शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली, दरात अल्पशी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

उदगीर : तालुक्यात जूनच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. सध्या ...

उदगीर : तालुक्यात जूनच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. सध्या होत असलेली आवक ही परजिल्ह्यातील आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दररोजच्या वापरातील तूर व चणाडाळीची मागणी वाढत आहे. ठोक बाजारात खाद्यतेलाच्या किमती थोड्या कमी झाल्या असल्या तरी किरकोळ बाजारात फारसा फरक पडलेला नाही.

तालुक्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांचा भाजीपाला उत्पादनाकडे कल वाढला आहे. मागील वर्षी तालुक्यात समाधानकारक पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे बोअर, विहिरीला बऱ्यापैकी पाणी होते. त्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उन्हाळ्यातही उत्पादन घेतले होते. कुमठा, लोहारा, बामणी, देवर्जन, माळेवाडीसह अन्य गावांतील शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात.

दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस पडल्यामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालेभाज्यांची पाने खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी ती बांधावरच टाकून दिली आहेत. त्यामुळे शहरात भाजीपाला लातूर व सोलापूर जिल्ह्यांतून येत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्चही जास्त येत असल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे.

वांगे ८० रुपये प्रति किलो...

पालक, शेपू १० रुपये जुडी, मेथी, कोथिंबीर २५ रुपये जुडी तसेच टोमॅटो ३० रुपये, वांगी ८० रुपये, हिरवी मिरची ६० रुपये किलो, दोडके, कारले, शिमला मिरची, भेंडी प्रत्येकी ८० रुपये प्रति किलो दराने ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर शहर व ग्रामीण भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हॉटेल, खानावळी, धाबे सुरु झाले आहेत. त्यामुळे तूरडाळ व चणाडाळीला मागणी वाढली आहे. डाळीसोबतच खाद्यतेलाच्या दरातही मोठी वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. सध्या खाद्यतेलाच्या ठोक दरात अल्पशी घट झाली असली, तरी किरकोळ बाजारात त्याचा परिणाम दिसून येत नाही.