शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

मांजरा परिवार एफआरपीपेक्षा अधिक भाव देण्याची परंपरा कायम राखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST

लातूर : मांजरा परिवारातील साखर कारखान्यांची वाटचाल उद्दिष्टपूर्ती करणारी असून, ती पुढेही कायम राहणार आहे. परिवारातील साखर कारखान्यांनी गाळप ...

लातूर : मांजरा परिवारातील साखर कारखान्यांची वाटचाल उद्दिष्टपूर्ती करणारी असून, ती पुढेही कायम राहणार आहे. परिवारातील साखर कारखान्यांनी गाळप ऊसाला एफआरपीपेक्षा अधिकचा भाव दिला असून, आगामी काळातही ही परंपरा कायम राहणार आहे. त्यामुळे लोकप्रियतेसाठी पत्रकबाजी करणाऱ्या मंडळींच्या स्टंटबाजीकडे शेतकरी सभासदांनी दुर्लक्ष करावे, असे प्रतिपादन लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी केले.

लोकनेते विलासराव देशमुख यांनी मांजरा कारखान्याची उभारणी करुन साखर कारखानदारी यशस्वी करुन दाखवली. मांजरा परिवाराचा विलास युनिट १, युनिट २, रेणा, जागृती असा विस्तार झाला असून, या सर्वच साखर कारखान्यांनी विक्रम मोडीत काढत नावलौकिक मिळवला आहे. परिवारातील साखर कारखान्यांनी नेहमीच सभासदांच्या ऊसाला एफआरपीपेक्षा अधिक भाव देण्याची परंपरा चालवली आहे. केवळ ऊसाला भाव देऊन न थांबता ऊस विकास, कामगार, कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजना तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासचे प्रकल्पही कारखान्यांच्यावतीने राबविण्यात येत आहेत. मात्र, आमदार रमेश कराड यांनी मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस बिल द्यावे, म्हणून आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. मांजरा परिवाराकडून एफआरपीपेक्षाही अधिकचा भाव मिळणार आहे, हे त्यांनाही माहिती आहे. मात्र, आंदोलन केले म्हणून तो मिळाला हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असून, आमदार कराड यांनी केवळ मांजरा परिवारावरच न बोलता रेणापूरजवळील पन्नगेश्वर, बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकमंगल या कारखान्यांच्या बाबतीतही पत्रकबाजी करुन त्या कारखान्यांच्या सभासदांवरील अन्याय दूर करणे आवश्यक असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी पत्रकात म्हटले आहे.