शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

रेणापूर तालुक्यातील सात रस्त्यांच्या कामांसाठी ३४ कोटींचा निधी भाजप काळात मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात परिवर्तन होऊन भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. तत्कालीन ग्रामविकास मंत्री ...

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात परिवर्तन होऊन भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नव्याने सुरू केली. या योजनेत ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होऊ लागली. रेणापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था होती. या रस्त्यांबाबत भाजप नेते रमेश कराड यांनी पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे रेणापूर तालुक्यातील सात रस्त्यांच्या कामांना तब्बल ३३ कोटी ९७ लाख रुपयांच्या खर्चाची व ४२.८१ कि.मी. लांबीच्या रस्ते कामांना मंजुरी मिळाली. पानगाव-सारोळा-माकेगाव १० कोटी ५६ लाख, पानगाव-मुसळेवाडी-फावडेवाडी ६ कोटी ३ लाख, लहानेवाडी रस्ता १ कोटी ६४ लाख, दिवेगाव रस्ता १ कोटी ७६ लाख, चाकूरवाडी रस्ता ७२ लाख, रामवाडी (ख.) सुकणी कोष्टगाव जिल्हा सरहद्द रस्ता ७ कोटी २० लाख, वसंतनगर-हाके तांडा रस्ता ६ कोटी ८ लाख याप्रमाणे सात रस्त्यांसाठी ३३ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी आमदार नसताना रमेश कराड यांनी खेचून आणला. मात्र त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांकडून होत असल्याचा आरोप भाजपचे लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे व तालुकाध्यक्ष ॲड. दशरथ भिसे यांनी केला आहे. आमदारांनी आपल्या आमदारकीच्या काळात कोणत्या रस्त्यांना मंजुरी मिळवून आणली आणि नवीन काय केले ते सांगावे, जुन्या कामाचे श्रेय लाटू नये, असेही भाजपाचे विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे व रेणापूर तालुकाध्यक्ष ॲड. दशरथ भिसे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.