शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पशुपालकांनो जनावरांना द्या लस अन् ताप, गर्भपात, वासरांचा मृत्यू टाळा 

By हरी मोकाशे | Updated: January 6, 2024 17:43 IST

विषाणूजन्य आजारांवर प्रतिबंधात्मक लस

 

लातूर : पशुधनांमध्ये ताप येऊ नये, गर्भपात होऊ नये तसेच विषाणूजन्य आजार उद्भवू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात लाळ्या- खुरकत लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ५ लाख १४ हजार ६४५ जनावरांना लस देण्यात येणार आहे.

वातावरणातील बदलामुळे जनावरांमध्ये विविध आजार उद्भवतात. त्यामुळे पशुपालकांना उपचारासाठी खर्च करावा लागतो. शिवाय, वेळेत उपचार न झाल्यास पशुधन दगावण्याचीही भीती असते. परिणामी, शेतकरी, पशुपालकांची आर्थिक हानी होते. अशाप्रकारचे नुकसान होऊ नये तसेच जनावरे व्यवस्थित रहावीत म्हणून शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वर्षातून दोनदा लाळ्या खुरकत लसीकरण मोहीम राबविण्यात येते. जिल्ह्यातील १ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली असून १५ फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. प्रत्येक पशुपालकांनी आपल्या पशुधनास लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले आहे.

४ लाख ३७ हजार लसी उपलब्ध...जिल्ह्यात गाय व म्हैस वर्गीय पशुधन ५ लाख १४ हजार ६४५ आहेत. शासनाकडून लाळ्या खुरकत रोग प्रतिबंधात्मकच्या ४ लाख ३७ हजार ५०० लसी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १२९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्याअंतर्गत गाय व म्हशीस लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात १ लाख ४५ हजार शेळ्या तर ३५ हजार मेंढ्या आहेत. त्यांच्यासाठीही १ लाख ८४ हजार लसी उपलब्ध झाल्या असून त्यांनाही लसीकरण केले जात आहे.

लसीअभावी अशा प्रकारचे होऊ शकतात आजार...गायी- म्हशीस लाळ्या खुरकत लस न दिल्यास जनावरांत तोंड येणे, ताप येणे, दूध उत्पादनात घट होणे, पशुधनाची कार्यक्षमता कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. शिवाय, गर्भपात होणे, लहान वासरु दगावण्याचीही भीती असते. तसेच शेळ्या- मेंढ्यांमध्ये हगवण लागणे, तोंड येणे, ताप येणे, चारा खाणे बंद होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्याचबरोबर लहान पिलांचा मृत्यूहीही होण्याची भीती असते.

पशुधनास लस द्यावी...जनावरांतील विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी गायी- म्हशीस लाळ्या खुरकत लसीकरण करुन घ्यावे. तसेच शेळ्या- मेंढ्यांनाही लस देऊन घ्यावी. त्यामुळे पशुधन व्यवस्थित राहील. सदरील आजार उद्भवण्याची भीती राहणार नाही. लसीकरणासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनास लसीकरण करुन घ्यावे.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

 

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी