शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ' त्या ' शेतकऱ्याच्या हरभऱ्याची झाली विक्री; कृषी राज्यमंत्र्यानी दिल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 19:54 IST

तळेगाव (बो ) येथील एका शेतकऱ्याचा हरभरा हमीभावाने विक्री होत नसल्याने 'मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर ' या सदराखाली 'लोकमत' ने सविस्तर वृत्ताकंन केले होते .त्या वृत्ताची थेट राज्याच्या कृषीराज्यमंत्र्यानी दखल घेतली असुन, त्या शेतकऱ्याचा हरभरा तत्काळ खरेदी करण्याच्या सुचना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यास दिल्या.

शिरूर अनंतपाळ (लातूर ) :  तालुक्यातील तळेगाव (बो ) येथील एका शेतकऱ्याचा हरभरा हमीभावाने विक्री होत नसल्याने 'मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर ' या सदराखाली 'लोकमत' ने सविस्तर वृत्ताकंन केले होते .त्या वृत्ताची थेट राज्याच्या कृषीराज्यमंत्र्यानी दखल घेतली असुन, त्या शेतकऱ्याचा हरभरा तत्काळ खरेदी करण्याच्या सुचना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यास दिल्या. त्यामुळे अखेर त्या शेतकऱ्याचा १५० क्विंटल हरभरा आज खरेदी करण्यात आला आहे .परिणामी त्याच्या मुलीच्या विवाहाचा मार्ग मोकळा झाला असल्याने या शेतकरी कुटूंबाने 'लोकमत'चे आभार व्यक्त केले आहेत .

तालुक्यातील तळेगाव( बो ) येथील भागवत एकुर्गे या शेतकऱ्यास यंदाच्या रबी हंगामात एकत्र कुटूंबातील ५ हेक्टर्स ५० आर जमीनीत जवळपास २०० कट्टे हरभरे झाले . हरभऱ्याची हमीभावात विक्री करून मुलीचा विवाह पार पाडता येईल, या विचाराने त्यानी हरभऱ्याची विक्रीसाठी आँनलाईन नोंदणी केली आणि मुलीच्या विवाहाची २४ एप्रील ही तारीख काढली होती .परंतु हरभऱ्याची विक्री झालीच नाही त्यामुळे भागवत एकुर्गे याना आपल्या मुलीच्या विवाहाची तारीख बदलुुन १२ मे काढावी लागली .याबाबत लोकमतने सविस्तर वृत्ताकंन करून शेतकऱ्याची व्यथा मांडली होती . त्या वृत्ताची दखल थेट राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतली. रयत क्रांती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल मोरे ,जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे यांच्या माध्यमातुन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यास सदरील शेतकऱ्याचा हरभरा तात्काळ हमीभावाने खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे भागवत एकुर्गे यांचा एकंदर १५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या मुलीच्या विवाहाचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकमतने सर्व प्रथम या शेतकऱ्याची व्यथा मांडल्याने एकुर्गे कुटूंबाने लोकमतचे आभार मानले आहेत.

आता तारीख बदलणार नाही याबाबत हरभरा उत्पादक शेतकरी भागवत एकुर्गे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले गुरूवारी हरभऱ्याची हमीभावात खरेदी करण्यात आली आहे .त्यामुळे लवकरच हरभऱ्याचे बील जमा होईल .त्यामुळे आता विवाहाची तारीख बदलण्याची गरज पडणार नाही . लोकमतच्या वृत्तामुळे आपल्याला न्याय मिळाल्याची भावनाही एकुर्गे यानी यावेळी व्यक्त केली आहे

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजारSadabhau Khotसदाभाउ खोत