शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
3
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
4
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
5
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
6
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
7
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
8
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
9
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
10
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
11
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
12
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
13
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
14
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
15
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
16
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
17
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
18
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
19
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
20
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठच्या २० गावांत बांबू लागवडीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST

शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून कमीत-कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे हे पीक असल्याने शिरूर ...

शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून कमीत-कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे हे पीक असल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नदीकाठच्या २० गावांत बांबू लागवडीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोकरा योजनेअंतर्गत तालुक्यातील १२० शेतकऱ्यांनी बांबू लागवडीत सहभाग नोंदविला आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत बुधवारी शिरूर अनंतपाळचे शेतकरी प्रभाकर लव्हांडे यांच्या शेतात बांबू लागवडीस प्रारंभ करण्यात आला.

शिरूर अनंतपाळ तालुक्यास घरणी नदीचा १२ कि.मी. आणि मांजरा नदीचा १३ कि.मी. असा एकूण २५ कि.मी.चा किनारा आहे. नदीकाठच्या २० गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात बांबू लागवड करण्याचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. बांबू लागवडीचा प्रारंभ शिरूर अनंतपाळ येथील प्रायोगिक तत्त्वावर शेती करणारे शेतकरी प्रभाकर लव्हांडे यांच्या एक एकर शेतीत राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत बुधवारी झाला. यावेळी तहसीलदार अतुल जटाळे, पोलीस उपनिरीक्षक मलय्या स्वामी, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंदराव चिलकुरे, तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, नागनाथ चलमले, सुधाकर लव्हांडे, मधुकर लव्हांडे, आपचे आनंदा कामगुंडा, ॲड. अनंत लव्हांडे आदींची उपस्थिती होती.

तालुक्यातील ४८ हेक्टरची निवड...

शिरूर अनंतपाळ तालुक्याला २५ कि.मी.चा नदीकिनारा लाभला आहे. नदीकाठच्या २० गावांतील नदी किनाऱ्यावर उच्च प्रतीच्या दर्जेदार बांबूची लागवड करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने कृती कार्यक्रम आखण्यात आला असून, १२० एकर म्हणजे ४८ हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एकरी लाखाच्या उत्पादनाची हमी...

पारंपरिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाची हमी नाही; परंतु मानवेल आणि बल्कवा या उच्च प्रतिच्या बांबूची लागवड केली, तर एकरी एक लाखापर्यंत उत्पादनाची हमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली पाहिजे, असे आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

बांबूपासून रोटी, कपडा और मकान प्राप्त...

मानवाच्या गरजा असंख्य असल्या तरी तीन मूलभूत गरजा आहेत ज्या बांबू लागवडीतून पूर्ण होतात, तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरण संवर्धन आणि संतुलनाचा समतोल बिघडत आहे. म्हणून प्रत्येकाने पोकरा योजनेंतर्गत किमान एक एकर तरी बांबू लागवड करावी, असेही पाशा पटेल म्हणाले.