शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा परिवार एफआरपीपेक्षा अधिक भाव देण्याची परंपरा कायम राखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST

लातूर : मांजरा परिवारातील साखर कारखान्यांची वाटचाल उद्दिष्टपूर्ती करणारी असून, ती पुढेही कायम राहणार आहे. परिवारातील साखर कारखान्यांनी गाळप ...

लातूर : मांजरा परिवारातील साखर कारखान्यांची वाटचाल उद्दिष्टपूर्ती करणारी असून, ती पुढेही कायम राहणार आहे. परिवारातील साखर कारखान्यांनी गाळप ऊसाला एफआरपीपेक्षा अधिकचा भाव दिला असून, आगामी काळातही ही परंपरा कायम राहणार आहे. त्यामुळे लोकप्रियतेसाठी पत्रकबाजी करणाऱ्या मंडळींच्या स्टंटबाजीकडे शेतकरी सभासदांनी दुर्लक्ष करावे, असे प्रतिपादन लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी केले.

लोकनेते विलासराव देशमुख यांनी मांजरा कारखान्याची उभारणी करुन साखर कारखानदारी यशस्वी करुन दाखवली. मांजरा परिवाराचा विलास युनिट १, युनिट २, रेणा, जागृती असा विस्तार झाला असून, या सर्वच साखर कारखान्यांनी विक्रम मोडीत काढत नावलौकिक मिळवला आहे. परिवारातील साखर कारखान्यांनी नेहमीच सभासदांच्या ऊसाला एफआरपीपेक्षा अधिक भाव देण्याची परंपरा चालवली आहे. केवळ ऊसाला भाव देऊन न थांबता ऊस विकास, कामगार, कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजना तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासचे प्रकल्पही कारखान्यांच्यावतीने राबविण्यात येत आहेत. मात्र, आमदार रमेश कराड यांनी मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस बिल द्यावे, म्हणून आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. मांजरा परिवाराकडून एफआरपीपेक्षाही अधिकचा भाव मिळणार आहे, हे त्यांनाही माहिती आहे. मात्र, आंदोलन केले म्हणून तो मिळाला हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असून, आमदार कराड यांनी केवळ मांजरा परिवारावरच न बोलता रेणापूरजवळील पन्नगेश्वर, बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकमंगल या कारखान्यांच्या बाबतीतही पत्रकबाजी करुन त्या कारखान्यांच्या सभासदांवरील अन्याय दूर करणे आवश्यक असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी पत्रकात म्हटले आहे.