शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

पाण्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव; विहीर अधिग्रहणास मंजुरी मिळेना, हिवाळ्यात पाणीटंचाईचे चटके

By हरी मोकाशे | Updated: January 12, 2024 19:13 IST

जिल्ह्यातील ३२ गावे- वाड्या तहानल्या

लातूर : गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस न झाल्याने जिल्ह्यास पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी टंचाईग्रस्त गाव- वाड्यांनी जवळपास तीन आठवड्यांपूर्वी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, अद्यापही त्यास मंजुरी देण्यात आली नाही. परिणामी, पाण्यासाठी भटकंती होत आहे. सध्या जिल्ह्यातील ३२ गावे- वाड्या तहानल्या आहेत.

गत पावसाळ्यात विलंबाने व अल्प प्रमाणात पर्जन्यमान झाले. ऑगस्टमध्ये तर पावसाने महिनाभरापेक्षा अधिक दिवस ताण दिला होता. परिणामी, खरीपातील सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तिरु या प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत. शिवाय, ओढे- नाले खळखळले नाहीत. त्यामुळे मध्यम प्रकल्पासह विहिरी, कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही.

दरवर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस होतो. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची त्यावर आशा होती. परंतु, परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. परिणामी, आशा हवेतच विरल्या. त्यामुळे डिसेंबरपासूनच जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे.

२५ गावे अन् ७ वाड्यांचे अधिग्रहणासाठी प्रस्ताव ...जिल्ह्यातील २५ गावे आणि ७ वाड्यांनी अधिग्रहणाचे एकूण ४० प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. दरम्यान, पंचायत समितीने पाहणी करुन त्यातील ५ गावांचे सहा प्रस्ताव वगळले आहेत. उर्वरितपैकी ६ गावे आणि ५ वाड्यांचे एकूण ११ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर केले आहेत. विशेषत: हे प्रस्ताव सादर करुन जवळपास तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र, अद्यापही त्यास मंजुरी मिळाली नसल्याचे पहावयास मिळत आहे.

टंचाई निवारण आराखडा कशासाठी?...पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी कृती आराखडा तयार केला. त्यात अधिग्रहणासाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही मंजुरी देण्यात आली नसल्याने हा आराखडा कशासाठी असा सवाल टंचाईग्रस्त गावातील नागरिकांतून करण्यात येत आहे.

मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी घटली...यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील आठही मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. सध्या लातूर तालुक्यातील तावरजा, व्हटी आणि उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. तिथे उपयुक्त जलसाठा शून्य आहे. रेणापूर प्रकल्पात ३.२१३, देवर्जन- २.६८९, साकोळ - ४.२४०, घरणी - ५.५४७, मसलगा - ६.०३५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण पाच मध्यम प्रकल्पात २१.७१४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.

मसलगा प्रकल्पात ४४ टक्के पाणीसाठा...प्रकल्प - उपयुक्त साठा (टक्के)तावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - १५.६३तिरु - ००देवर्जन - २५.१८साकोळ - ३८.७२घरणी - २४.६९मसलगा - ४४.३८एकूण - १७.७८

लवकरच मंजुरी मिळेल...जवळपास तीन आठवड्यांपासून अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल होत आहेत. पंचायत समितीकडून तहसीलकडे प्रस्ताव दाखल होत आहेत. अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदारांना दोन दिवसांपूर्वी देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु होईल, असे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :water shortageपाणीकपातlaturलातूर