शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

उदगीरातील व्यापा-यांसाठी काेरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:19 IST

काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली ...

काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. काही नियमांमध्ये बदल करुन अधिक कडक केले आहेत. दरम्यान, शहरातील गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शहरात रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, आता सोमवारपासून शहरात ज्या व्यापाऱ्यांची दुकाने आहेत, त्या दुकानातील व्यापाऱ्यांनी व त्यांच्या नोकरांनी कोरोनाची चाचणी करून घेणे अत्यावश्यक आहे. जर कोणी कोरोनाची चाचणी करुन घेतली असेल व सदरील तपासणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तर तो अहवाल दुकानातील दर्शनी भागात लावावा. नगरपालिकेचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी अथवा अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाचे कर्मचारी तपासणीसाठी आले असता त्यांना सदरील अहवाल दाखवावा. जर असा अहवाल प्रशासनातील अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्याला आढळून न आल्यास अशा दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

सर्वांनी नियमांचे पालन करावे...

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तो रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी शहरातील व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले आहे.