शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

जिल्ह्यात आणखी १७ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी आणखी १७ रुग्णांची भर पडली. यामुळे बाधितांचा आलेख २४ हजार ३८६वर ...

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी आणखी १७ रुग्णांची भर पडली. यामुळे बाधितांचा आलेख २४ हजार ३८६वर पोहोचला असून, यातील २३ हजार ४१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत २८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी २६० व्यक्तिंच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर ५३८ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यात १५ जण पॉझिटिव्ह आढळले. प्रयोगशाळेतील चाचणीत २ आणि रॅपिड अँटिजेन चाचणीमध्ये १५ असे एकूण १७ नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, रविवारी ४४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ३, समाजकल्याण हॉस्टेल, कव्हा रोड येथील ३, गृह अलगीकरणामधील ३५ व खासगी रुग्णालयातील असे मिळून एकूण ४४ जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, डॉ. श्रीधर पाठक यांनी दिली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१ तर मृत्यूचे प्रमाण २.९

जिल्ह्यात २४ हजार ३८६पैकी २३ हजार ४१४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर आतापर्यंत ६९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१ टक्के तर मृत्यूचे प्रमाण २.९ टक्के आहे. रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधीही ४७३ दिवसांवर आहे.