शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

अहमदपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST

सलीम सय्यद /अहमदपूर : प्रतिदिन पेट्रोल, डिझेल व स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या किमतीत सतत वाढ होत आहे. घरगुती सिलिंडरची किंमत ...

सलीम सय्यद /अहमदपूर : प्रतिदिन पेट्रोल, डिझेल व स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या किमतीत सतत वाढ होत आहे. घरगुती सिलिंडरची किंमत ७१९ रुपयांवरून ८४४ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांना सिलिंडर परवडत नसल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात असल्याने शासनाच्या चुलमुक्त, धूरमुक्त अभियान कागदावरच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ग्रामीण भागातील गरीब मोलमजुरी करीत जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे. यासाठी केंद्र सरकारने उज्वला योजनेंतर्गत गॅसचे वितरण केले. मात्र, गॅसचे भाव गगनाला भिडल्याने, त्याचबराेबर सबसीडीही जवळपास बंदच झाल्याने उज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून, यामुळे सर्वांचेच बजेट कोलमडले आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यासमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना उन्हात वणवण भटकंती करीत सरपण जमा करावे लागत आहे. धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागते. महिलांचे हे हाल थांबून व वनांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे यासाठी केंद्राच्यावतीने पंतप्रधान उज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. कोरोना संसर्गामुळे ठप्प असलेले काही उद्योग, व्यवसाय पुन्हा सुरू झाले असले तरी अजूनही आर्थिक मंदीचे सावट कायम असल्याने रोजगाराची समस्या कायम आहे. अशात सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सतत वाढ होत असल्याने गोरगरिबांची पंचाईत झाली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत ८४४ रुपयांच्या वर पोहोचली असून, सबसिडी मात्र केवळ ८ रुपये ४ पैसे एवढीच असल्याने गॅसचा खर्च वाढला आहे. अशात गॅस सिलिंडर घेणे परवडत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक पुन्हा चुलींचा आधार घेत आहे. त्यामुळे शासनाची पर्यावरणयुक्त गाव संकल्पना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

वाढती महागाई चिंतेची बाब...

गत काही महिन्यांपासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जीवनाश्यक सर्वच वस्तूंचे भाव वाढत असताना गॅस सिलिंडरचे भावही वाढले आहे. दररोज वाढत जाणारी महागाई चिंतेची ठरत आहे. घरातील खर्च भागविताना नाकीनऊ येत आहे.

गॅसचे दर गगनाला भिडले असून, सर्वसामान्य नागरिकांना हे दर परवडणारे नाहीत त्यात आता अनुदानदेखील अत्यंत कमी येत आहे. त्यात आता गॅस सिलिंडरचे दरही वाढत असल्याने गॅस वापरणे शक्य नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याचे जिजाबाई चिलकरवार यांनी सांगितले.

सिलिंडरचा खर्च आवक्याबाहेर...

गेल्या महिनाभरात सिलिंडरच्या किमतीत १२५ एवढी रुपयांची वाढ झाली. सबसिडी केवळ ८ रुपये ४ पैसे दिली जात आहे. आधीच कोरोनामुळे काम मिळत नसताना सिलिंडरचा वाढता खर्च कोठून भरून काढावा, असा प्रश्न आहे. त्यामुळेच आम्ही आता चुलीवर स्वयंपाक करीत असून, सरपणासाठी भटकंती करीत असल्याचे परिसरातील महिलांचे म्हणणे आहे.

सबसिडी वाढविण्याची गरज...

उज्वला योजनेंतर्गत गॅस मिळाल्याने खूप आनंद झाला; मात्र सिलिंडरचे दर आता दररोजच वाढत चालल्याने आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे. महागडा गॅस वापरणे परवडत नसल्याने चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. त्यामुळे शासनाने गॅसवरील सबसिडी वाढविण्याची गरज आहे, असे प्रवीण लांजे म्हणाले, तर गॅस सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक चुलीवरच स्वयंपाक करीत असल्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातून बुकिंगचे प्रमाण खूपच कमी झाले असल्याचे गॅस एजन्सीचे संचालक महेंद्र खंडागळे म्हणाले.