शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

४४ कोटींची पाणीपुरवठा योजना असतानाही अहमदपूरकरांची तहान दाेन टँकरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेस चार वर्षे पूर्ण होऊनही ही योजना पूर्ण न झाल्याने पुन्हा अहमदपूरकरांना टँकरवर अवलंबून ...

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेस चार वर्षे पूर्ण होऊनही ही योजना पूर्ण न झाल्याने पुन्हा अहमदपूरकरांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. घागरभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाई लक्षात घेऊन दोन टँकरची व्यवस्था केली आहे. वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने नगरसेवकांनी योजनेचा वाढदिवस साजरा करून कंत्राटदार व जीवन प्राधिकरणाचा निषेध नोंदवला आहे.

अहमदपूरची पाणीपुरवठा योजना ४ वर्षांपासून प्रलंबित आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये निविदा होऊन मार्च २०१८ ला कार्यारंभ आदेश देण्यात आला. हे काम देताना सर्वसाधारण सभेमध्ये वाद होऊन काही नगरसेवकांनी सदरील गुत्तेदाराला काम देऊ नये, असा ठराव घेतला होता. मात्र बहुमताने ६.९९ टक्के वाढीव दराने निविदा मंजूर करण्यात आली. २४ महिन्यात काम पूर्ण करून योजना पालिकेकडे हस्तांतरण करणे आवश्यक असताना आजही योजनेचे काम २० टक्के अपूर्ण आहे. आजपर्यंत पाणीपुरवठ्याचे शुक्लकाष्ट सुरू असून चार वर्षांपासून अहमदपूरकरांना योजनेतून कुठलाही लाभ झाला नाही.

पाणीपुरवठा ४० दिवसातून होतो. त्यामुळे टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. त्याचा दरही १५० ते २०० रुपये प्रति टॅंकर आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. अनेक ठिकाणी तांत्रिक कामांमध्ये अडचणी असल्याचे दिसून येत असून याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कुठलेही उत्तर देण्यास तयार नाही. दरम्यान, सदर योजनेला वेळ लागत असल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बैठक बोलावून त्यात एक महिन्याची मुदत देऊन काम पूर्ण करण्यासंबंधी सांगितले. मात्र त्याला १५ दिवस झाले. परंतु, कामात कुठलीही प्रगती दिसून येत नाही.

जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाई लक्षात घेता दहा हजार लिटरचे दोन टँकर नगरपालिकेकडे हस्तांतरित केले. मात्र ज्या भागात पाणीटंचाई आहे, त्या भागात सदरील मोठे टँकर जातच नसल्यामुळे पाणीटंचाई कशी दूर होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगरसेवकांकडून संताप...

जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिन्याची मुदत दिली असून त्यातील १५ दिवस झाले तरी कामात समाधानकारक प्रगती झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कंत्राटदाराच्या विरोधात पालिकेतील नगरसेवकांनी योजनेचा चौथा वाढदिवस साजरा करून निषेध नोंदविला. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय मिरकले, संदीप चौधरी, रवी महाजन, अलिम घुडन सादिक चाऊस, बालाजी आगलावे आदी उपस्थित होते.

पाणीटंचाई जुन्या गावात असून त्या ठिकाणी ४० ते ५३ दिवसाला पाणी येते. मात्र टँकर मोठे असल्याने आणि गल्ली छोट्या असल्याने तिथे पाणीटंचाई कायम आहे.

पाणीपुरवठ्याच्या तपासणीचे काम चालू असून साधारणतः १५ एप्रिलपर्यंत पूर्ण काम होऊन सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता विकास बडे यांनी सांगितले.