शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्मान भव मोहीम! अधिकारी अन् नागरिकांनी घेतली अवयवदानाची शपथ

By हरी मोकाशे | Updated: September 13, 2023 19:38 IST

यावेळी आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, अवयवदान, क्षयरोग निदान, असंसर्गिक आजाराबद्दल विविध जाणीव जागृती स्टॉल व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

लातूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव मोहिमेस बुधवारपासून प्रारंभ झाला असून जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते झाले. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी अवयवदानाची शपथ घेतली.

तालुक्यातील भातांगळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कार्यक्रमास आरोग्य उपसंचालिका डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एच. व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, डॉ. नितीन बोडके, डॉ. तांबारे, डॉ. श्रीधर पाठक आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. अर्चना भोसले म्हणाल्या, अवयवदानाची चळवळ व्यापक करावी. वेळेत सर्व आजारांचे निदान झाल्यास समाज सुदृढ होईल. डॉ. प्रदीप ढेले म्हणाले, सध्या कर्करोग, असंसर्गिक आजार वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी लवकर निदान व उपचार आवश्यक आहेत. प्रास्ताविक डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी केले.

मोहिमेत गावे क्षयमुक्त करावीत...नागरिकांनी आयुष्मान भव मोहिमेचा लाभ घ्यावा. समाजातील सर्व घटकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनाची सुरुवात करावी. या मोहिमेतून गावे क्षयरोगासारख्या आजारातून मुक्त करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले.

यावेळी आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, अवयवदान, क्षयरोग निदान, असंसर्गिक आजाराबद्दल विविध जाणीव जागृती स्टॉल व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात आयुष्मान कार्ड, क्षयरोग रुग्णांना मोफत आहाराची मदत करणारे निक्षय मित्र, क्षयरोगावर मात करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :laturलातूरOrgan donationअवयव दान