शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

धाकधूक वाढली! लातूरमध्ये ३५० कोंबड्यांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 16:56 IST

पुण्याच्या प्रयोगशाळेस वैद्यकीय नमुने पाठवले; अहवालांची प्रतीक्षा

अहमदपूर (जि. लातूर) : तालुक्यातील केंद्रेवाडी येथील ३५० गावरान कोंबड्या काल सकाळी अचानक दगावल्या. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली असून, पशुवैद्यकीय पथकाने पाहणी करून मृत कोंबड्यांचे नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. कोंबड्या कशामुळे दगावल्या, हे मात्र अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असे सांगितले.लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी येथील सदाशिव केंद्रे यांनी दोन महिन्यांपूर्वी अहमदनगर येथून ८०० गावरान कोंबड्यांचे पक्षी आणले होते. त्याचे संगोपन ते करत होते. दरम्यान, शनिवारी सकाळी अचानक त्यातील ३५० कोंबड्यांनी माना टाकल्या. सदरील कोंबड्या दगावल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी प्रभोदयमुळे घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.त्यानंतर लातूर येथील पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश कोकणे, जी.बी. पाटील घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत काही पक्ष्यांचे नमुने घेऊन पुणे येथील विषाणू संशोधन प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.

मृत कोंबड्यांना गाडलेमयत कोंबड्यांना संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जमिनीत गाडण्यात आले, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील करण्यात आला आहे. आजारी व सशक्त कोंबड्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांना प्रतिजैविके व औषधोपचार करण्यात आला.

न्यूमोनिया झाल्याचा संशयकमी व उघड्या जागेमध्ये अधिक कोंबड्या असल्याने आणि थंडीमुळे न्यूमोनिया झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रयोगशाळेकडून अहवाल आल्यानंतर कोंबड्या दगावण्याचे कारण स्पष्ट होईल. इतर पक्ष्यांना बाधा होऊ नये म्हणून प्रतिजैविके दिली जाणार आहेत, तसेच शेतकऱ्याने पीपीई किट व मास्कचा वापर करावा, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने केल्या आहेत.

''अहवालानंतर कारण स्पष्ट होईल''घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली आहे. कमी जागेत अधिक कोंबड्या आहेत. नेमके कोणत्या कारणामुळे कोंबड्या दगावल्या, हे आज सांगता येणार नाही. काही नमुने घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल.- डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.