शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

‘सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : विविध मोबाईल कंपन्यांकडून व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. २४ तासांत तुमचे सिम ब्लाॅक होईल, असे मेसेज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : विविध मोबाईल कंपन्यांकडून व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. २४ तासांत तुमचे सिम ब्लाॅक होईल, असे मेसेज पाठवून, मोबाईलधारकांना फसविण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. या माध्यमातून काहीजणांची फसवणूक झाल्याची तक्रारही सायबर सेलकडे तपासासाठी दाखल झाली आहे.

सोशल मीडियाचा वापर करून हनिट्रॅपसारख्या घटना घडवून आणल्या जात आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांकडून बोलतो, असे सांगत सविस्तर माहिती विचारली जाते. त्यातून बँक खात्यातील रक्कम परस्पर लंपास केली जाते. आता ‘सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज पाठविला जात आहे. मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीला थेट संपर्क केला जात आहे. यातून त्यांची फसवणूक केली जात आहे. ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. त्यापाठोपाठ पैशाची मागणी केली जात आहे. समोरून महिला अथवा मुली बोलत असल्याने काही मोबाईलधारक या बोलण्याला बळी पडत आहेत. वारंवार पोलीस प्रशासनाच्या सायबर सेलकडून सावधानतेचा इशारा दिला जात आहे. मात्र गोड बोलण्याला अनेकजण बळी पडत असल्याचे समोर आले आहे. याबाबत सायबर सेलकडे २०१९-२० आणि २०२१ या अडीच वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. पोलीस आणि सायबर सेल अशा गुन्ह्यांचा तपास करीत आहे.

ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी...

आपल्या मोबाईलवर मेसेज येतो. अमुक अमुक ॲप डाऊनलोड करा, असे सांगितले जाते. अशा वेळी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. या ॲपची गरज आणि त्यातून आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी.

असा काॅल, मेसेज आल्यास मोबाईलधारकांनो, सावधान...

आपल्या मोबाईलवर निनावी क्रमांकावरून मेसेज आला असेल तर याबाबत अधिक जागरूकपणे खातरजमा करावी. त्यानंतरच त्याला रिप्लाय द्यावा. बहुतांश वेळा चुकीचे मेसेज आणि काॅल येतात.

व्हेरिफिकेशनच्या नावाखाली विचारण्यात येणारी माहिती, करण्यात येणारा काॅल आपली फसवणूक करणारा असू शकतो. यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यायला बाळगावी.

फेक अकाऊंटवरून आपल्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न होतो. अशा वेळी अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग अथवा मैत्री करणे आपल्याला महागात पडू शकते, हे टाळण्यासाठी दक्ष राहावे.

अशी घ्या काळजी...

सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारचे आमिष दाखविणारे फेक मेसेज व्हायरल केले जातात. त्या मेसेजमध्ये ई-मेल, मोबाईल नंबर दिले जातात. तेव्हा एखादी व्यक्ती सहज बळी पडते आणि संबंधित नंबर, ई-मेलवर संपर्क साधतो, तेव्हा समोरून गोड बोलले जाते. त्यानंतर बँकिंगबाबत, इतर माहिती मागितली जाते, अशा वेळी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.

एखाद्या बँकेतून ग्राहकांना फोन करून माहिती मागविली जाते, हे चुकीचे आहे. मात्र बँकेचा हवाला देत आपण शाखाधिकारी आहोत, अशी बतावणी केली जाते. तुमचे बँक खाते अपडेट करायचे आहे, असे सांगून फसवणूक केली जाते. शिवाय, सोशल मीडियातून फेक मेसेज व्हायरल करून मोबाईलधारकांची फसवणूक केली जाते. पैशांची मागणी केली जाते. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.