शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

शनिवारही आंदोलनाने गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST

चक्काजाम आंदोलन; वाहनांच्या रांगाच रांगा... केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी शनिवारी ...

चक्काजाम आंदोलन; वाहनांच्या रांगाच रांगा...

केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी आणि कामगारविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी शनिवारी दुपारी १२ ते ३ या कालावधीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मार्ग रोखल्याने दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

अंबाजोगाई रोड येथील आंदोलनात काँग्रेस, महाराष्ट्र विकास आघाडी आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये ॲड. व्यंकटराव बेद्रे, मंचकराव डोणे, ॲड. प्रमोद जाधव, बसवंतअप्पा उबाळे, प्रवीण पाटील धनेगावकर, ॲड. प्रदीपसिंह गंगणे, प्रा. एकनाथ पाटील, सुरेश चव्हाण, गोविंद पाटील रेणापूरकर, रमेश सूर्यवंशी, ॲड. शेषराव हाके, रणधीर सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैक येथे शनिवारी दुपारी १२ ते २ या कालावधीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा...

लातुरातील आंदोलनात शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे ॲड. उदय गवारे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, विश्वंभर भोसले, अशोक गोविंदपूरकर, काँग्रेसचे लातूर तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, दगडू मिटकरी, ॲड. फारूख शेख, आसिफ बागवान, ॲड. देवीदास बोरूळे, सिकंदर पटेल, सचिन गंगावणे, प्रवीण सूर्यवंशी, पंडित कावळे, जगन्नाथ पाटील, ॲड. सुहास बेद्रे, दत्ता सोमवंशी, शरद देशमुख, प्रमोद जोशी, सुंदर पाटील, तबरेज तांबोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्र सरकारने पारित केलेले कामगार आणि शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी विविध पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. निलंगा, देवणी आणि रेणापूर येथेही चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

सरकारी बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीने केला जात आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी जिल्हाभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

लातुरातील औसा महामार्गावरील वासनगाव पाटी येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास आंदोलन झाले. यावेळी या मार्गावर काही तासांसाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनस्थळी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ चक्काजाम आंदोलन झाले.