शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील ९५१ गावांची अंतिम पैसेवारी ४३ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 18:30 IST

लातूर तालुक्याची ३६ पैसे तर देवणी तालुक्याची ४८ पैसे आणेवारी

ठळक मुद्देपैसेवारी जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा...

- संदीप शिंदे

लातूर : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख ५३ हजार ४७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. त्यापैकी ५ लाख ७४ हजार ९२१ हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरवल्याने पिके करपून गेली होती. महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, ९५१ गावांची पैसेवारी ४३ पैसे आली आहे. यामध्ये लातूर तालुक्याची ३६ पैसे सर्वात कमी तर अहमदपूर आणि देवणी तालुक्याची पैसेवारी ४८ पैसे आली आहे.

पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने गतवर्षी खरीप आणि रब्बी हंगाम हातून गेला होता. यावर्षीही खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. हंगामासाठीसोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद ही प्रमुख पिके आहेत. मात्र पावसभावी पिके जळून गेली होती. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या वतीने नजर अंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील १२४ गावांची पैसेवारी ५० पैश्यांपेक्षा जास्त आली होती. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ५३ हजार ४७ हेक्टर प्रस्तावित होते. त्यापैकी ५ लाख ७४ हजार ९२१ हेक्टरवर पेरा झाला होता. तर ७८ हजार १२६ हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडीक राहिले होते. एकूण ९५१ गावांची पैसेवारी ४३ पैसे आली आहे. त्यामध्ये लातूर तालुक्यातील १२३ गावांची ३६ पैसे, औसा १३३ गावांची ३८, रेणापूर तालुक्यातील ७६ गावांची ४०, उदगीर तालुक्यातील ९९ गावांची ४५, जळकोट तालुक्यातील ४७ गावांची ४३, चाकूर तालुक्यातील ८५ गावांची ४०, निलंगा तालुक्यातील १६२ गावांची ४७, देवणी तालुक्यातील ५४ गावांची ४८ तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४८ गावांची ४७ पैसे आणेवारीचा समावेश आहे. महसुल विभागाच्या वतीने मंडळनिहाय पिकांची माहिती आणि उत्पादकतेची माहिती घेऊन अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली. त्यावरच पिकविमा आणि इतर गोष्टी अवलंबून राहतात. अशी माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

तीन वेळेस जाहीर होते पैसेवारी...महसूल विभागाच्या वतीने खरीप हंगामातील पिकांच्या परिस्थितीवर तीन वेळेस पैसेवारी जाहीर केली जाते. त्यामध्ये नजर अंदाज पैसेवारी, सुधारित नजर अंदाज पैसेवारी आणि अंतिम पैसेवारीचा समावेश असतो. जिल्ह्यातील दहाही तालुक्याची सरासरी ४३ पैसे आली आहे. सुरुवातील अहमदपूर तालुक्यातील १२४ गावांची पैसेवारी ५० पैश्यांपेक्षा अधिक आली होती. मात्र, पीक उत्पादनात घट झाल्याने पैसेवारी कमी झाली असल्याचे सांगण्यात आले.

पैसेवारी जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा...महसूल विभागाच्या वतीने पीक परिस्थितीनुसार पैसेवारी जाहीर करण्यात येते. सप्टेंबर, आॅक्टोबर, आणि डिसेंम्बर महिन्यातील पैसेवारीवर पीकविमा यासह अनेक बाबी अवलंबून असतात. ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी आल्याने शासनाकडून नुकसान भरपाईसह अन्य सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीlaturलातूर