शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

रोहयो कामांवर बीडीओंचा बहिष्कार; ३५० ग्रामपंचायतीतील मजुरांसह लाभार्थी शेतकऱ्यांची गैरसोय

By संदीप शिंदे | Updated: May 4, 2023 14:12 IST

ग्रामपंचायत स्तरावरील १२०० कामे बंद पडली आहेत

लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील अनेक जबाबदाऱ्या शासनाने गटविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर टाकल्या आहेत. याला विरोध दर्शविण्यासाठी जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी राेहयोच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी, जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेली जवळपास १२०० कामे ठप्प असून, या कामावर कार्यरत असलेल्या १३ हजार ५०० मजुरांची गैरसोय सुरू आहे.

रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती विभागाकडून गावस्तरावर विविध कामे केली जात आहेत. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ११०० कामे सुरू होती. यामध्ये १३ हजार ५०० मजूर कार्यरत होते. परंतु शासनाने रोहयोंतर्गत कामातील जबाबदारीत बदल केले आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील साप्ताहिक हजेरी यापूर्वी रोजगार सेवक करीत होता. त्यावर ग्रामसेवक प्रतिस्वाक्षरी करीत होते. मात्र, आता रोजगार हमीच्या कामांचे नियोजन करताना कुशल व अकुशल कामांचे ६०.४० टक्के प्रमाण राखण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून, बीडीओंकडून इतर कामांचा ताण पाहता मजुरांचे मस्टर पडताळणी व इतर कामांमध्ये अधिक देता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. या मागण्यांसाठीही बीडीओंनी ग्रामपंचायत स्तरावरील रोहयोच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी, ग्रामपंचायत स्तरावरील कामे बंद आहेत.

या कारणांमुळे कामांवर बहिष्कार...मजुरांच्या उपस्थितीबाबत गटविकास अधिकारी जबाबदार राहणार नाहीत, याबाबत शासन आदेश निर्गमित करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत ग्रामपंचायत स्तरावरील जबाबदारी निश्चित करणे, राज्य स्तरावरून मंजूर करण्यात येत असलेल्या कामांच्या बाबतीत मंजुरीबाबत ६०.४० चे प्रमाण राखण्याबाबत गटविकास अधिकारी जबाबदार राहणार नाहीत, याबाबत आदेश जारी करावा. ग्रामपंचायत स्तरावर यंत्रणा असताना बीडीओंच्या खांद्यावर जबाबदारी टाकण्यात येत असून, यासह इतर मागण्यांसाठी बहिष्कार टाकण्यात आला आहे.

आमच्या कुटुंबाचा गाडा कसा चालवावा..?बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना राबविली जाते. त्यानुसार आमच्या हाताला गावातच काम उपलब्ध झाले. मात्र, गटविकास अधिकारी यांनी कामावर बहिष्कार टाकलेला असल्याने मागील काही दिवसांपासून कामे बंद आहेत. त्यामुळे काम केल्यावर मिळणारी मजुरी बंद झाली आहे. हाताला काम नाही, अवकाळीमुळे शेतात पण कामाला कोणी बोलवत नाही. परिणामी, कुटुंबाचा गाडा आम्ही कसा चालवावा, असा सवाल मजुरांमधून उपस्थित केला जात आहे.

ग्रामपंचायत स्तरावर चालतात ही कामे...रोहयो अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर खासगी, सार्वजनिक विहिरींची कामे, मातोश्री पाणंद शेत रस्त्याची कामे, बांधावर वृक्षलागवड, शोषखड्ड्यांची कामे, शेततळे यांसह विविध कामे चालतात. उन्हाळ्यात या कामांना वेग येतो. त्यामुळे अनेकांच्या हाताला रोजगारही मिळतो. मात्र, ही कामे ठप्प असल्याने मजुरांना कामासाठी इतरत्र शोधाशोध करावी लागत आहे. बीडीओ साहेबांचा बहिष्कार कधी संपणार, असा सवालही मजुरांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीagricultureशेती