शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

नदीकाठच्या २० गावांत बांबू लागवडीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST

शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून कमीत-कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे हे पीक असल्याने शिरूर ...

शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून कमीत-कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे हे पीक असल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नदीकाठच्या २० गावांत बांबू लागवडीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोकरा योजनेअंतर्गत तालुक्यातील १२० शेतकऱ्यांनी बांबू लागवडीत सहभाग नोंदविला आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत बुधवारी शिरूर अनंतपाळचे शेतकरी प्रभाकर लव्हांडे यांच्या शेतात बांबू लागवडीस प्रारंभ करण्यात आला.

शिरूर अनंतपाळ तालुक्यास घरणी नदीचा १२ कि.मी. आणि मांजरा नदीचा १३ कि.मी. असा एकूण २५ कि.मी.चा किनारा आहे. नदीकाठच्या २० गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात बांबू लागवड करण्याचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. बांबू लागवडीचा प्रारंभ शिरूर अनंतपाळ येथील प्रायोगिक तत्त्वावर शेती करणारे शेतकरी प्रभाकर लव्हांडे यांच्या एक एकर शेतीत राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत बुधवारी झाला. यावेळी तहसीलदार अतुल जटाळे, पोलीस उपनिरीक्षक मलय्या स्वामी, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंदराव चिलकुरे, तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, नागनाथ चलमले, सुधाकर लव्हांडे, मधुकर लव्हांडे, आपचे आनंदा कामगुंडा, ॲड. अनंत लव्हांडे आदींची उपस्थिती होती.

तालुक्यातील ४८ हेक्टरची निवड...

शिरूर अनंतपाळ तालुक्याला २५ कि.मी.चा नदीकिनारा लाभला आहे. नदीकाठच्या २० गावांतील नदी किनाऱ्यावर उच्च प्रतीच्या दर्जेदार बांबूची लागवड करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने कृती कार्यक्रम आखण्यात आला असून, १२० एकर म्हणजे ४८ हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एकरी लाखाच्या उत्पादनाची हमी...

पारंपरिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाची हमी नाही; परंतु मानवेल आणि बल्कवा या उच्च प्रतिच्या बांबूची लागवड केली, तर एकरी एक लाखापर्यंत उत्पादनाची हमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली पाहिजे, असे आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

बांबूपासून रोटी, कपडा और मकान प्राप्त...

मानवाच्या गरजा असंख्य असल्या तरी तीन मूलभूत गरजा आहेत ज्या बांबू लागवडीतून पूर्ण होतात, तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरण संवर्धन आणि संतुलनाचा समतोल बिघडत आहे. म्हणून प्रत्येकाने पोकरा योजनेंतर्गत किमान एक एकर तरी बांबू लागवड करावी, असेही पाशा पटेल म्हणाले.