शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

शेती संस्कृतीचा सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त श्रीकांत देशमुख यांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 18:39 IST

जागतिकीकरणानंतर शेतीचे बदललेले अवकाश कवेत घेण्याचा प्रयत्न ‘बोलावें ते आम्ही’ या काव्य संग्रहातून केला आहे. त्याची राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली दखल हा शेती संस्कृतीचा सन्मान आहे.

लातूर : जागतिकीकरणानंतर शेतीचे बदललेले अवकाश कवेत घेण्याचा प्रयत्न ‘बोलावें ते आम्ही’ या काव्य संग्रहातून केला आहे. त्याची राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली दखल हा शेती संस्कृतीचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त श्रीकांत देशमुख यांनी आज येथे व्यक्त केली.

लातूर येथे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) म्हणून कार्यरत असलेले कवी देशमुख यांनी गद्य व पद्य स्वरुपात विपुल लेखन केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, कष्टकरी, दलित यांचे दु:ख व वेदना ही माझ्या लेखनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ‘बोलावें ते आम्ही’ हे काव्यसंग्रहाचे नाव संत तुकोबाराय यांच्या अभंगातील ओवीचे आहे. तुकोबा, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारपरंपरा आम्ही मानतो.

शेती व्यवस्थेतील दु:ख व वेदना यांचा शोध घेणे ही जबाबदारी वाटते. त्यामुळे लेखनात कष्टकºयांचे आयुष्य आणि वेदना उमटली आहे. हा भूमीनिष्ठ बनलेल्या ‘बोलावें ते आम्ही’ काव्यसंग्रह ग्रंथाली प्रकाशनने वाचकांसमोर आणला आहे, असेही देशमुख म्हणाले.मूळचे सिंदखेडराजा जवळील राहिरी येथील रहिवासी असलेले श्रीकांत देशमुख यांचे औरंगाबाद व जालना येथे शिक्षण झाले. काही काळ प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी शासकीय सेवा स्वीकारली. ते नांदेड येथे साखर सहसंचालक होते व सध्या लातूरला विभागीय सहनिबंधक आहेत.बळिवंत / श्रीकांत देशमुख...श्रीकांत देशमुख यांचे ‘बळिवंत’, ‘आषाढमाती’, ‘बोलावें ते आम्ही’ हे काव्यसंग्रह शेतीनिष्ठ जीवनावर आधारित आहे. देशमुख हे कविता हा वाङ्मय प्रकार गंभीरपणे हाताळणारे व स्वत:ची जीवनदृष्टी असणारे कवी आहेत. कृषी जनसमुहाच्या वास्तवाची मांडणी करणाºया या कविता शेतक-यांच्या जगण्यात बारमाही येणाºया चढ-उताराला केंद्रभागी ठेवतात. त्यामुळे ही कविता म्हणजे शेतकºयांची सलग आत्मचरित्र गाथा बनते. गावगाडा, गावगाड्याची जीवन पद्धती आपल्या कवितेत त्यांनी अस्सलपणे शब्दबद्ध केली आहे. शेतकºयांची अगतिक स्थिती, कुचंबना, वाट्याला येणारे दु:ख, दु:खावेगातून घडलेल्या आत्महत्या कवितेत अपरिहार्यपणे चित्रित होतात. त्यांच्या कवितेतील कृषी समुहातील स्त्री जगण्याचे केलेले चित्रण स्वतंत्रपणे विचारात घेतले पाहिजे, इतके ते वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेले आहे. देशमुखांची कविता ही कृषी जनसमुहाचाच उद्गार आहे. त्यांच्या कवितेत येणारी प्रतिमा, प्रतिके ही खास कृषी जनव्यवस्थेतील आहेत. जगण्याचा तळ हा तणावासह शोधणे तिला महत्त्वाचे वाटते. कृषीमूल्य व्यवस्था, दु:ख, दारिद्र्य, तुटलेपणा ही त्यांच्या कवितेची आशयसूत्रे बनतात. शेतक- यांचे संपूर्ण जगणेच एक दीर्घ अभंग बनते. त्यामुळे आपली जातकुळी, पूर्व परंपरा तुकारामांची आहे याची भरीव आठवण त्यांची कविता देते. - राजन गवस