शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा मोठा दिलासा! शाळा, ग्रामपंचायतींना आता वीजबिलाचा राहणार नाही ताण

By हरी मोकाशे | Updated: May 20, 2023 20:07 IST

लातूर जिल्ह्यात १५ व्या वित्त आयोगातून सौर सिस्टीम उभारणी

लातूर : अपेक्षेपेक्षा अधिकच्या वीजबिलामुळे ग्रामपंचायती, शाळा हैराण होतात. काही वेळेस तर बिलापोटी महावितरणकडून वीजपुरवठाही तोडण्यात येतो. या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने नवी मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, ग्रामपंचायतीत सौर सिस्टीम बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परिणामी, शाळा आणि ग्रामपंचायतींना वीजबिलाचा ताण राहणार नाही.

जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती असून, जिल्हा परिषदेच्या १२७८ शाळा आहेत. बहुतांश शाळांमध्ये वीजजोडणी आहे. शिवाय, विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे म्हणून संगणकही आहेत. दरम्यान, काही शाळांना अपेक्षेपेक्षा अधिक वीजबिल आल्यामुळे त्याचा भरणा करण्यात येत नाही. त्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा तोडला जातो. परिणामी, शाळेतील संगणक धूळ खात पडून राहतात. शिवाय, ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र असून, त्याद्वारे ऑनलाइन प्रमाणपत्र नागरिकांना दिले जातात. तसेच ऑनलाइन नाेंदीही केल्या जातात. मात्र, सातत्याने वीजपुरवठा खंडित होणे, बिल न भरल्याने महावितरणकडून वीज कनेक्शन तोडले जाते.

या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेनुसार जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयात सौर सिस्टीम सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे शाळा, ग्रामपंचायत कार्यालय २४ तास प्रकाशमान राहणार आहेत.

एककिलो वॉटची सौर सिस्टीम...प्रत्येक शाळा, ग्रामपंचायतींसाठी एक ते दोन किलो वॉटची सौर सिस्टीम राहणार आहे. सन २०२२-२३ मधील १५व्या वित्त आयोगाचा अबंधित निधी एप्रिलमध्ये उपलब्ध झाला आहे. त्यातून हे सयंत्र उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या सिस्टीमवर पंखा, बल्ब, टीव्ही, संगणक सुरू राहतात. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांची सोय होणार आहे.

वीजविक्रीही करता येईल...या सिस्टीममुळे शाळा, ग्रामपंचायतींना पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होईल. याशिवाय, सुटीच्या दिवशी शाळा, ग्रामपंचायत कार्यालय बंद राहिल्यामुळे वीज संचय होईल आणि महावितरणकडे वळती होईल. त्यामुळे शाळा, ग्रामपंचायतीस पैसेही मिळतील. लवकरात लवकर ही सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

अपारंपारिक ऊर्जेचा वापर...सध्या वीज आणि बिलाची मोठी समस्या आहे. सौर सिस्टीम ही पर्यावरणपूरक असून, अपारंपरिक ऊर्जेचा वापर होईल. शिवाय, वीज खंडित होण्याची समस्या राहणार नाही. सीईओ अभिनव गोयल यांच्या संकल्पनेनुसार ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत. लवकरच जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायती आणि शाळा सौर ऊर्जेवर प्रकाशमान होतील.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाmahavitaranमहावितरण