शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

वाहने लावण्यासाठी जागा पुरेना, रस्त्यावरील पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:54 IST

लातूर- शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी नागरिकांकडे जागाच नाही. नाईलाजास्तव अनेकजण ...

लातूर- शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी नागरिकांकडे जागाच नाही. नाईलाजास्तव अनेकजण घरासमोर आणि रस्त्यांच्या कडेला दुकानांसमोर वाहने उभी करतात. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. महापालिकेकडून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र पार्किंगची जागा बांधकाम परवान्याच्या वेळी ठरवून दिली जाते. मात्र, नंतर ही जागाच गायब होते. परिणामी शहराच्या पार्किंगचा प्रश्न अधिक जटिल होत आहे. लातूर शहरात खासगी वाहनांची संख्या वाढू नये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी शहरबस वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतरही खासगी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात एकूण ५ लाख ४३ हजार ५०८ वाहनांची संख्या असून त्यात तब्बल ४ लाख ४ हजार ८८८ दुचाकी आहेत. तर ६० हजार ५३१ चारचाकी वाहने असून ऑटाेरिक्षांची संख्याही २० हजारांच्या घरात आहे. यातील ५० टक्के वाहने शहरात आहेत. शहरी भागात पार्किंगसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे असंख्य वाहनधारक छोट्या गल्ल्यांमधील घरासमोर चारचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बाजारात रस्त्यावरच चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. मनपाचे टोईंग व्हॅन असले तरी ते ठरावीक भागातच फिरत असल्याने इतर भागांत वाहनधारकांची मनमानी आहे. रात्री-अपरात्री बिनधास्तपणे रस्त्यावर वाहने लावून झोपल्यामुळे गल्लीतून रुग्ण घेऊन जाता येत नसल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत. यातून काहींना जीव गमवावा लागला आहे. याकडे यंत्रणा कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्य मार्गांवर सर्वाधिक त्रास...

लातूर शहरातील बार्शी रोड, गंजगोलाई, अंबाजोगाई रोड, औसा रोड या मार्गावर काही ठरावीक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. रेल्वेलाईनचा समांतर रस्ता अनधिकृत पार्किंगमध्ये अडकला आहे. पाच नंबर चौक ते खाडगाव चौक हॉटेल, ढाब्याच्या पार्किंगने व्यापला आहे. जुना रेणापूर नाका भागात असलेल्या बसस्थानकात बसेस घेऊन जाण्यासाठी चालकांना कसरत करावी लागते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हॉटेल व्यावसायिकांचीच पार्किंग आहे. वाहनधारकांना दंड आकारणारी यंत्रणा हॉटेल, इमारत मालकांकडे दुर्लक्षित करते.

- वाहन मालकांवर कारवाई...

रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पध्दतीने वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिसांकडून कलम १२२ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनेकदा वाहनेही जप्त केली जातात.

व्हीआयपी मंडळी ज्या रस्त्याने ये-जा करणार आहेत. त्या रस्त्यावर एकही वाहन उभे करू दिले जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांकडून अगोदरच कारवाई करण्यात येते. वाहतूक पोलिसांकडून मुख्य रस्त्यांवर दिवसभर कलम १२२ नुसार कारवाई केली जाते.