शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाहने लावण्यासाठी जागा पुरेना, रस्त्यावरील पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:54 IST

लातूर- शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी नागरिकांकडे जागाच नाही. नाईलाजास्तव अनेकजण ...

लातूर- शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी नागरिकांकडे जागाच नाही. नाईलाजास्तव अनेकजण घरासमोर आणि रस्त्यांच्या कडेला दुकानांसमोर वाहने उभी करतात. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. महापालिकेकडून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र पार्किंगची जागा बांधकाम परवान्याच्या वेळी ठरवून दिली जाते. मात्र, नंतर ही जागाच गायब होते. परिणामी शहराच्या पार्किंगचा प्रश्न अधिक जटिल होत आहे. लातूर शहरात खासगी वाहनांची संख्या वाढू नये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी शहरबस वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतरही खासगी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात एकूण ५ लाख ४३ हजार ५०८ वाहनांची संख्या असून त्यात तब्बल ४ लाख ४ हजार ८८८ दुचाकी आहेत. तर ६० हजार ५३१ चारचाकी वाहने असून ऑटाेरिक्षांची संख्याही २० हजारांच्या घरात आहे. यातील ५० टक्के वाहने शहरात आहेत. शहरी भागात पार्किंगसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे असंख्य वाहनधारक छोट्या गल्ल्यांमधील घरासमोर चारचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बाजारात रस्त्यावरच चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. मनपाचे टोईंग व्हॅन असले तरी ते ठरावीक भागातच फिरत असल्याने इतर भागांत वाहनधारकांची मनमानी आहे. रात्री-अपरात्री बिनधास्तपणे रस्त्यावर वाहने लावून झोपल्यामुळे गल्लीतून रुग्ण घेऊन जाता येत नसल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत. यातून काहींना जीव गमवावा लागला आहे. याकडे यंत्रणा कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्य मार्गांवर सर्वाधिक त्रास...

लातूर शहरातील बार्शी रोड, गंजगोलाई, अंबाजोगाई रोड, औसा रोड या मार्गावर काही ठरावीक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. रेल्वेलाईनचा समांतर रस्ता अनधिकृत पार्किंगमध्ये अडकला आहे. पाच नंबर चौक ते खाडगाव चौक हॉटेल, ढाब्याच्या पार्किंगने व्यापला आहे. जुना रेणापूर नाका भागात असलेल्या बसस्थानकात बसेस घेऊन जाण्यासाठी चालकांना कसरत करावी लागते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हॉटेल व्यावसायिकांचीच पार्किंग आहे. वाहनधारकांना दंड आकारणारी यंत्रणा हॉटेल, इमारत मालकांकडे दुर्लक्षित करते.

- वाहन मालकांवर कारवाई...

रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पध्दतीने वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिसांकडून कलम १२२ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनेकदा वाहनेही जप्त केली जातात.

व्हीआयपी मंडळी ज्या रस्त्याने ये-जा करणार आहेत. त्या रस्त्यावर एकही वाहन उभे करू दिले जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांकडून अगोदरच कारवाई करण्यात येते. वाहतूक पोलिसांकडून मुख्य रस्त्यांवर दिवसभर कलम १२२ नुसार कारवाई केली जाते.