शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

जिल्ह्यात आणखी १७ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी आणखी १७ रुग्णांची भर पडली. यामुळे बाधितांचा आलेख २४ हजार ३८६वर ...

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी आणखी १७ रुग्णांची भर पडली. यामुळे बाधितांचा आलेख २४ हजार ३८६वर पोहोचला असून, यातील २३ हजार ४१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत २८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी २६० व्यक्तिंच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर ५३८ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात १५ जण पॉझिटिव्ह आढळले. प्रयोगशाळेतील चाचणीत २ आणि रॅपिड अँटिजेन चाचणीमध्ये १५ असे एकूण १७ नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, रविवारी ४४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ३, समाजकल्याण हॉस्टेल, कव्हा रोड येथील ३, गृह अलगीकरणामधील ३५ व खासगी रुग्णालयातील असे मिळून एकूण ४४ जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, डॉ. श्रीधर पाठक यांनी दिली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१ तर मृत्यूचे प्रमाण २.९

जिल्ह्यात २४ हजार ३८६पैकी २३ हजार ४१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर आतापर्यंत ६९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१ टक्के तर मृत्यूचे प्रमाण २.९ टक्के आहे. रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधीही ४७३ दिवसांवर आहे.