शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

रेणापूर तालुक्यातील सात रस्त्यांच्या कामांसाठी ३४ कोटींचा निधी भाजप काळात मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात परिवर्तन होऊन भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. तत्कालीन ग्रामविकास मंत्री ...

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात परिवर्तन होऊन भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नव्याने सुरू केली. या योजनेत ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होऊ लागली. रेणापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था होती. या रस्त्यांबाबत भाजप नेते रमेश कराड यांनी पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे रेणापूर तालुक्यातील सात रस्त्यांच्या कामांना तब्बल ३३ कोटी ९७ लाख रुपयांच्या खर्चाची व ४२.८१ कि.मी. लांबीच्या रस्ते कामांना मंजुरी मिळाली. पानगाव-सारोळा-माकेगाव १० कोटी ५६ लाख, पानगाव-मुसळेवाडी-फावडेवाडी ६ कोटी ३ लाख, लहानेवाडी रस्ता १ कोटी ६४ लाख, दिवेगाव रस्ता १ कोटी ७६ लाख, चाकूरवाडी रस्ता ७२ लाख, रामवाडी (ख.) सुकणी कोष्टगाव जिल्हा सरहद्द रस्ता ७ कोटी २० लाख, वसंतनगर-हाके तांडा रस्ता ६ कोटी ८ लाख याप्रमाणे सात रस्त्यांसाठी ३३ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी आमदार नसताना रमेश कराड यांनी खेचून आणला. मात्र त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांकडून होत असल्याचा आरोप भाजपचे लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे व तालुकाध्यक्ष ॲड. दशरथ भिसे यांनी केला आहे. आमदारांनी आपल्या आमदारकीच्या काळात कोणत्या रस्त्यांना मंजुरी मिळवून आणली आणि नवीन काय केले ते सांगावे, जुन्या कामाचे श्रेय लाटू नये, असेही भाजपाचे विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे व रेणापूर तालुकाध्यक्ष ॲड. दशरथ भिसे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.