शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कृषी विभागाचे वरातीमागून घोडे; मुदतअखेरीस पीकविमा जागृती !

By हरी मोकाशे | Updated: December 8, 2023 18:36 IST

ज्वारीसाठीची मुदत संपली : हरभरा, गव्हाच्या विम्यासाठी आठवडा शिल्लक

लातूर : शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा असलेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार प्रभारींवर असल्याने त्याचा परिणाम बळीराजावर पडत आहे. रबी हंगामातील ज्वारीचा विमा उतरविण्याची मुदत संपली आहे तर हरभरा, गव्हाचा विमा काढण्यासाठी आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. पीकविमा जनजागृतीची कृषी विभागाला आता जाग आल्याने शुक्रवारपासून १० वाहनांद्वारे प्रचारास सुरुवात केली आहे. कृषीचा हा कारभार म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची चर्चा होत आहे.

कुठलीही नैसर्गिक आपत्ती येऊन शेती पिकांचे नुकसान झाल्यास सदरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे खरीप आणि रबी या दोन्ही हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची नेहमीच लक्ष असते. दरम्यान, यंदा राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांचा आणखीन ओढा वाढला आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसाठी १ नोव्हेंबरपासून पीकविमा भरण्यास सुरुवात करण्यात आली. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात ऑनलाईन प्रस्ताव दाखल करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ज्वारीसाठी ५ डिसेंबरपर्यंत तर हरभरा, गव्हासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तेव्हा कृषी विभागाकडून १० वाहनांद्वारे जिल्ह्यात पीकविम्यासंदर्भात जनजागृती करण्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.

जिल्ह्यात सव्वातीन लाख हेक्टरवर पेरा...जिल्ह्यात रबीचे सरासरी क्षेत्र ३ लाख १७ हजार २३ हेक्टर आहे. प्रत्यक्षात ३ लाख २२ हजार २५४ हेक्टरवर पेरा झाला आहे. त्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झाला असून तो २ लाख ६४ हजार ४४३ हेक्टरवर झाला आहे. त्यापाठोपाठ ज्वारीचा ३१ हजार ३४४ हेक्टरवर पेरा झाला आहे. तसेच गव्हाचा केवळ ८ हजार ५९३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा...पीक - पेरणीज्वारी - ३१३४४गहू - ८५९३मका - १५५३हरभरा - २६४४४३करडई - १५६४२जवस - ७९सूर्यफुल - ३९

सात महिन्यांपासून प्रभारीराज...जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांची मे अखेरीस बदली झाली. तेव्हापासून या पदाचा कारभार प्रभारींवर सुरु आहे. त्यामुळे प्रभारींसह काही कर्मचाऱ्यांवरही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे. सध्याचे प्रभारी हे प्रशिक्षणासाठी अन्यत्र गेल्याने कृषी उपसंचालकांवर पदभार सोपविण्यात आला आहे. सात महिन्यांपासून नियमित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे.

१५ डिसेंबरपर्यंत पीकविम्याची मुदत...ज्वारीसाठीचा विमा काढण्याची मुदत संपली आहे. हरभरा आणि गहू पिकांचा विमा काढण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एक रुपयांत पीकविमा काढण्याचे बहुतांश शेतकऱ्यांना माहिती आहे. प्रचार, प्रसिध्दीसाठी पीकविमा कंपनीकडून काल १० वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.- महेश क्षीरसागर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाlaturलातूरFarmerशेतकरी