शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

चिंता वाढली! लातूर जिल्ह्याची भूजल पातळी पाच वर्षांच्या तुलनेत दीड मीटरने खालावली

By हरी मोकाशे | Updated: February 15, 2024 16:35 IST

जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७५० मिमी असताना गत पावसाळ्यात सरासरी ५४० मिमी पाऊस झाला.

लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, जिल्ह्यास पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील १०९ विहिरींचे जानेवारीअखेरीस निरीक्षण करण्यात आले असता मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी ही १.५५ मीटरने खालावली असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, चिंता अधिक वाढली आहे.

गत पावसाळ्यात उशिरा आणि अल्प प्रमाणात पाऊस झाला. विशेषत: पावसाळ्यात पावसाने दमदार बरसात केली नाही. ऑगस्टमध्ये तर वरुणराजाने मोठा ताण दिला. दरवर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस होतो, असा गेल्या तीन- चार वर्षांपासूनचा अनुभव आहे. त्यामुळे परतीच्या पावसावर मदार होती. मात्र, परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. परिणामी, जिल्ह्यातील प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत. त्याचबरोबर ओढे- नाले खळाळले नाहीत. त्यामुळे मध्यम, लघु प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर जमिनीत पाणीही मुरले नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७५० मिमी असताना गत पावसाळ्यात सरासरी ५४० मिमी पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत फार कमी पर्जन्यमान झाले.

सहा तालुक्यांच्या पाणीपातळीत घट...तालुका - भूजल पातळीतील घटअहमदपूर - -१.४५औसा - -४.५७चाकूर - -१.५९निलंगा - -२.३०शिरुर अनं. - -४.४७रेणापूर - -१.६६उदगीर - ०.४४लातूर - ०.१२जळकोट - ०.२६देवणी - ०.५६एकूण - -१.५५

औश्याची सर्वाधिक पाणीपातळी घटली...भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी जानेवारी अखेरीस जिल्ह्यातील १०९ निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीची तपासली जाते. यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणी पातळीत -१.५५ मीटरने घट झाली आहे. विशेषत: सर्वाधिक पाणी पातळी औसा तालुक्याची कमी झाली असून ती -४.५९ मीटरने घटली आहे. त्यापाठोपाठ शिरुर अनंतपाळ तालुक्याची कमी झाली आहे. -४.४७ मीटर अशी घट झाली आहे.

चार तालुक्यांची स्थिती मध्यम...जिल्ह्यातील दहापैकी चार तालुक्यांच्या पाणी पातळीची स्थिती बऱ्यापैकी दिसून येत आहे. त्यात लातूर, उदगीर, जळकोट आणि देवणी तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित सहा तालुक्यातील भूजलपातळी खालावली आहे.

सहा गावांनी केली टँकरची मागणी...जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरअखेरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उन्हाबरोबर त्या वाढत आहेत. सध्या औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी, फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा आणि लातूर तालुक्यातील चिंचोली ब. गावाने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करुन पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत.

टॅग्स :WaterपाणीlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र