शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे लातूरच्या विद्यापीठ उपकेंद्रात बोंब मारो आंदोलन

By हणमंत गायकवाड | Updated: March 13, 2024 17:01 IST

विद्यापीठाच्या परीक्षा झाल्यानंतर वेळेवर निकाल लागत नाही. तसेच पुनर्मूल्यांकन व मागच्या विषयांचा परीक्षा फॉर्म एकाच वेळी भरून घेण्यात येत आहेत.

लातूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर नजीक पेठ येथील उपकेंद्रात विविध मागण्यांसाठी बुधवारी बोंब मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विद्यापीठाच्या परीक्षा झाल्यानंतर वेळेवर निकाल लागत नाही. तसेच पुनर्मूल्यांकन व मागच्या विषयांचा परीक्षा फॉर्म एकाच वेळी भरून घेण्यात येत आहेत. पुनर्मूल्यांकनाचा निकाल लवकर लावून ज्या विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत किंवा जे विद्यार्थी पास होत आहेत, अशा विद्यार्थ्यांचे घेतलेले शुल्क परत करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगर सहमंत्री नरेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ उपकेंद्र परिसरात हे आंदोलन झालं. या आंदोलनात सुशांत एकुर्गे, प्रणव सागर, प्रसाद हलकंचे, भागवत बिरादार, यश आर्वीकर, सागर वाडीकर, दीपक यादव, राजेश सोमासे, रवी माळी, योगेश कोलबुदे, वैष्णवी शिंदे, वैष्णवी शितोळे, तेजूमई राऊत, अभिजित बोरोळे, राम जाधव, ऋषिकेश कदम, अक्षय स्वामी, ओमकार पोद्दार, स्नेहल जाधव, अजय ठाकूर यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

वेळेवर परीक्षा घेऊन वेळेत निकाल द्यावाविद्यापीठाच्या परीक्षा विभागाने वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल देणे अपेक्षित आहे; परंतु निकाल कधीच वेळेत लागत नाही त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख तसेच मूल्यांकन करण्याची तारीख एकच येते. परीक्षा संपली तरी मूल्यांकनाचा निकाल लागत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. या बाबीचा विचार करून वेळेत निकाल आणि वेळेत परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी अविपवाच्या वतीने यावेळी करण्यात आली.

टॅग्स :laturलातूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा