शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कांद्याबरोबरच आता छाननी समितीनेही आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी!

By हरी मोकाशे | Updated: July 7, 2023 18:34 IST

कांदा विक्री अनुदान : १ हजार १७६ पैकी १२५ प्रस्ताव मंजूर

लातूर : बाजारपेठेत कमी दर मिळाल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अनुदान जाहीर केले हाेते. दरम्यान, जिल्ह्यातून एकूण १ हजार १७६ प्रस्ताव सादर झाले होते. छाननी समितीत १ हजार ५१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव विविध कारणांनी अपात्र ठरविले आहेत. त्यामुळे अनुदानाच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू पुसण्यासाठीच्या समितीने पाणी आणल्याचे पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील काही शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. सर्वाधिक लागवड ही टोमॅटोची असते. सिंचनाची सोय असलेले जिल्ह्यातील काही शेतकरी गेल्या काही वर्षांपासून कांद्याचेही उत्पादन घेत आहेत. दरम्यान, गत जानेवारी अखेरपासून ते मार्चच्या कालावधीत राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे बाजारपेठेत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. परिणामी, कांदा उत्पादकांच्या पदरी लागवडीचा खर्चही पडला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले.

काही शेतकऱ्यांनी लागवडीचा नव्हे तर वाहतुकीचाही खर्च निघत असल्याने संताप व्यक्त करीत आंदोलने केली. त्यामुळे राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीत बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दोन बाजार समितींमध्येच सौदा...जिल्ह्यात एकूण ११ बाजार समित्या आहेत. त्यापैकी लातूर आणि औसा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे सौदे होतात. लातूर बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या १ हजार १५६ तर औश्यात २० शेतकऱ्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले होते. एकूण १ हजार १७६ प्रस्ताव दाखल झाले होते. त्याची तालुकास्तरीय समितीकडून छाननी करण्यात आली.

७/१२ वर नोंद नसल्याने अपात्र...कांदा लागवडीची ७/१२ वर नोंद नसणे, उन्हाळी हंगाम, कांदा विक्री व हिशोबपट्टी यांच्यात तफावत आढळून आल्याने तालुकास्तरीय समितीने ११७६ पैकी १ हजार ५१ प्रस्ताव अपात्र ठरविले आहेत. जिल्ह्यातून केवळ १२५ मंजूर आहेत. कांदा उत्पादकांना जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत अनुदान मिळणार आहे.

३६ लाखांचे मिळणार अनुदान...लातूर बाजार समिती अंतर्गतच्या १२० शेतकऱ्यांसाठी ३५ लाख ९ हजार १८० रुपये, तर औसा बाजार समिती अंतर्गत ५ शेतकऱ्यांसाठी ८९ हजार ३९३ रुपये मिळणे अपेक्षित आहे. एकूण ३५ लाख ९८ हजार ५७४ रुपयांचा निधी आवश्यक आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

अनुदानासाठी प्रस्ताव सादर...जिल्ह्यातील १२५ कांदा उत्पादकांसाठी ३५ कोटी ९८ लाख ५७४ रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. अनुदान मागणीचा प्रस्ताव पणन संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच अनुदान उपलब्ध होईल.- एस. आर. नाईकवाडी, जिल्हा उपनिबंधक.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर