शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

आयुष्मान भव मोहीम! अधिकारी अन् नागरिकांनी घेतली अवयवदानाची शपथ

By हरी मोकाशे | Updated: September 13, 2023 19:38 IST

यावेळी आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, अवयवदान, क्षयरोग निदान, असंसर्गिक आजाराबद्दल विविध जाणीव जागृती स्टॉल व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

लातूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव मोहिमेस बुधवारपासून प्रारंभ झाला असून जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते झाले. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी अवयवदानाची शपथ घेतली.

तालुक्यातील भातांगळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कार्यक्रमास आरोग्य उपसंचालिका डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एच. व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, डॉ. नितीन बोडके, डॉ. तांबारे, डॉ. श्रीधर पाठक आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. अर्चना भोसले म्हणाल्या, अवयवदानाची चळवळ व्यापक करावी. वेळेत सर्व आजारांचे निदान झाल्यास समाज सुदृढ होईल. डॉ. प्रदीप ढेले म्हणाले, सध्या कर्करोग, असंसर्गिक आजार वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी लवकर निदान व उपचार आवश्यक आहेत. प्रास्ताविक डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी केले.

मोहिमेत गावे क्षयमुक्त करावीत...नागरिकांनी आयुष्मान भव मोहिमेचा लाभ घ्यावा. समाजातील सर्व घटकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनाची सुरुवात करावी. या मोहिमेतून गावे क्षयरोगासारख्या आजारातून मुक्त करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले.

यावेळी आयुष्मान कार्ड, आभा कार्ड, अवयवदान, क्षयरोग निदान, असंसर्गिक आजाराबद्दल विविध जाणीव जागृती स्टॉल व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात आयुष्मान कार्ड, क्षयरोग रुग्णांना मोफत आहाराची मदत करणारे निक्षय मित्र, क्षयरोगावर मात करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :laturलातूरOrgan donationअवयव दान