शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

अहमदपूरच्या पाणीप्रश्नावर पुन्हा विधानसभेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST

अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लिंबाेटी प्रकल्पावरून याेजना राबविण्यात येत आहे. मात्र, या याेजनेला अद्यापही मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही. ...

अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लिंबाेटी प्रकल्पावरून याेजना राबविण्यात येत आहे. मात्र, या याेजनेला अद्यापही मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही. गेल्या काही महिन्यांपासून सदरची पाणीपुरवठा याेजना रखडली आहे. त्यातच नव्या पाईपलाईनवर नळजोडणीसाठी अनधिकृतपणे विनापावती दाेन हजारांचे शुल्क वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यातच कंत्राटदार आणि जीवन प्राधिकरण मात्र कामाच्या प्रगती, दर्जाबाबत कुठलेही उत्तर देण्यास तयार नाही. यामध्ये नागरिकांचे मात्र हाल होत असून, विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. पाणी विकत घेतल्याशिवाय मिळत नसत्याची सध्याला परिस्थिती आहे. अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पावरून १९ किलोमीटरच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील २१ लक्ष लिटर, दहा लाख लिटर क्षमतेचे जलकुंभाची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र जलशुद्धीकरण केंद्राचे काम अद्यापही जवळपास २५ टक्के रखडले आहे. ते होण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पाईपलाइनचे काम करूनही नगरपालिकेकडे जलशुद्धीकरण क्षमता नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच वितरणचे काम ३० टक्के भागातच पूर्ण झाले आहे. उर्वरित भागात वितरणचे काम सुरू आहे. यातून केवळ शहरातील ३० टक्के भागातच १० दिवसांनी पाणी येते. मात्र उर्वरित ७० टक्के भागात ४० दिवसांआड पाणी येत आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर समाधानकारक उत्तर नगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदारांना देता आले नाही. नगरविकास विभागाचे सचिव यांच्या पत्रास केवळ गाेलमाल उत्तर देऊन, काम प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले.

जनतेला नियमित पाणीपुरवठा करावा...

अहमदपूरचे नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. चाळीस दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. याबाबत अनेक वेळा बैठका, चर्चा आणि निवेदन देऊनही संबंधित यंत्रणा काम करीत नाही. त्यासाठी विधानसभेत दुसऱ्यांदा आपणास तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे. नगरपरिषद, कंत्राटदार आणि जीवन प्राधिकरणाने सदर याेजनेचे काम लवकर पूर्ण करावे, जनतेला नियमित पाणीपुरवठा करावा, असे आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले.