शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डाेक्यात दगड घालून मुंबईच्या तरुणाला पेटविले; पाच तासात आराेपी गजाआड

By राजकुमार जोंधळे | Updated: October 27, 2024 20:45 IST

भंगारवाल्याच्या अंथरुणावर झाेपला अन् जिवाला मुकला

राजकुमार जाेंधळे / लातूर : ‘माझ्या जागेवर का झाेपलास असा जाब विचारत भंगार गाेळा करणाऱ्या आराेपीने नवी मुंबईतील तरुणाच्या डाेक्यात दगड घताला अन् अंथरुण पेटवून दिले. ही घटना रविवारी लातुरातील एकनंबर चाैकात घडली. त्यानंतर तत्परतेने पाेलिसांनी पाच तासातच आराेपीला जेरबंद केले.

पाेलिसांनी सांगितले, गेल्या पंधरा वर्षांपासून फिरून भंगार गाेळा करणारा आराेपी सचिन शिवाजी वाघमारे (रा. बर्दापूर, जि. बीड) दरराेज रात्री एकनंबर चाैकात आसरा घेत हाेता. ताे ज्या जागी झाेपत. त्याच ठिकाणी, नवी मुंबईतील लक्ष्मण सुभाष गजघाटे आला. त्याने आराेपी सचिनला तेथून हुसकावून लावत ताे अंथरुणावर झाेपला. थाेड्यावेळाने सचिन राेजच्या जागेवर पुन्हा आला. तेव्हाही लक्ष्मणला झाेपलेले पाहून आराेपीने लक्ष्मणच्या डाेक्यात चारवेळा दगड घातला. ताे मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर आराेपीने अंथरुणाला पेटवून दिले. त्यामुळे लक्ष्मणचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, पाेलिस पथकामधील सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, खुर्रम काझी, संजय कांबळे, विनोद चलवाड, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, राजेश कंचे, रियाज सौदागर, मनोज खोसे, साहेबराव हाके, नितीन कठारे, राहुल कांबळे, चंद्रकांत मुंडे, बंडू निटुरे यांनी आराेपीला जेरबंद केले.

पाच तासात आराेपी अटक...

गुन्ह्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पाेलिसांनी आराेपीला शहरातच पाच तासात अटक केली. त्याच्याकडे मयत तरुणाचा माेबाईल व घड्याळ आढळून आले. घटनाक्रम रुग्णालय आणि नजीकच्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.

नवी मुंबईहून लातुरात बहिणीकडे...

लक्ष्मण गजघाटे नवी मुंबई येथून २४ ऑक्टोबर रोजी लातुरातील बहिणीकडे औषधोपचारासाठी आला होता. पाेलिसांनी सांगितले, तो दारू पीत असल्याने उपचारात अडचणी येत होत्या. ताे २६ ऑक्टाेबर राेजी दुपारी चार वाजता बाहेर जाऊन येतो म्हणून बाहेर पडला हाेता.

गुन्ह्याची पार्श्वभूमी नाही...

गुन्ह्यातील आरोपी व मयत हे एकमेकाला ओळखत नसून त्यांचा आपसामध्ये संबंध नाही. आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी नसून, किरकोळ कारणावरून खून झाल्याचे स्पष्ट आहे. यापूर्वी घडलेल्या खुनाच्या घटनाही व्यक्तिगत, किरकाेळ कारणातून झाल्या असून, त्यातील आराेपींना अटक केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पाेलिस यंत्रणा सतर्क आहे. - साेमय मुंडे, जिल्हा पाेलिस अधीक्षक.