शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे लातूरच्या विद्यापीठ उपकेंद्रात बोंब मारो आंदोलन

By हणमंत गायकवाड | Updated: March 13, 2024 17:01 IST

विद्यापीठाच्या परीक्षा झाल्यानंतर वेळेवर निकाल लागत नाही. तसेच पुनर्मूल्यांकन व मागच्या विषयांचा परीक्षा फॉर्म एकाच वेळी भरून घेण्यात येत आहेत.

लातूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर नजीक पेठ येथील उपकेंद्रात विविध मागण्यांसाठी बुधवारी बोंब मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विद्यापीठाच्या परीक्षा झाल्यानंतर वेळेवर निकाल लागत नाही. तसेच पुनर्मूल्यांकन व मागच्या विषयांचा परीक्षा फॉर्म एकाच वेळी भरून घेण्यात येत आहेत. पुनर्मूल्यांकनाचा निकाल लवकर लावून ज्या विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत किंवा जे विद्यार्थी पास होत आहेत, अशा विद्यार्थ्यांचे घेतलेले शुल्क परत करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगर सहमंत्री नरेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ उपकेंद्र परिसरात हे आंदोलन झालं. या आंदोलनात सुशांत एकुर्गे, प्रणव सागर, प्रसाद हलकंचे, भागवत बिरादार, यश आर्वीकर, सागर वाडीकर, दीपक यादव, राजेश सोमासे, रवी माळी, योगेश कोलबुदे, वैष्णवी शिंदे, वैष्णवी शितोळे, तेजूमई राऊत, अभिजित बोरोळे, राम जाधव, ऋषिकेश कदम, अक्षय स्वामी, ओमकार पोद्दार, स्नेहल जाधव, अजय ठाकूर यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

वेळेवर परीक्षा घेऊन वेळेत निकाल द्यावाविद्यापीठाच्या परीक्षा विभागाने वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल देणे अपेक्षित आहे; परंतु निकाल कधीच वेळेत लागत नाही त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख तसेच मूल्यांकन करण्याची तारीख एकच येते. परीक्षा संपली तरी मूल्यांकनाचा निकाल लागत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. या बाबीचा विचार करून वेळेत निकाल आणि वेळेत परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी अविपवाच्या वतीने यावेळी करण्यात आली.

टॅग्स :laturलातूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा