शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

उजनीत शेतकऱ्यांचे साखळी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST

गत खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान झालेल्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार ऑनलाईन दाखल करण्यास ...

गत खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान झालेल्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार ऑनलाईन दाखल करण्यास सांगण्यात आले होते. परंतु , जनजागृतीचा अभाव तसेच शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारे रस्ते पावसामुळे बंद झाल्यामुळे आणि मोबाईल नेटवर्क बंद पडल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार दाखल करता आली नाही. दरम्यान, कृषी आयुक्तांनी जे शेतकरी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकले नाहीत, त्यांनी ऑफलाईन अर्ज दाखल केला तरी तो दाखल करून घ्यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे शेतकरी जेव्हा ऑफलाईन अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते, तेव्हा कंपनीने अर्ज स्वीकारले नाहीत.

औसा तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा ऑफलाईन अर्ज कंपनीकडून स्वीकारला गेला नाही. जे शेतकरी काढणी पश्‍चात ऑफलाईन अथवा ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात अपयशी ठरले. त्यांच्यासाठी सरकारने केलेले पंचनामे ग्राह्य धरून कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे आंदोलन अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. या आंदोलनात वांगजी, चिंचोली, वडजी, आशिव येथील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

शेतकऱ्यांना न्याय द्यावा...

पीक विमा कंपनी जाचक अटी लावून शेतकऱ्यांना विमा परतावा देण्यापासून वगळण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. शासन आणि पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अजिंक्य शिंदे यांनी केली आहे.