शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

पर्यावरण, प्रदूषणमुक्तीसाठी जळकोटात सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST

उद्घाटन उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी व मुख्याधिकारी भरत राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. सायकल रॅलीमध्ये शहरातील ...

उद्घाटन उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी व मुख्याधिकारी भरत राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. सायकल रॅलीमध्ये शहरातील जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. तसेच उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, मुख्याधिकारी भारत राठोड यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघून हनुमान मंदिर, गुरुदत्त विद्यालयमार्गे मार्केट यार्डातून नगरपंचायत कार्यालय परिसरात पोहोचली. त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष किशन धुळशेट्टे, उस्मान मोमीन, महेश धुळशेट्टे, सोमेश्वर सोप्पा, बालाजी केंद्रे, सुभाष बनसोडे, राजू डांगे, संग्राम नामवाड, ओमकार धुळशेट्टे, माधव होनराव, मुक्रम बंडे, बाळू देवशेट्टे, धनंजय भ्रमण्णा, राहुल किडे, कपिल पाटील, पिराजी कोकणे, ललिताबाई गायकवाड यांच्यासह प्रशासन अधिकारी विघ्नेश मुंडे, मजीद शेख, केशव पिनाटे, स्वरूप चिरके, बागवान, सरूबाई चव्हाण, अनंत कांबळे आदी उपस्थित होते.

नागरिकांनी मांडल्या अडचणी...

उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी नागरिकांची भेट घेऊन शहरातील काही भागांत पाणीपुरवठा होत नाही. हातपंप बंद आहेत. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशा तक्रारी मांडल्या. तेव्हा मेंगशेट्टी यांनी नगरपंचायतीच्या कर्मचा-यांना समक्ष बोलावून घेऊन तत्काळ सोडविण्याच्या सूचना केल्या. दिवसेंदिवस वायुप्रदूषण वाढत आहे. वाहनांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी सायकलचा वापर करावा. यापुढेही महिन्यातून किमान एक दिवस नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी सायकलने कार्यालयात येतील, असे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी सांगितले.