शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

कांद्याबरोबरच आता छाननी समितीनेही आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी!

By हरी मोकाशे | Updated: July 7, 2023 18:34 IST

कांदा विक्री अनुदान : १ हजार १७६ पैकी १२५ प्रस्ताव मंजूर

लातूर : बाजारपेठेत कमी दर मिळाल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अनुदान जाहीर केले हाेते. दरम्यान, जिल्ह्यातून एकूण १ हजार १७६ प्रस्ताव सादर झाले होते. छाननी समितीत १ हजार ५१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव विविध कारणांनी अपात्र ठरविले आहेत. त्यामुळे अनुदानाच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू पुसण्यासाठीच्या समितीने पाणी आणल्याचे पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील काही शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. सर्वाधिक लागवड ही टोमॅटोची असते. सिंचनाची सोय असलेले जिल्ह्यातील काही शेतकरी गेल्या काही वर्षांपासून कांद्याचेही उत्पादन घेत आहेत. दरम्यान, गत जानेवारी अखेरपासून ते मार्चच्या कालावधीत राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे बाजारपेठेत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. परिणामी, कांदा उत्पादकांच्या पदरी लागवडीचा खर्चही पडला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले.

काही शेतकऱ्यांनी लागवडीचा नव्हे तर वाहतुकीचाही खर्च निघत असल्याने संताप व्यक्त करीत आंदोलने केली. त्यामुळे राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीत बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दोन बाजार समितींमध्येच सौदा...जिल्ह्यात एकूण ११ बाजार समित्या आहेत. त्यापैकी लातूर आणि औसा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे सौदे होतात. लातूर बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या १ हजार १५६ तर औश्यात २० शेतकऱ्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले होते. एकूण १ हजार १७६ प्रस्ताव दाखल झाले होते. त्याची तालुकास्तरीय समितीकडून छाननी करण्यात आली.

७/१२ वर नोंद नसल्याने अपात्र...कांदा लागवडीची ७/१२ वर नोंद नसणे, उन्हाळी हंगाम, कांदा विक्री व हिशोबपट्टी यांच्यात तफावत आढळून आल्याने तालुकास्तरीय समितीने ११७६ पैकी १ हजार ५१ प्रस्ताव अपात्र ठरविले आहेत. जिल्ह्यातून केवळ १२५ मंजूर आहेत. कांदा उत्पादकांना जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत अनुदान मिळणार आहे.

३६ लाखांचे मिळणार अनुदान...लातूर बाजार समिती अंतर्गतच्या १२० शेतकऱ्यांसाठी ३५ लाख ९ हजार १८० रुपये, तर औसा बाजार समिती अंतर्गत ५ शेतकऱ्यांसाठी ८९ हजार ३९३ रुपये मिळणे अपेक्षित आहे. एकूण ३५ लाख ९८ हजार ५७४ रुपयांचा निधी आवश्यक आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

अनुदानासाठी प्रस्ताव सादर...जिल्ह्यातील १२५ कांदा उत्पादकांसाठी ३५ कोटी ९८ लाख ५७४ रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. अनुदान मागणीचा प्रस्ताव पणन संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच अनुदान उपलब्ध होईल.- एस. आर. नाईकवाडी, जिल्हा उपनिबंधक.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर