शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

वाहने लावण्यासाठी जागा पुरेना, रस्त्यावरील पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:54 IST

लातूर- शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी नागरिकांकडे जागाच नाही. नाईलाजास्तव अनेकजण ...

लातूर- शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी नागरिकांकडे जागाच नाही. नाईलाजास्तव अनेकजण घरासमोर आणि रस्त्यांच्या कडेला दुकानांसमोर वाहने उभी करतात. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. महापालिकेकडून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र पार्किंगची जागा बांधकाम परवान्याच्या वेळी ठरवून दिली जाते. मात्र, नंतर ही जागाच गायब होते. परिणामी शहराच्या पार्किंगचा प्रश्न अधिक जटिल होत आहे. लातूर शहरात खासगी वाहनांची संख्या वाढू नये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी शहरबस वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतरही खासगी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात एकूण ५ लाख ४३ हजार ५०८ वाहनांची संख्या असून त्यात तब्बल ४ लाख ४ हजार ८८८ दुचाकी आहेत. तर ६० हजार ५३१ चारचाकी वाहने असून ऑटाेरिक्षांची संख्याही २० हजारांच्या घरात आहे. यातील ५० टक्के वाहने शहरात आहेत. शहरी भागात पार्किंगसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे असंख्य वाहनधारक छोट्या गल्ल्यांमधील घरासमोर चारचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बाजारात रस्त्यावरच चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. मनपाचे टोईंग व्हॅन असले तरी ते ठरावीक भागातच फिरत असल्याने इतर भागांत वाहनधारकांची मनमानी आहे. रात्री-अपरात्री बिनधास्तपणे रस्त्यावर वाहने लावून झोपल्यामुळे गल्लीतून रुग्ण घेऊन जाता येत नसल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत. यातून काहींना जीव गमवावा लागला आहे. याकडे यंत्रणा कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्य मार्गांवर सर्वाधिक त्रास...

लातूर शहरातील बार्शी रोड, गंजगोलाई, अंबाजोगाई रोड, औसा रोड या मार्गावर काही ठरावीक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. रेल्वेलाईनचा समांतर रस्ता अनधिकृत पार्किंगमध्ये अडकला आहे. पाच नंबर चौक ते खाडगाव चौक हॉटेल, ढाब्याच्या पार्किंगने व्यापला आहे. जुना रेणापूर नाका भागात असलेल्या बसस्थानकात बसेस घेऊन जाण्यासाठी चालकांना कसरत करावी लागते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हॉटेल व्यावसायिकांचीच पार्किंग आहे. वाहनधारकांना दंड आकारणारी यंत्रणा हॉटेल, इमारत मालकांकडे दुर्लक्षित करते.

- वाहन मालकांवर कारवाई...

रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पध्दतीने वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिसांकडून कलम १२२ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनेकदा वाहनेही जप्त केली जातात.

व्हीआयपी मंडळी ज्या रस्त्याने ये-जा करणार आहेत. त्या रस्त्यावर एकही वाहन उभे करू दिले जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांकडून अगोदरच कारवाई करण्यात येते. वाहतूक पोलिसांकडून मुख्य रस्त्यांवर दिवसभर कलम १२२ नुसार कारवाई केली जाते.