शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

लातूर जिल्ह्यातील ९५१ गावांची अंतिम पैसेवारी ४३ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 18:30 IST

लातूर तालुक्याची ३६ पैसे तर देवणी तालुक्याची ४८ पैसे आणेवारी

ठळक मुद्देपैसेवारी जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा...

- संदीप शिंदे

लातूर : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख ५३ हजार ४७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. त्यापैकी ५ लाख ७४ हजार ९२१ हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरवल्याने पिके करपून गेली होती. महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, ९५१ गावांची पैसेवारी ४३ पैसे आली आहे. यामध्ये लातूर तालुक्याची ३६ पैसे सर्वात कमी तर अहमदपूर आणि देवणी तालुक्याची पैसेवारी ४८ पैसे आली आहे.

पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने गतवर्षी खरीप आणि रब्बी हंगाम हातून गेला होता. यावर्षीही खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. हंगामासाठीसोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद ही प्रमुख पिके आहेत. मात्र पावसभावी पिके जळून गेली होती. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या वतीने नजर अंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील १२४ गावांची पैसेवारी ५० पैश्यांपेक्षा जास्त आली होती. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ६ लाख ५३ हजार ४७ हेक्टर प्रस्तावित होते. त्यापैकी ५ लाख ७४ हजार ९२१ हेक्टरवर पेरा झाला होता. तर ७८ हजार १२६ हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडीक राहिले होते. एकूण ९५१ गावांची पैसेवारी ४३ पैसे आली आहे. त्यामध्ये लातूर तालुक्यातील १२३ गावांची ३६ पैसे, औसा १३३ गावांची ३८, रेणापूर तालुक्यातील ७६ गावांची ४०, उदगीर तालुक्यातील ९९ गावांची ४५, जळकोट तालुक्यातील ४७ गावांची ४३, चाकूर तालुक्यातील ८५ गावांची ४०, निलंगा तालुक्यातील १६२ गावांची ४७, देवणी तालुक्यातील ५४ गावांची ४८ तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४८ गावांची ४७ पैसे आणेवारीचा समावेश आहे. महसुल विभागाच्या वतीने मंडळनिहाय पिकांची माहिती आणि उत्पादकतेची माहिती घेऊन अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली. त्यावरच पिकविमा आणि इतर गोष्टी अवलंबून राहतात. अशी माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

तीन वेळेस जाहीर होते पैसेवारी...महसूल विभागाच्या वतीने खरीप हंगामातील पिकांच्या परिस्थितीवर तीन वेळेस पैसेवारी जाहीर केली जाते. त्यामध्ये नजर अंदाज पैसेवारी, सुधारित नजर अंदाज पैसेवारी आणि अंतिम पैसेवारीचा समावेश असतो. जिल्ह्यातील दहाही तालुक्याची सरासरी ४३ पैसे आली आहे. सुरुवातील अहमदपूर तालुक्यातील १२४ गावांची पैसेवारी ५० पैश्यांपेक्षा अधिक आली होती. मात्र, पीक उत्पादनात घट झाल्याने पैसेवारी कमी झाली असल्याचे सांगण्यात आले.

पैसेवारी जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा...महसूल विभागाच्या वतीने पीक परिस्थितीनुसार पैसेवारी जाहीर करण्यात येते. सप्टेंबर, आॅक्टोबर, आणि डिसेंम्बर महिन्यातील पैसेवारीवर पीकविमा यासह अनेक बाबी अवलंबून असतात. ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी आल्याने शासनाकडून नुकसान भरपाईसह अन्य सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीlaturलातूर