शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

मांजरा धरण शंभर टक्के भरले; पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उजव्या कालव्यातून विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

२०१६ मध्ये लातूर शहरांमध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतरच्या पावसाळ्यात मांजरा धरण शंभर टक्के भरले. २०१६ पासून सतत ...

२०१६ मध्ये लातूर शहरांमध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतरच्या पावसाळ्यात मांजरा धरण शंभर टक्के भरले. २०१६ पासून सतत प्रकल्पामध्ये मुबलक पाणीसाठा झाला. परिणामी, शेतीला आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. यंदाही धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी उजव्या कालव्यातून पाणी सोडले आहे. मांजरा नदीवरील लासरा ते साई, नागझरी पर्यंतचे सर्व बंधारे भरले आहेत. मांजरा नदी वाहती आहे. १६५ किमी अंतरापर्यंत पाणी आहे. नदीपात्रात मुबलक पाणी आणि मांजरा धरण भरल्यामुळे उजनीच्या पाण्याची चर्चा आता थांबली आहे. मांजरा धरणाची पाणी साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी आहे. या क्षमतेत धरण भरल्याने उजव्या कालव्यातून विसर्ग करण्यात आला असल्याचे धरणावरील शाखा अभियंता शाहूराज पाटील यांनी सांगितले.

लातूर शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा....

२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाई नंतर लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात मुबलक पाणीपुरवठा झाला असला तरी आठ दिवसआडच पाणी पुरवठा शहराला होतो आहे. शहरातील पाणी वितरण व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे चार दिवसाआड किंवा सहा दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकत नाही. मागे एकदा चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न मनपाने केला, परंतु तो यशस्वी ठरला नाही. वितरण व्यवस्था सक्षम नसल्याच्या कारणामुळे मुबलक पाणीसाठा असूनही लातूरकरांना आठ दिवसाचे पाणी साठवून ठेवावे लागत आहे. यामुळेच जिल्ह्यात डासोत्पत्ती होऊन डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले आहेत.

उजनीच्या पाण्याची चर्चा थांबली.....

लातूर शहरालगतच्या बंधारे आणि मांजरा प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे आठ दिवसांच्या ऐवजी चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिक करत आहेत. परंतु वितरण व्यवस्था मनपाने मजबूत केली नाही. शिवाय, आता पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे उजनीच्या पाण्याची चर्चाही थांबली आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या अनुषंगाने उजनीच्या पाण्याची चर्चा केली जाते. मात्र नागरीक या चर्चेत पडत नसल्याचे सध्यातरी चित्र आहे.