शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाअभावी रखडला अहमदपूरचा वळण रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST

अहमदपूर : राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ वरील शिरुर ताजबंद गावाजवळील बाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, ...

अहमदपूर : राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ वरील शिरुर ताजबंद गावाजवळील बाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, सर्वाधिक वाहतूक असलेल्या अहमदपूर वळण रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. त्यामुळे शहरातील वाहनधारकांची कसरत होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ साठी भूसंपादन आणि मार्ग निर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे. यात शिरुर ताजबंद गावाजवळून जाणाऱ्या वळण रस्त्याचे मातीकाम सुरु झाले आहे. येत्या काही दिवसात प्रत्यक्ष काँक्रिटच्या कामास सुरुवात होणार आहे. तसेच या वळण रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजाही मागील वर्षी वाटप करण्यात आला आहे. परंतु, अहमदपूर शहराबाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्याचे काम २०१७ पासून अद्यापही रखडले आहे.

अद्यापपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यास मावेजा मिळाला नाही. याबाबत मावेजा अधिक असल्याने हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या लवादाकडे होते. परंतु, यासंबंधीचा निकाल लागून वर्ष उलटले तरी संबंधित भूसंपादनाचे काम रखडले आहे. त्यासाठी २७ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली, नागपूर व नांदेड येथे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळताच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या नावे मावेजा जमा होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

१५ दिवसात मावेजा मिळणार...

अहमदपूर शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या मावेजा संबंधीचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या दिल्ली, नागपूर आणि नांदेड येथील कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाली आहे. येत्या १० दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर मावेजा जमा होणार असल्याचे भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.

मावेजा त्वरित वाटप करावा...

अहमदपूर वळण रस्त्याचे काम २०१७ पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे गेले होते. मार्चमध्ये मोबदल्याची रक्कम राज्य शासनाकडे आली. त्यानंतर काही शेतकऱ्यांना वाटप झाले. परंतु, अनेकांची रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा मावेजा त्वरित देण्यात यावा, अशी मागणी आशिष गुणाले यांनी केली आहे.

मावेजा वाटपात भेदभाव...

मावेजा वाटपात भेदभाव झाल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काहींना नोटीस देऊन त्यांचा मावेजा खात्यावर जमा करण्यात आला आहे. काहींना अद्यापही नोटीस प्राप्त झाली नाही, अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे.