शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव; विहीर अधिग्रहणास मंजुरी मिळेना, हिवाळ्यात पाणीटंचाईचे चटके

By हरी मोकाशे | Updated: January 12, 2024 19:13 IST

जिल्ह्यातील ३२ गावे- वाड्या तहानल्या

लातूर : गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस न झाल्याने जिल्ह्यास पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी टंचाईग्रस्त गाव- वाड्यांनी जवळपास तीन आठवड्यांपूर्वी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, अद्यापही त्यास मंजुरी देण्यात आली नाही. परिणामी, पाण्यासाठी भटकंती होत आहे. सध्या जिल्ह्यातील ३२ गावे- वाड्या तहानल्या आहेत.

गत पावसाळ्यात विलंबाने व अल्प प्रमाणात पर्जन्यमान झाले. ऑगस्टमध्ये तर पावसाने महिनाभरापेक्षा अधिक दिवस ताण दिला होता. परिणामी, खरीपातील सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तिरु या प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत. शिवाय, ओढे- नाले खळखळले नाहीत. त्यामुळे मध्यम प्रकल्पासह विहिरी, कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही.

दरवर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस होतो. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची त्यावर आशा होती. परंतु, परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. परिणामी, आशा हवेतच विरल्या. त्यामुळे डिसेंबरपासूनच जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे.

२५ गावे अन् ७ वाड्यांचे अधिग्रहणासाठी प्रस्ताव ...जिल्ह्यातील २५ गावे आणि ७ वाड्यांनी अधिग्रहणाचे एकूण ४० प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. दरम्यान, पंचायत समितीने पाहणी करुन त्यातील ५ गावांचे सहा प्रस्ताव वगळले आहेत. उर्वरितपैकी ६ गावे आणि ५ वाड्यांचे एकूण ११ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर केले आहेत. विशेषत: हे प्रस्ताव सादर करुन जवळपास तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र, अद्यापही त्यास मंजुरी मिळाली नसल्याचे पहावयास मिळत आहे.

टंचाई निवारण आराखडा कशासाठी?...पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी कृती आराखडा तयार केला. त्यात अधिग्रहणासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही मंजुरी देण्यात आली नसल्याने हा आराखडा कशासाठी असा सवाल टंचाईग्रस्त गावातील नागरिकांतून करण्यात येत आहे.

मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी घटली...यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील आठही मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. सध्या लातूर तालुक्यातील तावरजा, व्हटी आणि उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. तिथे उपयुक्त जलसाठा शून्य आहे. रेणापूर प्रकल्पात ३.२१३, देवर्जन- २.६८९, साकोळ - ४.२४०, घरणी - ५.५४७, मसलगा - ६.०३५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण पाच मध्यम प्रकल्पात २१.७१४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.

मसलगा प्रकल्पात ४४ टक्के पाणीसाठा...प्रकल्प - उपयुक्त साठा (टक्के)तावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - १५.६३तिरु - ००देवर्जन - २५.१८साकोळ - ३८.७२घरणी - २४.६९मसलगा - ४४.३८एकूण - १७.७८

लवकरच मंजुरी मिळेल...जवळपास तीन आठवड्यांपासून अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल होत आहेत. पंचायत समितीकडून तहसीलकडे प्रस्ताव दाखल होत आहेत. अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदारांना दोन दिवसांपूर्वी देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु होईल, असे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीकपातlaturलातूर