शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

किरायेदार म्हणून आले; घरमालक समजू लागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

लातूर : शहरासह जिल्ह्यात प्रारंभी किरायेदार म्हणून वास्तव्य करणाऱ्यांकडून मूळ घरमालकांना त्रास देण्याचे प्रकार समोर आले आहेत. हे वाद ...

लातूर : शहरासह जिल्ह्यात प्रारंभी किरायेदार म्हणून वास्तव्य करणाऱ्यांकडून मूळ घरमालकांना त्रास देण्याचे प्रकार समोर आले आहेत. हे वाद स्थानिक पोलीस ठाणे आणि त्यानंतर दिवाणी न्यायालयापर्यंत पोहोचले आहेत. किरायेदार म्हणून आले आणि घरमालक समजू लागले, अशी परिस्थिती काही ठिकाणी समोर आली आहे. लातूर शहरासह उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा या शहरांत मोठ्या प्रमाणात भाडेकरूंची संख्या आहे. विशेषत: लातूरमध्ये सर्वाधिक संख्या आहे. शिक्षण, नोकरी आणि रोजगारानिमित्त आलेली कुटुंब घर भाड्याने घेऊन वास्तव्याला आहेत.

घर भाड्याने देताना अशी घ्यावी काळजी

भाडेकरू ठेवत असताना घरमालकांनी करारपत्रक करावे. दरवर्षी त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे.

दोन करारपत्रांमध्ये किमान एक महिन्याचे अंतर ठेवून करारपत्राचे नूतनीकरण करावे. यासाठी वकिलांचा सल्ला घ्यावा.

करारपत्रातील नोंदीनुसार नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, हे घरमालकांनी पाहण्याची गरज आहे.

१४५ प्रकरणे न्यायालयात

घरमालक आणि भाडेकरूंमधील वाद त्या-त्या दिवाणी न्यायालयात खटल्याच्या स्वरूपात सुरू आहेत.

भाडेकरूने विश्वास संपादन केल्याने घरमालक करारपत्र आणि नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यातूनच पुढे वाद टोकाला जातात.

लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा न्यायालयात असे जवळपास १४५ खटले सुनावणीसाठी दाखल आहेत.

लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दरवर्षी किमान २५ ते ३० तक्रारी घरमालकांकडून दाखल केल्या जातात.

ठाण्याच्या स्तरावर हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. टोकाचे वाद असतील तर हे प्रकरण दिवाणी न्यायालयात पोहोचते.

पोलिसांकडून पडताळणी करून घेण्याची गरज

एखादा भाडेकरू ठेवत असताना त्याची संबंधित पोलीस ठाण्याकडून पडताळणी करून घेण्याची गरज आहे. त्याच्याविरोधात काही गुन्हे दाखल आहेत का, याचीही खातरजमा केली पाहिजे. त्यानंतरच करारपत्र करावे. - निखिल पिंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, लातूर