शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

किरायेदार म्हणून आले; घरमालक समजू लागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

लातूर : शहरासह जिल्ह्यात प्रारंभी किरायेदार म्हणून वास्तव्य करणाऱ्यांकडून मूळ घरमालकांना त्रास देण्याचे प्रकार समोर आले आहेत. हे वाद ...

लातूर : शहरासह जिल्ह्यात प्रारंभी किरायेदार म्हणून वास्तव्य करणाऱ्यांकडून मूळ घरमालकांना त्रास देण्याचे प्रकार समोर आले आहेत. हे वाद स्थानिक पोलीस ठाणे आणि त्यानंतर दिवाणी न्यायालयापर्यंत पोहोचले आहेत. किरायेदार म्हणून आले आणि घरमालक समजू लागले, अशी परिस्थिती काही ठिकाणी समोर आली आहे. लातूर शहरासह उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा या शहरांत मोठ्या प्रमाणात भाडेकरूंची संख्या आहे. विशेषत: लातूरमध्ये सर्वाधिक संख्या आहे. शिक्षण, नोकरी आणि रोजगारानिमित्त आलेली कुटुंब घर भाड्याने घेऊन वास्तव्याला आहेत.

घर भाड्याने देताना अशी घ्यावी काळजी

भाडेकरू ठेवत असताना घरमालकांनी करारपत्रक करावे. दरवर्षी त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे.

दोन करारपत्रांमध्ये किमान एक महिन्याचे अंतर ठेवून करारपत्राचे नूतनीकरण करावे. यासाठी वकिलांचा सल्ला घ्यावा.

करारपत्रातील नोंदीनुसार नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, हे घरमालकांनी पाहण्याची गरज आहे.

१४५ प्रकरणे न्यायालयात

घरमालक आणि भाडेकरूंमधील वाद त्या-त्या दिवाणी न्यायालयात खटल्याच्या स्वरूपात सुरू आहेत.

भाडेकरूने विश्वास संपादन केल्याने घरमालक करारपत्र आणि नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यातूनच पुढे वाद टोकाला जातात.

लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा न्यायालयात असे जवळपास १४५ खटले सुनावणीसाठी दाखल आहेत.

लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दरवर्षी किमान २५ ते ३० तक्रारी घरमालकांकडून दाखल केल्या जातात.

ठाण्याच्या स्तरावर हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. टोकाचे वाद असतील तर हे प्रकरण दिवाणी न्यायालयात पोहोचते.

पोलिसांकडून पडताळणी करून घेण्याची गरज

एखादा भाडेकरू ठेवत असताना त्याची संबंधित पोलीस ठाण्याकडून पडताळणी करून घेण्याची गरज आहे. त्याच्याविरोधात काही गुन्हे दाखल आहेत का, याचीही खातरजमा केली पाहिजे. त्यानंतरच करारपत्र करावे. - निखिल पिंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, लातूर