शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

डाेक्यात दगड घालून मुंबईच्या तरुणाला पेटविले; पाच तासात आराेपी गजाआड

By राजकुमार जोंधळे | Updated: October 27, 2024 20:45 IST

भंगारवाल्याच्या अंथरुणावर झाेपला अन् जिवाला मुकला

राजकुमार जाेंधळे / लातूर : ‘माझ्या जागेवर का झाेपलास असा जाब विचारत भंगार गाेळा करणाऱ्या आराेपीने नवी मुंबईतील तरुणाच्या डाेक्यात दगड घताला अन् अंथरुण पेटवून दिले. ही घटना रविवारी लातुरातील एकनंबर चाैकात घडली. त्यानंतर तत्परतेने पाेलिसांनी पाच तासातच आराेपीला जेरबंद केले.

पाेलिसांनी सांगितले, गेल्या पंधरा वर्षांपासून फिरून भंगार गाेळा करणारा आराेपी सचिन शिवाजी वाघमारे (रा. बर्दापूर, जि. बीड) दरराेज रात्री एकनंबर चाैकात आसरा घेत हाेता. ताे ज्या जागी झाेपत. त्याच ठिकाणी, नवी मुंबईतील लक्ष्मण सुभाष गजघाटे आला. त्याने आराेपी सचिनला तेथून हुसकावून लावत ताे अंथरुणावर झाेपला. थाेड्यावेळाने सचिन राेजच्या जागेवर पुन्हा आला. तेव्हाही लक्ष्मणला झाेपलेले पाहून आराेपीने लक्ष्मणच्या डाेक्यात चारवेळा दगड घातला. ताे मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर आराेपीने अंथरुणाला पेटवून दिले. त्यामुळे लक्ष्मणचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, पाेलिस पथकामधील सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, खुर्रम काझी, संजय कांबळे, विनोद चलवाड, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, राजेश कंचे, रियाज सौदागर, मनोज खोसे, साहेबराव हाके, नितीन कठारे, राहुल कांबळे, चंद्रकांत मुंडे, बंडू निटुरे यांनी आराेपीला जेरबंद केले.

पाच तासात आराेपी अटक...

गुन्ह्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पाेलिसांनी आराेपीला शहरातच पाच तासात अटक केली. त्याच्याकडे मयत तरुणाचा माेबाईल व घड्याळ आढळून आले. घटनाक्रम रुग्णालय आणि नजीकच्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.

नवी मुंबईहून लातुरात बहिणीकडे...

लक्ष्मण गजघाटे नवी मुंबई येथून २४ ऑक्टोबर रोजी लातुरातील बहिणीकडे औषधोपचारासाठी आला होता. पाेलिसांनी सांगितले, तो दारू पीत असल्याने उपचारात अडचणी येत होत्या. ताे २६ ऑक्टाेबर राेजी दुपारी चार वाजता बाहेर जाऊन येतो म्हणून बाहेर पडला हाेता.

गुन्ह्याची पार्श्वभूमी नाही...

गुन्ह्यातील आरोपी व मयत हे एकमेकाला ओळखत नसून त्यांचा आपसामध्ये संबंध नाही. आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी नसून, किरकोळ कारणावरून खून झाल्याचे स्पष्ट आहे. यापूर्वी घडलेल्या खुनाच्या घटनाही व्यक्तिगत, किरकाेळ कारणातून झाल्या असून, त्यातील आराेपींना अटक केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पाेलिस यंत्रणा सतर्क आहे. - साेमय मुंडे, जिल्हा पाेलिस अधीक्षक.