शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

काळजी घ्या! लातूर जिल्ह्यात १६ हजार बालके विविध आजारांनी बेजार

By संदीप शिंदे | Updated: February 28, 2023 18:21 IST

जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानात दीड लाख बालकांची तपासणी पूर्ण

लातूर : अंगणवाडी तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ रहावे, पालकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने अभियान राबविले जात आहे. ९ फेब्रुवारीपासून या अभियानास सुरुवात झाली असून, आतापर्यंत १ लाख ६० हजार ९०९ बालकांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये १६६२८ बालके विविध आजारांनी बेजार असल्याचे समोर आले असून, यातील १२ हजार ४७६ जणांवर प्राथमिक औषधाेपचार करण्यात आले आहे.

जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त पथके तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील पथकांमार्फत जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील ५ लाख ५८ हजार १८२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोहीमेमध्ये ९ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यातील २५२२ पैकी ७१ अंगणवाड्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ० ते ६ वयोगटातील १ लाख ५३ हजार ६०३ बालकांपैकी ८ हजार ४२१ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील २ हजार २५१ पैकी १२८६ शाळांची तपासणी करण्यत आली असून, ६ ते १८ वयोगटातील ४ लाख ३ हजार ५७९ बालकांपैकी १ लाख ६० हजार ९०९ जणांची तपासणी झाली. यामध्ये १६ हजार ६२८ बालके विविध आजारांनी बेजार असल्याचे आढळून आले असून, १२ हजार ४७६ बालकांवर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहेत.

तसेच पुढील उपचाराकरिता ५ हजार ८९७ बालकांना संदर्भित करण्यात आले आहे. तर ४२ विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत बालकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी व उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिनव गोयल, जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख, जिल्हा माता व बालसंगोपण अधिकारी डॉ. सतिष हरिदास यांनी केले आहे.

मार्चपर्यंत मोहीम संपविण्याचे आव्हान...आरोग्य विभागाच्या वतीने जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान ९ फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. दोन महिने हे अभियान सुरु राहणार असून, यामध्ये शस्त्रक्रिया तसेच गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार आहे. दरम्यान, मार्च अखेरपर्यंत ही मोहीम पुर्ण करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असून, सध्या अभियानाला गती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार बालके...जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील ५ लाख ५८ हजार १८२ बालके आहेत. यात अंगणवाडीमधील १ लाख ५३ हजार ६०३ तर शाळांमधील ४ लाख ४ हजार ५७९ बालकांचा समावेश आहे. दरम्यान, आजारी आढळलेल्या १६ हजार बालकांपैकी १२ हजार जणांवर औषधोपचार झाले आहेत. यामध्ये खोकला, सर्दी, दात किडलेले, रक्ताक्षय, दृष्टीदोष, जन्मजात व्यंग आदी आजार असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य