युपीएससी, बँकीग, आरोग्य सेवा तसेच मागील वर्षातील नीट, जेईई या सर्व परीक्षा झाल्या आहेत. परंतू, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मागील परीक्षा झालेली नाही. तसेच २०२१ मधील वेळापत्रक देण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. सत्तेत येण्यापुर्वी देण्यात आलेले आश्वासन सरकार का पाळत नाही, असा सवालही विद्यार्थ्यांनी केला. आंदोलनात भागवत फड, परशुराम जोगदंड, सोमनाथ वाघमाेडे, अमोल कदम, माधव पवार, विकास ढाकणे, शिवराज जोगदंड, प्रशांत डोंगरे, शंकर जाधव, विठ्ठल चव्हाण, तुकाराम वाघ, विजय गायकवाड, तुळशीदास पौळ, सतिश सकनुरे, आबासाहेब पौळ, सुमित पाटील, गजानन सरकाळे, ज्ञानेश्वर करदाळे, आदींसह हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

अडीच हजार जागा रिक्त...

वेगवेगळ्या पदाच्या अडीच हजार जागा रिक्त आहेत. त्याची जाहीरात काढली जात नाही. कोणतेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. आता तर राज्यसेवेची पुर्व परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय चुकीचा आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. परीक्षा तात्काळ घेणे आवश्यक आहे. - शंकर जाधव

सहावेळा पुढे ढकलली परीक्षा...

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि शासनाने सहावेळा ही परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. विद्यापीठांच्या तसेच अन्य संस्थाच्या परीक्षा होत असताना एमपीएससीच्या परीक्षेलाच का निर्बंध घातले जात आहेत. शासनाने तात्काळ परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा - भागवत फड

जिल्ह्यातून कमीत कमी १० हजार विद्यार्थी तयारी करीत आहे. कोरोना संसर्गाच्या नावाखाली त्यांचे भविष्य शासन का अंधारात ठेवत आहे. मी परीक्षेची पुर्ण तयारी केली आहे. परंतू आता सध्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अडचण झाली आहे. - विजय गायकवाड

परीक्षेची तयारी पुर्ण झाली होती. १४ मार्चला परीक्षा होती. हॉलतिकीट आले आहे. मी दोन वर्षांपासून तयारी करतोय. दोनशे जागांसाठी २ लाख ७८ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. आणि सरकार परीक्षा पुढे ढकलत आहे. सरकारचा हा निर्णय चुकीचा आणि विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे. - शिवराज जाेगदंड

ग्रामीण भागातील मुले आता स्पर्धा परीक्षेत येत आहेत. त्यात त्यांना यशही येत आहे. आमचे आई-वडील व्याजाने पैसे काढून मुलांना शिकवितात. मात्र, सरकार स्पर्धा परीक्षांबाबत गंभीर नाही. कोरोनाचे कारण सांगुन ग्रामीण मुलांवर अन्याय करीत आहे. - सोमनाथ वाघमोडे