शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लातूर शहरात ७८० भटक्या श्वानांना अँटीरेबीज लसीकरण

By हणमंत गायकवाड | Updated: March 15, 2024 18:19 IST

ग्लोबल फाउंडेशनच्या सहकार्यातून महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

लातूर : शहरातील श्वानांची वाढती संख्या व त्यामुळे वृद्ध नागरिक,लहान मुले आणि महिलांना होणारा त्रास लक्षात घेता मनपाच्या वतीने अँटीरेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.या अंतर्गत आतापर्यंत ७८० भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले असून आपल्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन मनपा व उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

लातूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.यामुळे वृद्ध नागरिक,लहान मुले व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा ही भटकी कुत्री नागरिकांना चावा घेऊन जखमी करत आहेत. हा त्रास कमी करण्यासाठी भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे आवश्यक आहे.त्यासाठी मनपाकडून मुलुंड येथील ग्लोबल फाउंडेशनच्या सहकार्यातून अँटीरेबीज लसीकरण करण्यात येत आहे.या अंतर्गत लसीकरण करून कुत्र्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी सोडण्यात येते.कुत्र्यांचा वाढता त्रास लक्षात घेता ही प्रक्रिया अधिक परिणामकारक व गतिमान करण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे.

दर शनिवारी अँटीरेबीज लसीकरण....एप्रिल महिन्यापासून दर शनिवारी अँटीरेबीज लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. सध्याही प्रभाग निहाय लसीकरण केले जात आहे. ज्या भागात भटक्या कुत्र्यांचा त्रास अधिक आहे. त्या भागातील नागरिकांनी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या ८६५५३२३१६८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. त्यानुसार माहिती घेऊन त्या-त्या परिसरात दर शनिवारी अँटीरेबीज लसीकरण करणे शक्य होईल.

टॅग्स :dogकुत्राlaturलातूरMuncipal Corporationनगर पालिका