शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

स्थलांतर करताय तर मुलांच्या शिक्षणाबाबत रहा निश्चिंत; 'शिक्षण हमी कार्ड' ने शिक्षणाची गॅरंटी!

By संदीप शिंदे | Updated: November 18, 2022 19:03 IST

शिक्षण हमी कार्ड द्वारे ऊसतोड मजूर, कामगारांची मुले येणार शिक्षणाच्या प्रवाहात

- संदीप शिंदेलातूर : दिवाळीनंतर जिल्ह्यातून हजारो कामगार मजुरी, ऊसतोडणीसाठी परगावी स्थलांतरित झाले, तर काही कामगार दुसऱ्या गावात जाण्याच्या तयारीत आहेत. अशा कामगारांनी गाव सोडले तरी त्यांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट सुटू नये, याची गॅरंटी प्रशासन घेणार आहे. यासाठी स्थलांतर होणाऱ्या मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्यात येणार असून, राज्यातील कोणत्याही शाळेत या कार्डवर प्रवेश दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील चाकूर, औसा, रेणापूर, जळकोट या तालुक्यामध्ये मजुरीसाठी दरवर्षीच स्थलांतर होते. कामगारांसोबत त्यांची मुलेही बाहेरगावी निघून जातात. त्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट सुटते. परिणामी, बालकांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत शिक्षण विभाग व अन्य विभागांच्या वतीने गावनिहाय सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये सापडणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे.

प्रत्येक गावांमध्ये होणार सर्वेक्षण...प्रत्येक गावात जाऊन तेथील पालक स्थलांतरित झाले का किंवा होणार आहेत का, याची माहिती घेतली जाणार आहे. स्थलांतर होत असल्यास त्यांच्या मुलांना गावातच थांबविण्याची विनंती केली जाईल. मात्र, पालकांकडून नकार आल्यास मुलांना शिक्षण हमी कार्ड दिले जाणार आहे.

कार्डवर राहणार मुलांची संपूर्ण माहिती...संबंधित मुलाची शिक्षण हमी कार्डवर शालेय रेकॉर्डवरील माहिती त्याच्या फोटोसह राहणार आहे. तो ज्या जिल्ह्यात किंवा गावात स्थलांतरित होईल, तेथील जवळच्या शाळेत हे कार्ड दाखविताच शिक्षणासाठी प्रवेश मिळणार आहे. दोन्ही ठिकाणचे मुख्याध्यापक एकमेकांशी संपर्क साधून स्टुडंट पोर्टलवर डिटॅच व अटॅच करणार आहे.

गावी परतल्यास कार्डवरच मिळणार प्रवेश...रोजगाराचा कालावधी संपल्यानंतर संबंधित कुटुंब पुन्हा लातूर जिल्ह्यात परतल्यावर याच कार्डाच्या आधारे संबंधित विद्यार्थ्याला मूळ शाळेतही दाखल करून घेतले जाणार आहे. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत तालुकानिहाय प्रत्येक गावात जाऊन सर्वेक्षण होणार असून, त्यानंतर कार्यवाही केली जाणार आहे.

जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी...स्थलांतरीत बालकांच्या सर्वेक्षणासाठी २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान गावनिहाय मोहीम राबविण्यात येणार आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी हा उपक्रम आहे. जिल्हास्तरावर सीईओंच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार असून, योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.- वंदना फुटाणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाlaturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद