शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

काळजी घ्या! लातूर जिल्ह्यात १६ हजार बालके विविध आजारांनी बेजार

By संदीप शिंदे | Updated: February 28, 2023 18:21 IST

जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानात दीड लाख बालकांची तपासणी पूर्ण

लातूर : अंगणवाडी तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ रहावे, पालकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने अभियान राबविले जात आहे. ९ फेब्रुवारीपासून या अभियानास सुरुवात झाली असून, आतापर्यंत १ लाख ६० हजार ९०९ बालकांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये १६६२८ बालके विविध आजारांनी बेजार असल्याचे समोर आले असून, यातील १२ हजार ४७६ जणांवर प्राथमिक औषधाेपचार करण्यात आले आहे.

जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त पथके तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील पथकांमार्फत जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील ५ लाख ५८ हजार १८२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोहीमेमध्ये ९ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यातील २५२२ पैकी ७१ अंगणवाड्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ० ते ६ वयोगटातील १ लाख ५३ हजार ६०३ बालकांपैकी ८ हजार ४२१ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील २ हजार २५१ पैकी १२८६ शाळांची तपासणी करण्यत आली असून, ६ ते १८ वयोगटातील ४ लाख ३ हजार ५७९ बालकांपैकी १ लाख ६० हजार ९०९ जणांची तपासणी झाली. यामध्ये १६ हजार ६२८ बालके विविध आजारांनी बेजार असल्याचे आढळून आले असून, १२ हजार ४७६ बालकांवर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहेत.

तसेच पुढील उपचाराकरिता ५ हजार ८९७ बालकांना संदर्भित करण्यात आले आहे. तर ४२ विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत बालकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी व उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिनव गोयल, जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख, जिल्हा माता व बालसंगोपण अधिकारी डॉ. सतिष हरिदास यांनी केले आहे.

मार्चपर्यंत मोहीम संपविण्याचे आव्हान...आरोग्य विभागाच्या वतीने जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान ९ फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. दोन महिने हे अभियान सुरु राहणार असून, यामध्ये शस्त्रक्रिया तसेच गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार आहे. दरम्यान, मार्च अखेरपर्यंत ही मोहीम पुर्ण करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असून, सध्या अभियानाला गती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार बालके...जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील ५ लाख ५८ हजार १८२ बालके आहेत. यात अंगणवाडीमधील १ लाख ५३ हजार ६०३ तर शाळांमधील ४ लाख ४ हजार ५७९ बालकांचा समावेश आहे. दरम्यान, आजारी आढळलेल्या १६ हजार बालकांपैकी १२ हजार जणांवर औषधोपचार झाले आहेत. यामध्ये खोकला, सर्दी, दात किडलेले, रक्ताक्षय, दृष्टीदोष, जन्मजात व्यंग आदी आजार असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य