शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

उदगीरच्या मतदारांचा कौल मिळविण्यासाठी उमेदवारांची धडपड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 20:34 IST

उमेदवारांनी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करून प्रचार यंत्रणा उभी केली आहे.

उदगीर / जळकोट : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मागील लोकसभा, विधानसभा, नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे वर्चस्व असून, भाजपने मारलेली मुसंडी रोखण्यासाठी काँग्रेससमोर मोठे आव्हान आहे. जळकोट तालुक्यातही काँग्रेस, भाजपात तुल्यबळ लढत होईल, असे चित्र आहे. काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत हे स्थानिक असल्याने त्यांच्याविषयी सहानुभूती असल्याचेही दिसून येत आहे.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा त्यानंतर नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पार्टीने मताधिक्य घेत विविध संस्था ताब्यात घेतल्या. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला पाच दिवस असताना अजून एकही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या सभेचे नियोजन सुरू आहे. उदगीर पालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेची सत्ता भाजपला दिल्यास उदगीर शहराला लिंबोटीचे पाणी देण्याचे अभिवचन दिले होते. मात्र सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अभिवचनाला इथल्या स्थानिक नेत्यांनी हरताळ फासला आहे. महिन्यातून एक किंवा दोन वेळा पाणी पुरवठा होतो. लिंबोटीची योजना वादात अडकून पडलेली असताना शहरात पाईप लाईन टाकून रस्ते उखडून टाकण्याचे काम केले जात आहे. याशिवाय भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने सारी फोल ठरली असल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मतदारांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मात्र भाजपातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करून प्रचार यंत्रणा उभी केली आहे.

जळकोट तालुक्यातील काही गावे पीकविम्यातून वगळण्यात आल्याने शेतकरी सत्ताधाऱ्यांना जाब विचारत आहेत. आ. सुधाकर भालेराव यांनीही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रचार मोहीम सुुरु केली आहे. यावेळी मतदार कोणाच्या पारड्यात वजन टाकतात हे निकालानंतर स्पष्ट होईल़ 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlatur-pcलातूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019