शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

पत्नीच्या निधनानंतर पतीनेही सोडले प्राण! लातूर जिल्ह्यातील होळी येथील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: May 24, 2023 23:21 IST

औसा तालुक्यातील होळी येथील रहिवासी सरस्वती सदाशिव जाधव (वय ९५) यांचे बुधवारी दुपारी २:५७ वाजता निधन झाले.

लातूर : बुधवारी सकाळी पत्नीचे निधन झाल्याचे कळताच पतीनेही त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास प्राण सोडले. ही घटना लातूर जिल्ह्यातील होळी (ता. औसा) येथे बुधवारी घडली.

औसा तालुक्यातील होळी येथील रहिवासी सरस्वती सदाशिव जाधव (वय ९५) यांचे बुधवारी दुपारी २:५७ वाजता निधन झाले. पत्नीच्या निधनाची बातमी समजताच पती सदाशिव शामराव जाधव (१०७) यांनाही धक्का बसला. पत्नीच्या निधनाच्या दु:खातच बुधवारी सायंकाळी ५:१४ वाजता त्यांनीही आपले प्राण सोडले. 

एकाच दिवशी अडीच तासाच्या आत पत्नीपाठोपाठ पतीनेही आपले प्राण सोडले आहे. दोघांच्याही पार्थिवावर गुरुवारी सकाळी ९ वाजता मूळगावी होळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुली, चार मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

शेवटपर्यंत त्यांनी केला पायी प्रवास...सदाशिव जाधव यांनी शेवटपर्यंत पायी प्रवास केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन ते आपल्या बाभळगाव, शिवणी आणि खरोळा येथील मुलींकडे पायीच जात होते. वाहनाने प्रवास करणे त्यांनी कायम टाळल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.

पदरात कायम असायची भाकर!लातूर जिल्ह्यातील बाभळगाव, शिवणी आणि खरोळा गावात मुली दिल्यानंतर त्यांनी कायम त्यांच्याकडे जाताना पदरात भाकर बांधून घेतली. बाहेरचे खाणे कायम टाळले. दोघेही घरातील भाकर बांधूनच घराबाहेर पडत असत. शेवटच्या श्वासापर्यंत व्यसनापासून दूर राहत घराबाहेरील खाणे त्यांनी टाळल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर