शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

पाण्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव; विहीर अधिग्रहणास मंजुरी मिळेना, हिवाळ्यात पाणीटंचाईचे चटके

By हरी मोकाशे | Updated: January 12, 2024 19:13 IST

जिल्ह्यातील ३२ गावे- वाड्या तहानल्या

लातूर : गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस न झाल्याने जिल्ह्यास पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी टंचाईग्रस्त गाव- वाड्यांनी जवळपास तीन आठवड्यांपूर्वी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, अद्यापही त्यास मंजुरी देण्यात आली नाही. परिणामी, पाण्यासाठी भटकंती होत आहे. सध्या जिल्ह्यातील ३२ गावे- वाड्या तहानल्या आहेत.

गत पावसाळ्यात विलंबाने व अल्प प्रमाणात पर्जन्यमान झाले. ऑगस्टमध्ये तर पावसाने महिनाभरापेक्षा अधिक दिवस ताण दिला होता. परिणामी, खरीपातील सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तिरु या प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत. शिवाय, ओढे- नाले खळखळले नाहीत. त्यामुळे मध्यम प्रकल्पासह विहिरी, कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही.

दरवर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस होतो. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची त्यावर आशा होती. परंतु, परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. परिणामी, आशा हवेतच विरल्या. त्यामुळे डिसेंबरपासूनच जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे.

२५ गावे अन् ७ वाड्यांचे अधिग्रहणासाठी प्रस्ताव ...जिल्ह्यातील २५ गावे आणि ७ वाड्यांनी अधिग्रहणाचे एकूण ४० प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. दरम्यान, पंचायत समितीने पाहणी करुन त्यातील ५ गावांचे सहा प्रस्ताव वगळले आहेत. उर्वरितपैकी ६ गावे आणि ५ वाड्यांचे एकूण ११ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर केले आहेत. विशेषत: हे प्रस्ताव सादर करुन जवळपास तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र, अद्यापही त्यास मंजुरी मिळाली नसल्याचे पहावयास मिळत आहे.

टंचाई निवारण आराखडा कशासाठी?...पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी कृती आराखडा तयार केला. त्यात अधिग्रहणासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही मंजुरी देण्यात आली नसल्याने हा आराखडा कशासाठी असा सवाल टंचाईग्रस्त गावातील नागरिकांतून करण्यात येत आहे.

मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी घटली...यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील आठही मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. सध्या लातूर तालुक्यातील तावरजा, व्हटी आणि उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. तिथे उपयुक्त जलसाठा शून्य आहे. रेणापूर प्रकल्पात ३.२१३, देवर्जन- २.६८९, साकोळ - ४.२४०, घरणी - ५.५४७, मसलगा - ६.०३५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण पाच मध्यम प्रकल्पात २१.७१४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.

मसलगा प्रकल्पात ४४ टक्के पाणीसाठा...प्रकल्प - उपयुक्त साठा (टक्के)तावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - १५.६३तिरु - ००देवर्जन - २५.१८साकोळ - ३८.७२घरणी - २४.६९मसलगा - ४४.३८एकूण - १७.७८

लवकरच मंजुरी मिळेल...जवळपास तीन आठवड्यांपासून अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल होत आहेत. पंचायत समितीकडून तहसीलकडे प्रस्ताव दाखल होत आहेत. अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदारांना दोन दिवसांपूर्वी देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु होईल, असे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीकपातlaturलातूर