शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST

लातूर : यंदा मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या ४ लाख ६९ हजार ७४६ हेक्टरवर पेरण्या झाल्या. पिकेही चांगली ...

लातूर : यंदा मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या ४ लाख ६९ हजार ७४६ हेक्टरवर पेरण्या झाल्या. पिकेही चांगली उगवली. परंतु, वरुणराजाने उघडीप दिल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणची पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. ते शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पीक जगविण्यासाठी धडपड करीत आहेत.

हवामान खात्याने यंदा वेळेवर पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. दरम्यान, मृग नक्षत्र निघाले आणि दमदार पाऊस झाला. त्यामुळे आगामी काळात चांगला पाऊस होईल, या आशेने शेतकऱ्यांनी महागडे बी- बियाणे, खते खरेदी करुन खरीप पेरण्यांना सुरुवात केली. जिल्ह्यात खरीपाचा सरासरी ६ लाख १२ हजार ४२१ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ६९ हजार ७४६ हेक्टरवर पेरा झाला आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे उगवलेली पिके कोमेजू लागली आहेत. परिणामी, शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

सोयाबीनचा पेरा वाढला...

जिल्ह्यात यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. कारण यंदाच्या उन्हाळ्यात सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला होता. हमीभावापेक्षा दुप्पटीच्या जवळपास भाव पोहोचला होता. त्यामुळे आगामी काळातही असाच चांगला दर मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भर दिला असल्याचे पहावयास मिळत आहे.