शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चिंता वाढली! लातूर जिल्ह्याची भूजल पातळी पाच वर्षांच्या तुलनेत दीड मीटरने खालावली

By हरी मोकाशे | Updated: February 15, 2024 16:35 IST

जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७५० मिमी असताना गत पावसाळ्यात सरासरी ५४० मिमी पाऊस झाला.

लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, जिल्ह्यास पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील १०९ विहिरींचे जानेवारीअखेरीस निरीक्षण करण्यात आले असता मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी ही १.५५ मीटरने खालावली असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, चिंता अधिक वाढली आहे.

गत पावसाळ्यात उशिरा आणि अल्प प्रमाणात पाऊस झाला. विशेषत: पावसाळ्यात पावसाने दमदार बरसात केली नाही. ऑगस्टमध्ये तर वरुणराजाने मोठा ताण दिला. दरवर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस होतो, असा गेल्या तीन- चार वर्षांपासूनचा अनुभव आहे. त्यामुळे परतीच्या पावसावर मदार होती. मात्र, परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. परिणामी, जिल्ह्यातील प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत. त्याचबरोबर ओढे- नाले खळाळले नाहीत. त्यामुळे मध्यम, लघु प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर जमिनीत पाणीही मुरले नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७५० मिमी असताना गत पावसाळ्यात सरासरी ५४० मिमी पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत फार कमी पर्जन्यमान झाले.

सहा तालुक्यांच्या पाणीपातळीत घट...तालुका - भूजल पातळीतील घटअहमदपूर - -१.४५औसा - -४.५७चाकूर - -१.५९निलंगा - -२.३०शिरुर अनं. - -४.४७रेणापूर - -१.६६उदगीर - ०.४४लातूर - ०.१२जळकोट - ०.२६देवणी - ०.५६एकूण - -१.५५

औश्याची सर्वाधिक पाणीपातळी घटली...भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी जानेवारी अखेरीस जिल्ह्यातील १०९ निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीची तपासली जाते. यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणी पातळीत -१.५५ मीटरने घट झाली आहे. विशेषत: सर्वाधिक पाणी पातळी औसा तालुक्याची कमी झाली असून ती -४.५९ मीटरने घटली आहे. त्यापाठोपाठ शिरुर अनंतपाळ तालुक्याची कमी झाली आहे. -४.४७ मीटर अशी घट झाली आहे.

चार तालुक्यांची स्थिती मध्यम...जिल्ह्यातील दहापैकी चार तालुक्यांच्या पाणी पातळीची स्थिती बऱ्यापैकी दिसून येत आहे. त्यात लातूर, उदगीर, जळकोट आणि देवणी तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित सहा तालुक्यातील भूजलपातळी खालावली आहे.

सहा गावांनी केली टँकरची मागणी...जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरअखेरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उन्हाबरोबर त्या वाढत आहेत. सध्या औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी, फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा आणि लातूर तालुक्यातील चिंचोली ब. गावाने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करुन पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत.

टॅग्स :WaterपाणीlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र