शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करताच अतिवृष्टीचे अनुदान खात्यावर जमा

By हरी मोकाशे | Updated: November 2, 2022 19:04 IST

शासनाची मदत मिळविण्यासाठी आक्रमक भूमिका

बेलकुंड (जि. लातूर) : अतिवृष्टीचे अनुदान मंजूर होऊन पंधरा दिवस उलटले. मात्र, अद्यापही ते बँक खात्यावर जमा न झाल्याने औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संतप्त शेतकऱ्यांनी औश्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत बुधवारी ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या पावित्र्यामुळे बँकेने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग केले.

जिल्ह्यात सातत्याने झालेल्या संततधार पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अनुदान जाहीर करुन दिवाळीपूर्वी अनुदान खात्यावर वर्ग होईल, असे सांगितले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आणि दिवाळीचा तरी सण साजरा होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली. दरम्यान, दिवाळी झाली तरी अद्यापही नुकसानग्रस्तांच्या खात्यावर अनुदान वर्ग झाले नाही.

तहसील प्रशासन आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या औसा शाखेतील दप्तर दिरंगाईमुळे बेलकुंड व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या अनुदान रखडले. विशेष म्हणजे, येथील बहुतांश शेतकऱ्यांचे खाते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आशिव शाखेत आहे. त्यांना यापूर्वीच अनुदान मिळाले. मात्र ज्या शेतकऱ्यांचे खाते येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आहे, त्या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा लागली होती.

अनुदानासाठी आठ- दहा दिवसांपासून शेतकरी बँकेकडे हेलपाटे मारत होते. मात्र, बँकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर बुधवारी येथील संतप्त शेतकऱ्यांनी सरपंच विष्णू कोळी यांच्यासह औश्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांचा आक्रमक पावित्रा पाहून बँकेने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी