शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनामुळे हाेतेय किडनीचे नुकसान, वेळीच काळजी घ्या ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:15 IST

लातूर : काेराेनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा कहर अधिक हाेता. त्यामुळे या काळात मृत्यूंचे प्रमाणही अधिक हाेते. आता ...

लातूर : काेराेनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा कहर अधिक हाेता. त्यामुळे या काळात मृत्यूंचे प्रमाणही अधिक हाेते. आता काेराेना विषाणूमुळे काही रुग्णांना आराेग्याच्या नव्या समस्या भेडसावत आहेत. शरिरातील वेगवेगळ्या अवयवांवर काेराेना विषाणूचा परिणाम हाेत आहे. विविध आजारांनी रुग्ण बेजार झाले असून, किडनीचे साैम्य आजाराचे प्रमाणही समाेर आले आहे. काहींना डायलिसिस तर काहींना किडनी प्रत्याराेपण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे किडनीबाबत काही लक्षणे आढळून आली तर तातडीने डाॅक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. लातूर जिल्ह्यात काेराेनाच्या पहिल्या लाटेवर प्रशासनाला नियंत्रण मिळवता आले. त्यानंतर टप्प्याटप्प्यांनी बाधितांची संख्या वाढत गेली. दुसऱ्या लाटेने सर्वच जनजीवन प्रभावित झाले. रुग्णालयात खाटाही अपुऱ्या पडू लागल्या. आता काेराेनाचा प्रभाव ओसरु लागला आहे. मात्र, काेराेनातून बरे झालेल्या बाधितांना नवनवीन आराेग्याच्या समस्या भेडसावत आहेत. एप्रिलमध्ये काेराेनाबाधितांचा आकडा हजारांच्या पुढे गेला हाेता. सध्या काेराेना रुग्णांची संख्या घटली असली, तरी काेराेनानंतर वेगवेगळ्या आजारांनी रुग्ण आणि कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. पाेटदुखी, सांधेदुखी, शरिरावर खाज येणे, किडनी, हृदयराेग, मधुमेहासह इतर आजारांना त्यांना ताेंड द्यावे लागत आहे.

किडनीचा रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यास

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना बाधा झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. काेराेनाची बाधा झाल्यानंतर काही आजार असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यात किडनी, मधुमेह, हृदयविकार, पाेटदुखी, सांधेदुखी आदी आजार असलेल्यांनी आपल्या फॅमिली डाॅक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावेत.

हे करा

काेराेनाचा कहर आता ओसरत असल्याने बाजारपेठांतही गर्दी हाेत आहे. त्यामुळे गर्दीत जाण्याचे टाळावे.

राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सकस आहार घ्या, दररोज व्यायाम, याेगासने करण्याची गरज आहे.

घराबाहेर पडल्यानंतर मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, सतत हात धुवा, साेशल डिस्टन्सिंग पाळा.

हे करु नका

काेराेनाबाधित रुग्णांची परिस्थिती पाहून उपचारासाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या आणि निर्णय घ्या.

काेणत्याही प्रकारचा आजार, अंगदुखी, ताप, खाेकला अंगावर काढू नका शिवाय मनानेच गाेळ्या-औषधे घेऊ नका.

काही प्राथमिक लक्षणे आढळल्यास, आपल्या फॅमिली डाॅक्टरांचा तातडीने सल्ला घ्यावा.