शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

अहमदपूर : अहमदपूर व चाकूर तालुक्यात गतवर्षी पावसामुळे व खराब वातावरणामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात अवेळी पाऊस, ...

अहमदपूर : अहमदपूर व चाकूर तालुक्यात गतवर्षी पावसामुळे व खराब वातावरणामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात अवेळी पाऊस, धुके पडून तुरीचा व कापसाचाही खराटा झाला. त्यामुळे पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गतवर्षी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे महसूल विभाग व कृषी विभागाने केले होते. त्याआधारे शासनाने नुकसानभरपाईचे अनुदान शेतकऱ्यांना दिले होते. तेच पंचनामे ग्राह्य धरून विमा कंपनीकडून पीक विमा मंजूर करून घ्यावा. अनेक शेतकऱ्यांनी नुकसानाचे फोटो ऑनलाईन केले नाहीत, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा, लाॅकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी दूषित वातावरण व पावसामुळे पिकांवर पडलेल्या अनेक रोगांमुळे उत्पन्नात कमालीची घट झाली असून, शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा देण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याविषयीचे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आले. यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, राजकुमार मजगे, भाजप तालुकाध्यक्ष हणमंतराव देवकते, अशोकराव चिंते, आर. डी. शेळके, हरीभाऊ येरमे, विठ्ठलराव बोडके, संग्राम चामे, प्रशांत पाटील, शिवाजी बैनगिरे, राम बेल्लाळे, कमलाकर पाटील, नीळकंठ पाटील, राजू खंदाडे, गोविंद गिरी, देवानंद मुळे, अमित रेड्डी, अजय काळे, प्रेमचंद शेळके, शिवराज पाटील, चंदकांत गंगथडे, प्रमोद जोशी, अजित खंदारे, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, विक्रम भोसले, नगरसेवक राहुल शिवपुजे, निखिल कासनाळे, धनराज पाटील, कमलाकर शेकापुरे, शकूर जागीरदार, सुखदेव कदम, चंद्रसेन पाटील, प्रताप पाटील, संतोष कोटलवार, शिवराज चोथवे, अर्जुन गंगथडे, शंकर मुळे, शंकर चाटे, पांडुरंग कांबळे, आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.