शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाहने लावण्यासाठी जागा पुरेना, रस्त्यावरील पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:54 IST

लातूर- शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी नागरिकांकडे जागाच नाही. नाईलाजास्तव अनेकजण ...

लातूर- शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी नागरिकांकडे जागाच नाही. नाईलाजास्तव अनेकजण घरासमोर आणि रस्त्यांच्या कडेला दुकानांसमोर वाहने उभी करतात. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. महापालिकेकडून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र पार्किंगची जागा बांधकाम परवान्याच्या वेळी ठरवून दिली जाते. मात्र, नंतर ही जागाच गायब होते. परिणामी शहराच्या पार्किंगचा प्रश्न अधिक जटिल होत आहे. लातूर शहरात खासगी वाहनांची संख्या वाढू नये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी शहरबस वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतरही खासगी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात एकूण ५ लाख ४३ हजार ५०८ वाहनांची संख्या असून त्यात तब्बल ४ लाख ४ हजार ८८८ दुचाकी आहेत. तर ६० हजार ५३१ चारचाकी वाहने असून ऑटाेरिक्षांची संख्याही २० हजारांच्या घरात आहे. यातील ५० टक्के वाहने शहरात आहेत. शहरी भागात पार्किंगसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे असंख्य वाहनधारक छोट्या गल्ल्यांमधील घरासमोर चारचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बाजारात रस्त्यावरच चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. मनपाचे टोईंग व्हॅन असले तरी ते ठरावीक भागातच फिरत असल्याने इतर भागांत वाहनधारकांची मनमानी आहे. रात्री-अपरात्री बिनधास्तपणे रस्त्यावर वाहने लावून झोपल्यामुळे गल्लीतून रुग्ण घेऊन जाता येत नसल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत. यातून काहींना जीव गमवावा लागला आहे. याकडे यंत्रणा कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्य मार्गांवर सर्वाधिक त्रास...

लातूर शहरातील बार्शी रोड, गंजगोलाई, अंबाजोगाई रोड, औसा रोड या मार्गावर काही ठरावीक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. रेल्वेलाईनचा समांतर रस्ता अनधिकृत पार्किंगमध्ये अडकला आहे. पाच नंबर चौक ते खाडगाव चौक हॉटेल, ढाब्याच्या पार्किंगने व्यापला आहे. जुना रेणापूर नाका भागात असलेल्या बसस्थानकात बसेस घेऊन जाण्यासाठी चालकांना कसरत करावी लागते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हॉटेल व्यावसायिकांचीच पार्किंग आहे. वाहनधारकांना दंड आकारणारी यंत्रणा हॉटेल, इमारत मालकांकडे दुर्लक्षित करते.

- वाहन मालकांवर कारवाई...

रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पध्दतीने वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिसांकडून कलम १२२ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनेकदा वाहनेही जप्त केली जातात.

व्हीआयपी मंडळी ज्या रस्त्याने ये-जा करणार आहेत. त्या रस्त्यावर एकही वाहन उभे करू दिले जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांकडून अगोदरच कारवाई करण्यात येते. वाहतूक पोलिसांकडून मुख्य रस्त्यांवर दिवसभर कलम १२२ नुसार कारवाई केली जाते.