शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

शेती संस्कृतीचा सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त श्रीकांत देशमुख यांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 18:39 IST

जागतिकीकरणानंतर शेतीचे बदललेले अवकाश कवेत घेण्याचा प्रयत्न ‘बोलावें ते आम्ही’ या काव्य संग्रहातून केला आहे. त्याची राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली दखल हा शेती संस्कृतीचा सन्मान आहे.

लातूर : जागतिकीकरणानंतर शेतीचे बदललेले अवकाश कवेत घेण्याचा प्रयत्न ‘बोलावें ते आम्ही’ या काव्य संग्रहातून केला आहे. त्याची राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली दखल हा शेती संस्कृतीचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त श्रीकांत देशमुख यांनी आज येथे व्यक्त केली.

लातूर येथे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) म्हणून कार्यरत असलेले कवी देशमुख यांनी गद्य व पद्य स्वरुपात विपुल लेखन केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, कष्टकरी, दलित यांचे दु:ख व वेदना ही माझ्या लेखनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ‘बोलावें ते आम्ही’ हे काव्यसंग्रहाचे नाव संत तुकोबाराय यांच्या अभंगातील ओवीचे आहे. तुकोबा, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारपरंपरा आम्ही मानतो.

शेती व्यवस्थेतील दु:ख व वेदना यांचा शोध घेणे ही जबाबदारी वाटते. त्यामुळे लेखनात कष्टकºयांचे आयुष्य आणि वेदना उमटली आहे. हा भूमीनिष्ठ बनलेल्या ‘बोलावें ते आम्ही’ काव्यसंग्रह ग्रंथाली प्रकाशनने वाचकांसमोर आणला आहे, असेही देशमुख म्हणाले.मूळचे सिंदखेडराजा जवळील राहिरी येथील रहिवासी असलेले श्रीकांत देशमुख यांचे औरंगाबाद व जालना येथे शिक्षण झाले. काही काळ प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी शासकीय सेवा स्वीकारली. ते नांदेड येथे साखर सहसंचालक होते व सध्या लातूरला विभागीय सहनिबंधक आहेत.बळिवंत / श्रीकांत देशमुख...श्रीकांत देशमुख यांचे ‘बळिवंत’, ‘आषाढमाती’, ‘बोलावें ते आम्ही’ हे काव्यसंग्रह शेतीनिष्ठ जीवनावर आधारित आहे. देशमुख हे कविता हा वाङ्मय प्रकार गंभीरपणे हाताळणारे व स्वत:ची जीवनदृष्टी असणारे कवी आहेत. कृषी जनसमुहाच्या वास्तवाची मांडणी करणाºया या कविता शेतक-यांच्या जगण्यात बारमाही येणाºया चढ-उताराला केंद्रभागी ठेवतात. त्यामुळे ही कविता म्हणजे शेतकºयांची सलग आत्मचरित्र गाथा बनते. गावगाडा, गावगाड्याची जीवन पद्धती आपल्या कवितेत त्यांनी अस्सलपणे शब्दबद्ध केली आहे. शेतकºयांची अगतिक स्थिती, कुचंबना, वाट्याला येणारे दु:ख, दु:खावेगातून घडलेल्या आत्महत्या कवितेत अपरिहार्यपणे चित्रित होतात. त्यांच्या कवितेतील कृषी समुहातील स्त्री जगण्याचे केलेले चित्रण स्वतंत्रपणे विचारात घेतले पाहिजे, इतके ते वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेले आहे. देशमुखांची कविता ही कृषी जनसमुहाचाच उद्गार आहे. त्यांच्या कवितेत येणारी प्रतिमा, प्रतिके ही खास कृषी जनव्यवस्थेतील आहेत. जगण्याचा तळ हा तणावासह शोधणे तिला महत्त्वाचे वाटते. कृषीमूल्य व्यवस्था, दु:ख, दारिद्र्य, तुटलेपणा ही त्यांच्या कवितेची आशयसूत्रे बनतात. शेतक- यांचे संपूर्ण जगणेच एक दीर्घ अभंग बनते. त्यामुळे आपली जातकुळी, पूर्व परंपरा तुकारामांची आहे याची भरीव आठवण त्यांची कविता देते. - राजन गवस