शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ' त्या ' शेतकऱ्याच्या हरभऱ्याची झाली विक्री; कृषी राज्यमंत्र्यानी दिल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 19:54 IST

तळेगाव (बो ) येथील एका शेतकऱ्याचा हरभरा हमीभावाने विक्री होत नसल्याने 'मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर ' या सदराखाली 'लोकमत' ने सविस्तर वृत्ताकंन केले होते .त्या वृत्ताची थेट राज्याच्या कृषीराज्यमंत्र्यानी दखल घेतली असुन, त्या शेतकऱ्याचा हरभरा तत्काळ खरेदी करण्याच्या सुचना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यास दिल्या.

शिरूर अनंतपाळ (लातूर ) :  तालुक्यातील तळेगाव (बो ) येथील एका शेतकऱ्याचा हरभरा हमीभावाने विक्री होत नसल्याने 'मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर ' या सदराखाली 'लोकमत' ने सविस्तर वृत्ताकंन केले होते .त्या वृत्ताची थेट राज्याच्या कृषीराज्यमंत्र्यानी दखल घेतली असुन, त्या शेतकऱ्याचा हरभरा तत्काळ खरेदी करण्याच्या सुचना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यास दिल्या. त्यामुळे अखेर त्या शेतकऱ्याचा १५० क्विंटल हरभरा आज खरेदी करण्यात आला आहे .परिणामी त्याच्या मुलीच्या विवाहाचा मार्ग मोकळा झाला असल्याने या शेतकरी कुटूंबाने 'लोकमत'चे आभार व्यक्त केले आहेत .

तालुक्यातील तळेगाव( बो ) येथील भागवत एकुर्गे या शेतकऱ्यास यंदाच्या रबी हंगामात एकत्र कुटूंबातील ५ हेक्टर्स ५० आर जमीनीत जवळपास २०० कट्टे हरभरे झाले . हरभऱ्याची हमीभावात विक्री करून मुलीचा विवाह पार पाडता येईल, या विचाराने त्यानी हरभऱ्याची विक्रीसाठी आँनलाईन नोंदणी केली आणि मुलीच्या विवाहाची २४ एप्रील ही तारीख काढली होती .परंतु हरभऱ्याची विक्री झालीच नाही त्यामुळे भागवत एकुर्गे याना आपल्या मुलीच्या विवाहाची तारीख बदलुुन १२ मे काढावी लागली .याबाबत लोकमतने सविस्तर वृत्ताकंन करून शेतकऱ्याची व्यथा मांडली होती . त्या वृत्ताची दखल थेट राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतली. रयत क्रांती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल मोरे ,जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे यांच्या माध्यमातुन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यास सदरील शेतकऱ्याचा हरभरा तात्काळ हमीभावाने खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे भागवत एकुर्गे यांचा एकंदर १५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या मुलीच्या विवाहाचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकमतने सर्व प्रथम या शेतकऱ्याची व्यथा मांडल्याने एकुर्गे कुटूंबाने लोकमतचे आभार मानले आहेत.

आता तारीख बदलणार नाही याबाबत हरभरा उत्पादक शेतकरी भागवत एकुर्गे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले गुरूवारी हरभऱ्याची हमीभावात खरेदी करण्यात आली आहे .त्यामुळे लवकरच हरभऱ्याचे बील जमा होईल .त्यामुळे आता विवाहाची तारीख बदलण्याची गरज पडणार नाही . लोकमतच्या वृत्तामुळे आपल्याला न्याय मिळाल्याची भावनाही एकुर्गे यानी यावेळी व्यक्त केली आहे

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजारSadabhau Khotसदाभाउ खोत