शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

बापूसाहेब काळदाते विरुद्घ केशवराव सोनवणे; तत्वनिष्ठेवर लढली गेलेली लक्षवेधी निवडणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 19:02 IST

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जिवनधर शहरकर गुरुजी यांच्याशी संवाद

- राजकुमार जोंधळे

लातूर : स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा जवळपास ८० वर्षांचा काळ मी पाहिला. आजपर्यंतच्या लोकसभा निवडणूका प्रत्यक्ष अनुभवल्या, पाहिल्या. मात्र, १९६७ साली झालेली बापूसाहेब काळदाते यांच्याविरुद्घ केशवराव सोनवणे अशी थेट लढत लक्षवेधी ठरली. ती निवडणूक माझ्या स्मरणात आजही कायम आहे. 

तत्वनिष्ठेवर अवलंबून असणाऱ्या दोन्ही उमेदवारांमुळे ही लढत रंगतदार ठरली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या निवडणूकीचा प्रचार करताना आनंद मिळाला. त्यावेळची ही निवडणूक विचारांची, सुसंस्कृतपणाची आणि जनहिताला प्राधान्य देणाऱ्या प्रश्नांची होती. काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे सहकारमंत्री आ. केशवराव सोनवणे यांच्या विरोधात बापूसाहेब काळदाते यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. 

उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच राष्ट्रसेवादलाच्या कार्यकर्त्यांनी जनकल्याण, राष्ट्रहिताच्या प्रश्नाला प्राधान्य देत प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवले होते. घरच्या भाकरी पदरी बांधून आम्ही या निवडणुकीचा प्रचार केला होता. निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रीय स्तरावरील डॉ. राममनोहर लोहिया, जॉर्ज फर्नाडीस हे लातुरात आले होते. राष्ट्रसेवादलाची चळवळ ही ग्रामीण भागातील मातीत रुजली होती. त्यातून शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थीमनावर राष्ट्रहिताचे संस्कार व्हायचे...त्यातूनच बापूसाहेब काळदाते यांच्या प्रचारासाठी आम्ही उन्हातान्हात खेडोपाडी पायपीट केली. 

दोन्ही उमेदवारांच्या जाहीर सभांच्या माध्यमातून केवळ विचार-आचारांची देवणघेवाण होत असे. आज प्रचार सभांतून आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक होताना दिसून येत आहे. विकास, राष्ट्रहित आणि सर्वसमान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य या प्रचारसभा आणि निवडणूकीत देण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जिवनधर शहरकर गुरुजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

आणि बापूसाहेब काळदाते ठरले विजयी...बापूसाहेब काळदाते आणि केशवराव सोनवणे यांच्यात तटीतटीचा समाना झाला. लातुरातील टाउन हॉलच्या सभागृहात मतमोजणी झाली. मतमोजणीत शेवटपर्यंत दोघात टसल सुरु होती. मात्र, लातूर तालुक्यातील बोरी, ममदापूर, भातांगळी परिसरातून बापूसाहेब काळदाते यांना अधिक मते मिळाले आणि ४ हजार ४०० मताधिक्यांनी हे विजयी ठरले, अशी आठवण जिवनधर शहरकर गुरुजी यांनी सांगितली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019latur-pcलातूर