शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

चिंता वाढली! लातूर जिल्ह्याची भूजल पातळी पाच वर्षांच्या तुलनेत दीड मीटरने खालावली

By हरी मोकाशे | Updated: February 15, 2024 16:35 IST

जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७५० मिमी असताना गत पावसाळ्यात सरासरी ५४० मिमी पाऊस झाला.

लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, जिल्ह्यास पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील १०९ विहिरींचे जानेवारीअखेरीस निरीक्षण करण्यात आले असता मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी ही १.५५ मीटरने खालावली असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, चिंता अधिक वाढली आहे.

गत पावसाळ्यात उशिरा आणि अल्प प्रमाणात पाऊस झाला. विशेषत: पावसाळ्यात पावसाने दमदार बरसात केली नाही. ऑगस्टमध्ये तर वरुणराजाने मोठा ताण दिला. दरवर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस होतो, असा गेल्या तीन- चार वर्षांपासूनचा अनुभव आहे. त्यामुळे परतीच्या पावसावर मदार होती. मात्र, परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. परिणामी, जिल्ह्यातील प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत. त्याचबरोबर ओढे- नाले खळाळले नाहीत. त्यामुळे मध्यम, लघु प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर जमिनीत पाणीही मुरले नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७५० मिमी असताना गत पावसाळ्यात सरासरी ५४० मिमी पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत फार कमी पर्जन्यमान झाले.

सहा तालुक्यांच्या पाणीपातळीत घट...तालुका - भूजल पातळीतील घटअहमदपूर - -१.४५औसा - -४.५७चाकूर - -१.५९निलंगा - -२.३०शिरुर अनं. - -४.४७रेणापूर - -१.६६उदगीर - ०.४४लातूर - ०.१२जळकोट - ०.२६देवणी - ०.५६एकूण - -१.५५

औश्याची सर्वाधिक पाणीपातळी घटली...भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी जानेवारी अखेरीस जिल्ह्यातील १०९ निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीची तपासली जाते. यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणी पातळीत -१.५५ मीटरने घट झाली आहे. विशेषत: सर्वाधिक पाणी पातळी औसा तालुक्याची कमी झाली असून ती -४.५९ मीटरने घटली आहे. त्यापाठोपाठ शिरुर अनंतपाळ तालुक्याची कमी झाली आहे. -४.४७ मीटर अशी घट झाली आहे.

चार तालुक्यांची स्थिती मध्यम...जिल्ह्यातील दहापैकी चार तालुक्यांच्या पाणी पातळीची स्थिती बऱ्यापैकी दिसून येत आहे. त्यात लातूर, उदगीर, जळकोट आणि देवणी तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित सहा तालुक्यातील भूजलपातळी खालावली आहे.

सहा गावांनी केली टँकरची मागणी...जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरअखेरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उन्हाबरोबर त्या वाढत आहेत. सध्या औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी, फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा आणि लातूर तालुक्यातील चिंचोली ब. गावाने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करुन पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत.

टॅग्स :WaterपाणीlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र