शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
6
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
7
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
8
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
9
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
10
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
11
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
12
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
13
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
14
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
15
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
16
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
17
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
18
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
19
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
20
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी झाली तर सखल भागांना धाेका, पावसाळ्यात या ठिकाणी न गेलेलेच बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

लातूर शहरातील पाणी साचणारी ठिकाणे... पावसाळ्याच्या दिवसात गावभागात माेठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. शिवाय, आनंदनगर, जयनगर, राजीवनगर, काेल्हे नगर, ...

लातूर शहरातील पाणी साचणारी ठिकाणे...

पावसाळ्याच्या दिवसात गावभागात माेठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. शिवाय, आनंदनगर, जयनगर, राजीवनगर, काेल्हे नगर, म्हाडा काॅलनी परिसर, मळवटी राेड परिसर, जुना औसा राेड परिसर, बरकतनगर, भीमनगर, बाैध्दनगर भागातील काही रस्त्यावर पाणी साचत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त हाेत आहे. या भागातील गटारी पावसाळ्यापूर्वी साफ करण्याची माेहीम हाती घेण्याची गरज आहे.

महापालिकेचे तेच ते रडगाणे...

लातूर शहर महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करत असल्याचा दावा करत आहे. तरीही शहरातील सखल भागात पावसाचे पाणी का साचत आहे, हे मात्र काेडे सुटत नाही. दरवर्षी थाेडासाही पाऊस झाला तरी शहरातील काही नगरामध्ये रस्त्यावरूनच पाणी वाहत असते. दरम्यान, काही ठिकाणी तलावासारखे दृश्य दिसून येत आहे. ही परिस्थिती दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात उद‌्भवत आहे.

पाणी साचण्याची कारणे...

१ लातूर शहरात पाणी साचण्याची प्रमुख कारणे सखल भाग आहे. याच भागात पाणी साचते, हा अनुभव आहे.

२ पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची माेहीम हाती घेण्याची गरज आहे. मात्र, ती प्रभावीपणे राबविली जात नसल्याने पाणी साचत आहे.

३ पाण्याचा निचरा याेग्य करण्यात न आल्याने माेठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहते.

४ पावसळ्यात पाऊस झाल्यानंतर गटारीतून वाहणारे पाणी बाहेर पडते आणि ते पाणी परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी साचते.

पाउस नकाे नकाे सा...

पावसाळ्यात थाेडासाही पाउस झाला तरी, आमच्या भागात पाणी साचते. या भागातील रस्त्यांची काम व्यवस्थित झाली नाहीत. शिवाय, गटारींचीही कामेही अद्याप व्यवस्थित झाली नाहीत. त्याचबराेबर महानगर पालिकेच्यावतीने गटारींची स्वच्छता वेळेवर करण्यात येत नसल्याने पावसाळ्यात या गटारी तुंबतात. यातून सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे.

- बाबुराव गायकवाड, लातूर

पावसाळ्याचे दिवस असल्याने सखल भागात, झाेपडपट्टी परिसरात पावसाचे पाणी साचत आहे. जयनगर, राजीवनगर झाेपडपट्टीत अद्यापही रस्ते, गटारी आणि इतर सुविधांचा अभाव आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. परिणामी, पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर चिखल आणि त्यातच पावसाचे पाणी ठिकठिकाणी थांबत असल्याने नागरिकांची गैरसाेय हाेत आहे.

- पवन जाधव, लातूर