शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

भारनियमनाव्यतिरिक्त जळकोटात सातत्याने विजेचा लपंडाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST

जळकोट : विद्युत ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणने तालुक्यातील माळहिप्परगा येथे २२० केव्ही वीज केंद्र सुरू केले आहे; परंतु हे केंद्र ...

जळकोट : विद्युत ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणने तालुक्यातील माळहिप्परगा येथे २२० केव्ही वीज केंद्र सुरू केले आहे; परंतु हे केंद्र असूनही त्याचा फारसा लाभ तालुक्यातील नागरिकांना होत नाही. विशेष म्हणजे, भारनियमनाव्यतिरिक्त सातत्याने वीज गुल होत आहे, तसेच विहिरीवरील विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले असल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.

तालुक्यातील वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा, त्यांना विजेसंदर्भातील अडचणी येऊ नयेत म्हणून तत्कालिन युती सरकारने माळहिप्परगा येथे २२० केव्ही वीज केंद्र उभारले. त्यासाठी दीडशे कोटींचा खर्च करण्यात आला होता. या केंद्रामुळे तालुक्यास सुरळीत वीज पुरवठा होईल, अशी आशा ग्राहकांना होती; मात्र ती फोल ठरली आहे. भारनियमनाव्यतिरिक्त सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. तसेच कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने विहिरीवरील विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, हे केंद्र सुरू होण्यापूर्वीसारखी स्थिती निर्माण झाली आहे.

वास्तविक पहाता, या केंद्रावरून वीज पुरवठा हा तालुक्यात व्यवस्थित होण्याऐवजी तो उदगीरला व अन्य ठिकाणी होतो. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असल्याचे काहींचे म्हणणे आहे. या केंद्रावरून सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी तालुक्यात आणखीन दोन ठिकाणी उपकेंद्र उभारणे गरजेचे ठरत आहे. त्यामुळे येथील शेतकरी व कारखानदारांना त्याचा लाभ होणार आहे.

जळकोट तालुक्यात आणखीन दोन नवीन उपकेंद्र उभारण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, सरपंच राजेश केंद्रे, सरपंच संध्या रमेश चोले, पाटोदाच्या सरपंच वनमाला गुट्टे, सरपंच सत्यवान पाटील, नगरसेवक शिवानंद देशमुख, महेश धुळशेट्टे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील आगलावे, साहेबराव पाटील येवले, सरपंच चंद्रशेखर पाटील, दाऊद बिरादार, आयुब शेख, माजी उपसरपंच सत्यवान पांडे, सत्यवान दळवे, दत्ता पवार, बालाजी पवार, जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, पंचायत समिती सभापती बालाजी ताकबिडे, बाजार समितीचे संचालक दिलीप कांबळे, विठ्ठल चव्हाण, गजानन दळवे यांनी केली आहे.

माळहिप्परग्याचे केंद्र नावालाच...

तालुक्यात सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी माळहिप्परगा येथे २२० केव्ही वीज केंद्र उभारण्यात आले आहे; परंतु या केंद्रातून सुरळीत व व्यवस्थित वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महावितरणने याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करावी, अशी सातत्याने मागणी होत आहे. सध्या सातत्याने वीज गुल होत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.