शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी १७ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी आणखी १७ रुग्णांची भर पडली. यामुळे बाधितांचा आलेख २४ हजार ३८६वर ...

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी आणखी १७ रुग्णांची भर पडली. यामुळे बाधितांचा आलेख २४ हजार ३८६वर पोहोचला असून, यातील २३ हजार ४१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत २८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी २६० व्यक्तिंच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर ५३८ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात १५ जण पॉझिटिव्ह आढळले. प्रयोगशाळेतील चाचणीत २ आणि रॅपिड अँटिजेन चाचणीमध्ये १५ असे एकूण १७ नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, रविवारी ४४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ३, समाजकल्याण हॉस्टेल, कव्हा रोड येथील ३, गृह अलगीकरणामधील ३५ व खासगी रुग्णालयातील असे मिळून एकूण ४४ जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, डॉ. श्रीधर पाठक यांनी दिली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१ तर मृत्यूचे प्रमाण २.९

जिल्ह्यात २४ हजार ३८६पैकी २३ हजार ४१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर आतापर्यंत ६९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१ टक्के तर मृत्यूचे प्रमाण २.९ टक्के आहे. रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधीही ४७३ दिवसांवर आहे.