शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये अँटीरेबीज लसीकरणाची मोहीम बारगळली?  भ्रमणध्वनीवर प्रतिसाद मिळेना

By हणमंत गायकवाड | Updated: March 20, 2024 16:36 IST

लातूर शहरामध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

लातूर: भटक्या श्वानांचा त्रास कमी करण्यासाठी महानगरपालिका आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन च्या सहकार्याने अँटीरेबीज लसीकरण मोहीम सुरू केल्याचा गाजावाजा करण्यात आला. नागरिकांना संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. परंतु त्यावर वारंवार कॉल करूनही संबंधित यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नाही. किंबहुना भ्रमणध्वनीच उचलला जात नाही. मग अँटीरेबीज लसीकरणाची मोहीम कुठे चालू आहे,असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

लातूर शहरामध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रात्रीच्या वेळी या श्वानांची टोळी रस्त्याने फिरत असते. रस्त्याने ही टोळी फिरत असताना यावेळी दुचाकी आली तर तिचा पाठलाग श्वान करतात. यामुळे दुचाकीस्वार घाबरून दुचाकीची स्पीड वाढवितो. परिणामी,अपघात होऊन गंभीर जखमी होण्याच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. वृद्ध नागरिक, महिला, पुरुष तसेच शाळकरी मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे अनेक उदाहरणे आहेत. याला आवर घालण्यासाठी महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभाग आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने अँटीरेबीज लसीकरणाची मोहीम सुरू केल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांनी जाहीर केलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला तर प्रतिसाद मिळत नाही. फोन उचलला जात नाही, त्यामुळे भटक्या श्वानांची माहिती कोणाला द्यायची असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

८६५५३२३१६८ या क्रमांकावर संपर्क साधला तर कोणीही उचलेना ! महानगरपालिका आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने भटक्या श्वानांची माहिती देण्यासाठी ८६५५३२३१६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार संपर्क साधला तरी हा मोबाईल उचलला जात नाही. दरम्यान, ७३८५२२६८८८, ७७२०९७ ०५०६ व ८६६८७६९८२७ या क्रमांकाच्या भ्रमणध्वनीवरून भटक्या श्वानांची माहिती देण्यासाठी वारंवार प्रस्तुत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, परंतु भ्रमणध्वनी उचलला नाही. मग संपर्क साधण्याचे आवाहन कशासाठी? लातूर शहरातील प्रभागात जाऊन भटक्या श्वनांना लस दिली जात असल्याचे सांगण्यात आले असले तरी फोन उचलला जात नाही. दर शनिवारी त्या त्या परिसरात जाऊन अँटीरेबीज लसीकरण करणे महानगरपालिकेचा मनोदय आहे. त्यासाठी नागरिकांनी आपल्या भागातील भटक्या श्वानांची माहिती या क्रमांकावर द्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

वृद्ध नागरिक,लहान मुलांना भटक्या श्वानांचा त्रास वृद्ध नागरिक,लहानमुलेवमहिलांनाभटक्याश्वानांचात्रासआहे. अँटीरेबीज लसीकरण तसेच निर्बीजीकरणनुसताच फार्स करण्यात आलेलाआहे वास्तवातकामठप्पआहे. ज्यासंस्थेकडेहेकाम मनपाने सोपवले आहे. त्यासंस्थेवर मनपाचे नियंत्रण नाही. हे यावरून सिद्ध होत आहे.

टॅग्स :laturलातूरdogकुत्रा